शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

खंडाळा शहरात पाणीटंचाईचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यात उन्हाळा सुरू होताच, भूजल पातळी कमी होत चालली आहे. खंडाळा शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईचे संकट ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यात उन्हाळा सुरू होताच, भूजल पातळी कमी होत चालली आहे. खंडाळा शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभराच्या पाण्यासाठी चणचण भासत आहे. शहरातील लोकांना गरजेपुरते पाणी मिळावे, यासाठी आटापिटा करावा लागत आहे.

नागरिकांच्या या समस्येला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपंचायतीत निवेदन देऊन वाचा फोडली. शहरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे खंडाळ्यातही पाणीटंचाईचा विळखा पडू लागला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, खंडाळा शहरातील पाणीपुरवठा सद्य:स्थितीत नियोजनशून्य आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी जुनी झालेली पाण्याची टाकी पाडण्यात आली. त्यापूर्वी शहरातील त्या टाकीद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील पाण्याचे नियोजन अपेक्षित होते. त्यानंतर, कालावधी उलटून गेला, तरी नवीन पाण्याची टाकी नियोजित नाही किंवा तसा प्रस्तावही करण्यात आलेला नाही. त्यामुळे काही भागांत पाणीपुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी नळाला येतच नाही, तसेच शहरात चालू असलेल्या रस्ते व इतर कामामुळे पाइपलाइनचे नुकसान व मोडतोड होत असते, त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन होत नाही. याबाबत तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित आहे. पाइपलाइनच्या लिकेजमुळे रस्त्यावर पाणी वाया जात आहे. अशामुळे शहरात काही ठिकाणी बकालपणा येत आहे. नागरिकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मानवनिर्मित पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाडलेल्या टाकीला पर्यायी नवीन पाण्याची टाकी उभारण्याचा निर्णय व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नगरसेवक दयानंद खंडागळे, नगरसेविका सुप्रिया गुरव, उज्ज्वला संकपाळ, सुप्रिया वळकुंदे, भरत गाढवे, प्रशांत देशमुख, अमोल गाढवे, सागर गुरव, प्रवीण संकपाळ, केतन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.योगेश डोके यांच्याकडे देण्यात आले आहे.