शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

माण तालुक्यात ‘पाणीटंचाई’चा बळी!

By admin | Updated: December 14, 2015 00:10 IST

मार्डी येथील घटना : टॅँकर बंदमुळे पाणी आणताना विहिरीत बुडाला

पळशी : कायम दुष्काळी म्हणून शिक्का बसलेल्या माण तालुक्यातील मार्डी येथे रविवारी सकाळी पाणीटंचाईचा बळी गेला. टॅँकर बंद झाल्याने शिपदरा परिसरातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेले असता पाय घसरून विहिरीत पडल्याने बाळू बबन सावंत (वय ३५) यांचा मृत्यू झाला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिपदरा येथील बाळू सावंत हे शेजारच्या विहिरीवरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले; मात्र त्यांना येण्यास उशीर झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. संशय आल्याने कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने या विहिरीत शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर तेथे सावंत आढळले. त्यांना विहिरीतून बाहेर काढून दहिवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मार्डीमध्ये डिसेंबरमध्येही तीन टँकरमधून पाणीपुरवठा केला जात होता. त्यातील दोन बंद केल्याने केवळ एकाच टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी खोल विहिरीत उतरावे लागत आहे. यातूनच बाळू सावंत यांचा ‘पाणीटंचाई बळी’ गेल्याचा आरोप कुटुंबीय व ग्रामस्थांनी केला आहे. (वार्ताहर)