शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाठार स्टेशनला दहा दिवसांनी पाणी!

By admin | Updated: September 13, 2015 22:18 IST

कोरेगाव तालुका : दुष्काळी स्थिती; चाऱ्याचाही प्रश्न गंभीर, तलाव कोरडे

वाठारस्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अत्यल्प पाऊस पडतो. सध्या तर पाझर तलाव पूर्ण रिकामे झाले आहेत. देऊर, वाठार स्टेशनसारख्या मोठ्या गावांत दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या भागातील २६ गावांच्या पीक आणेवारीचा निकष स्वतंत्र लावावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. उत्तर-दक्षिण असा जवळपास ८० किलोमीटर विस्तारलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात सोळशी ते पळशीमधील गावांचा समावेश होतो. तर नागझरी, रहिमतपूर हा दक्षिण भाग म्हणून ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या कोरेगावच्या उत्तर भागात तालुक्याच्या इतर भागापेक्षा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे; परंतु शासन दुष्काळ जाहीर करताना कोरेगाव तालुक्यातील एकत्र पीक आणेवारी घोषित करते. यामुळे दुष्काळ असून, तालुक्याच्या या भागचा निकष ५० पैशापेक्षा जास्त आणेवारी दाखवली जाते. यासाठी कोरेगाव तालुक्याच्या या भागातील गावासाठी वेगळा निकष लावून येथील पीक आनेवारी दाखवली जावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव कदम यांनी केली आहे.दरम्यान, कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात नेहमीप्रमाणेच यावर्षी मान्सूनचा पाऊस अत्यल्प पडला आहे. या पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी शंभर टक्के खरिपाची पेरणी केली. त्यानंतर मात्र पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने या भागातील ९० टक्के पिके पाण्याअभावी वाया गेली आहेत. या भागात सध्या सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागासाठी असलेले छोटे पाझर तलाव पूर्ण रिकामे झाले आहेत. विहिरी कूपनलिकांतील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. देऊर, वाठार स्टेशनसारख्या मोठ्या गावांत दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. या गावांनी शासनाकडे प्रस्ताव देऊनही अद्याप गावाच्या गरजेइतपत पाणी प्रशासनाकडून मिळत नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.या भागात पडणाऱ्या अत्यल्प पावसामुळे या भागात सर्वाधिक प्रमाणात घेवडा, वाटाणा, सोयाबीन बटाटा, कांदा ही प्रमुख पिके घेतली जातात. सुरुवातीला पडलेल्या समाधानकारक पावसामुळे बऱ्याच वर्षांनंतर या भागात शंभर टक्के खरिपाची पेरणी झाली. त्यानंतर मात्र पावसाने अद्याप दडी मारली आहे. या भागातील पिके संपूर्ण वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अडचणीतून या शेतकऱ्यांची सुटका होण्यासाठी शासनाने या भागातील पीक आणेवारी स्वतंत्र काढल्यास या भागाचा समावेश दुष्काळी भागात होऊन शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. (वार्ताहर) वाठार स्टेशन येथे पहिल्यांदा जनावरांसाठी जरंडेश्वर कारखान्याने चारा छावणी २००९ मध्ये काढली होती. सध्याची परिस्थिती २००९ च्या दुष्काळापेक्षा ही गंभीर असल्याने या भागातील पशुधन वाचवण्यासाठी शासनाने या ठिकाणी चारा छावणी सुरू करावी. या भागातील शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे. -विक्रम जाधव, वाठार स्टेशन