शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी ओसरतंय... आता काळजी साथरोगांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पात्र सोडून बेफाम वाहणाऱ्या नद्यांचे पाणी घाण वाहून आणते. या घाण पाण्याच्या संपर्कात आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पात्र सोडून बेफाम वाहणाऱ्या नद्यांचे पाणी घाण वाहून आणते. या घाण पाण्याच्या संपर्कात आल्याने लेप्टो स्पिरोसिसचा आजार होण्याची शक्यता अधिक असते. वेळीच काळजी घेऊन उपचार घेतले तर साथीच्या रोगांपासूनही बचाव होण्यास मदत होते.

अतिवृष्टीने साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर आणि कोकणातही हाहाकार माजवला आहे. तब्बल पाच दिवस निव्वळ पाण्याचं साम्राज्य पाहणाऱ्या या जिल्ह्यातील पावसाचे पाणी आता ओसरू लागले आहे. ओसरणारे हे पाणी मानवाला हानी पोहोचवणारे ठरू शकत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पूरग्रस्त भागात राहणाऱ्यांना शिधा, कोरडे कपडे यासह बाटलीबंद पाणी उपलब्ध करून दिले तर त्यांचे आरोग्य राखण्यास उपुयक्त ठरते. पुरात अडकून पडलेल्यांनीही आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता त्यावर तातडीने उपचार घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

चौकट :

लेप्टो स्पिरोसिस म्हणजे नेमकं काय?

नदीपात्राचा प्रवाह सोडून पुराचे पाणी आपल्या आजूबाजूची घाण घेऊन पुढे जात असते. या घाण पाण्यातून त्वचेच्या मार्गे लेप्टो स्पिरोसिसचे जंतू शरीरात प्रवेश करून किडनी आणि लिव्हरवर हल्ला चढवितात. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हा त्रास जीवघेणाही ठरू शकतो.

असं होत असेल तर काळजी घ्या

पुराचे पाणी खाली ओसरत असतानाच वातावरणातील जिवाणू आणि विषाणू सक्रिय अवस्थेत असतात. त्यामुळे ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, पोटात दुखणे, जुलाब आणि काविळीची लक्षणे आढळून आली तर तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ओल्या कपड्यांच्या वापराने त्वचेचा संसर्ग आणि साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यू-मलेरिया होण्याची शक्यताही अधिक असते.

पुराचं पाणी घाण का?

नदीपात्राच्या शेजारी उभं राहिल्यानंतर त्या पात्रातून दुर्गंधी येत नाही, कारण हे पाणी वाहत असते. मात्र, पूरपरिस्थितीत पात्र सोडून नदी वाहू लागते. पाण्याचा प्रवाह इतका बलाढ्य असतो की, वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट या पाण्यात सामावून जाते. मोठमोठी झाडे, त्यावर विसावणारे पशु, पक्षी, पाळीव प्राणी, मैला हे सगळंच वाहून येते. पाण्यात अधिक काळ राहिल्याने त्या कुजायला सुरुवात होते. सजीवाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावर तयार होणारे जिवाणू किटाणू सहजपणे या पाण्यातून प्रवाहित होऊन मानवाला बाधा पोहोचवतात.

कोट :

पूरग्रस्त परिस्थितीत राहिलेल्यांना जंतू आणि विषाणूजन्य संसर्ग होण्याची सर्वाधिक भीती असते. त्यामुळे पुराचे पाणी ओसरू लागले की तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि काही लक्षणं दिसत असतील तर अंगावर आजार न काढता तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- डॉ. प्रतापराव गोळे, सातारा.