शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

पाणी पेरणीला फळ आलं या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत खटाव तालुक्यातील भोसरे गावाने राज्यात विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. कायम दुष्काळी खटाव तालुक्यातील भोसरेतील ग्रामस्थांनी ४५ दिवस तळपत्या उन्हात केलेल्या पाणी पेरणीला जणू फळंच आलं आहे. त्यामुळे या गावात आनंदाचं तुफानच आलं आहे.कायम दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी ८ एप्रिल ते २२ मे ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत खटाव तालुक्यातील भोसरे गावाने राज्यात विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. कायम दुष्काळी खटाव तालुक्यातील भोसरेतील ग्रामस्थांनी ४५ दिवस तळपत्या उन्हात केलेल्या पाणी पेरणीला जणू फळंच आलं आहे. त्यामुळे या गावात आनंदाचं तुफानच आलं आहे.कायम दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसांत भर उन्हाळ्यात हजारो हात श्रमदान करीत होते.गट-तट विसरून एकदिलाने काम करीत होते. दुष्काळी भोसरे पाणीदार बनविण्याचे स्वप्न पाहिलेल्या ग्रामस्थांना रविवारी स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यावर आनंदाश्रू आवरता आले नाही. गावात एकच जल्लोष करण्यात आला.‘लोकमत’ला धन्यवाद‘भोसरे ग्रामस्थांनी केलेल्या कामाला ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रसिद्धी दिल्यामुळे कामे करण्यास उत्साह निर्माण झाला.’ अशा शब्दात भोसरे ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.स्पर्धेच्या कालावधीत शिवजयंती, महाराष्ट्र दिन, बुद्धपौर्णिमा हे सणही ग्रामस्थांनी श्रमदानाच्या ठिकाणी जाऊन श्रमदान करत गावकºयांनी साजरे केले.नववधू-वरांसहवºहाडी मंडळींनीही श्रमदानसिनेअभिनेते आमिर खान, किरण राव, मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रिया खान, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचेसह अनेक मान्यवरांनी श्रमदान करून उत्साह वाढविला. दोन जवानांनी श्रमदानाच्या ठिकाणी लग्न करून नववधू वरांसह वºहाडी मंडळींनीही श्रमदान करीत आदर्श निर्माण केला. गावच्या विकासाचा प्रश्न येईल, त्यावेळी अशीच एकजूट करून कामे करतील,’ अशा भावना अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.हृदयात धडधड अन् डोळ्यात अश्रूस्पर्धेचा निकाल ऐकण्यासाठी दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी पुण्यात हजेरी लावली. चढत्याक्रमाने नंबर घोषित व्हायचे तसतसे हृदयात धडधड वाढायची. तिसºया क्रमांकापर्यंत नाव आले नाही म्हणजे भोसरे पहिले किंवा दुसरे असणारच असा विश्वास मनात होता. द्वितीय क्रमांकाचा निकाल घोषित झाल्यावर अक्षरश: स्टेडियममध्येच जल्लोष केला.