शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पाणी ओसरतंय... आता काळजी साथरोगांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पात्र सोडून बेफाम वाहणाऱ्या नद्यांचे पाणी घाण वाहून आणते. या घाण पाण्याच्या संपर्कात आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पात्र सोडून बेफाम वाहणाऱ्या नद्यांचे पाणी घाण वाहून आणते. या घाण पाण्याच्या संपर्कात आल्याने लेप्टो स्पिरोसिसचा आजार होण्याची शक्यता अधिक असते. वेळीच काळजी घेऊन उपचार घेतले तर साथीच्या रोगांपासूनही बचाव होण्यास मदत होते.

अतिवृष्टीने साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर आणि कोकणातही हाहाकार माजवला आहे. तब्बल पाच दिवस निव्वळ पाण्याचं साम्राज्य पाहणाऱ्या या जिल्ह्यातील पावसाचे पाणी आता ओसरू लागले आहे. ओसरणारे हे पाणी मानवाला हानी पोहोचवणारे ठरू शकत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पूरग्रस्त भागात राहणाऱ्यांना शिधा, कोरडे कपडे यासह बाटलीबंद पाणी उपलब्ध करून दिले तर त्यांचे आरोग्य राखण्यास उपुयक्त ठरते. पुरात अडकून पडलेल्यांनीही आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता त्यावर तातडीने उपचार घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

चौकट :

लेप्टो स्पिरोसिस म्हणजे नेमकं काय?

नदीपात्राचा प्रवाह सोडून पुराचे पाणी आपल्या आजूबाजूची घाण घेऊन पुढे जात असते. या घाण पाण्यातून त्वचेच्या मार्गे लेप्टो स्पिरोसिसचे जंतू शरीरात प्रवेश करून किडनी आणि लिव्हरवर हल्ला चढवितात. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हा त्रास जीवघेणाही ठरू शकतो.

असं होत असेल तर काळजी घ्या

पुराचे पाणी खाली ओसरत असतानाच वातावरणातील जिवाणू आणि विषाणू सक्रिय अवस्थेत असतात. त्यामुळे ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, पोटात दुखणे, जुलाब आणि काविळीची लक्षणे आढळून आली तर तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ओल्या कपड्यांच्या वापराने त्वचेचा संसर्ग आणि साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यू-मलेरिया होण्याची शक्यताही अधिक असते.

पुराचं पाणी घाण का?

नदीपात्राच्या शेजारी उभं राहिल्यानंतर त्या पात्रातून दुर्गंधी येत नाही, कारण हे पाणी वाहत असते. मात्र, पूरपरिस्थितीत पात्र सोडून नदी वाहू लागते. पाण्याचा प्रवाह इतका बलाढ्य असतो की, वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट या पाण्यात सामावून जाते. मोठमोठी झाडे, त्यावर विसावणारे पशु, पक्षी, पाळीव प्राणी, मैला हे सगळंच वाहून येते. पाण्यात अधिक काळ राहिल्याने त्या कुजायला सुरुवात होते. सजीवाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावर तयार होणारे जिवाणू किटाणू सहजपणे या पाण्यातून प्रवाहित होऊन मानवाला बाधा पोहोचवतात.

कोट :

पूरग्रस्त परिस्थितीत राहिलेल्यांना जंतू आणि विषाणूजन्य संसर्ग होण्याची सर्वाधिक भीती असते. त्यामुळे पुराचे पाणी ओसरू लागले की तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि काही लक्षणं दिसत असतील तर अंगावर आजार न काढता तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- डॉ. प्रतापराव गोळे, सातारा.