शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शहराचा पाणीपुरवठा १५ मार्चपासून खंडित : सिंचन विभागाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:06 IST

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे मार्च २००६ पासून ते जानेवारी २०१८ पर्यंत तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपये थकबाकी आहे. दि. १५ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम अदा न केल्यास त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा

ठळक मुद्देजीवन प्राधिकरणकडे तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपये थकबाकी

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे मार्च २००६ पासून ते जानेवारी २०१८ पर्यंत तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपये थकबाकी आहे. दि. १५ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम अदा न केल्यास त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा धोम पाठबंधारे विभागाचे उपअभियंता सुनील गोडसे यांनी दिला आहे. याबाबत जीवन प्राधिकरण विभागास नोटीसही बजावण्यात आली आहे. धोम पाटबंधारे उपविभाग क्रमांक दोनच्या अधिकार क्षेत्रातील कृष्णा नदीवरील क्षेत्र माहुली येथून सातारा शहर व उपनगरातील ग्राहकांसाठी (घरगुती वापरासाठी) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने पाणी उपसा करण्यात येतो. या पाणी उपसासंबंधातील मासिक देयक बिले व त्यासंबंधीच्या सूचना वेळोवेळी जीवन प्राधिकरणाकडे सादर केली जात असताना देखील प्राधिकरणकडून मार्च २००६ पासून आजअखेर संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली नाही. त्यामुळे प्राधिकरणकडे बिलाची एकूण रक्कम १ कोटी ५५ लाख ७६ हजार व समायोजनेची ६१ लाख ६९ हजार अशी मिळून तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी आहे.याबाबत मार्च २००६ पासून आजपर्यंत वेळोवेळी सूचना देऊन व पत्रव्यवहार करून देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून कोणतीही ठोस सकारात्मक कृती न केल्याने नाईलाजास्तव शहराचा पाणीपुरवठा खंडित करावा लागणार आहे. त्यानंतर निर्माण होणाºया जनप्रक्षोभास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सातारा सर्वस्वी जबाबदार राहील, असेही नोटिसीत नमूद केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित सिंचन विभागाला पत्राद्वारे कळविण्यात आल्याचेही धोम उपविभागीय पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे... तर सातबारावर थकबाकीचा बोजासंबंधित उपविभागाच्या अधिकार क्षेत्रातील भुर्इंज, शिवथर, सातारारोड व त्रिपुटी या शाखेतील शेती सिंचनाची एकूण २ कोटी १५ लाख २६ हजार रुपये थकबाकी येणे आहे. संबंधितांनी थकबाकीची रक्कम त्वरित अदा न केल्यास उन्हाळी हंगामात कालव्यात पाणी न सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांच्या सात बारावर थकबाकी रकमेचा बोजा चढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 

कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीचा वाढता खर्च, कर्मचाºयांचे वेतन व दैनंदिन प्रक्रिया खर्च तर दुसरीकडे थकबाकी रकमांचे वाढत जाणारे आकडे यांमुळे विभागाचा आर्थिक समतोल राखणे जिकिरीचे जात आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास त्याचा परिणाम विभागाच्या कर्मचाºयांचे वेतन, कालव्याची देखभाल व दुरुस्तीवर होणारा आहे. थकबाकीदार शेतकºयांनी सिंचनाची देयके अदा न केल्यास उन्हाळी हंगामात कालव्यात पाणी सोडणे शक्य होणार नाही.- सुनील गोडसे, उपविभागीय अभियंता