शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

नळाला चार दिवसातून एकदा पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:34 IST

पावसाळ्यातही टंचाई : जलयुक्तमधील गावाची स्थिती; बंधारे गाळाने भरले; विहीरही कोरडी

आॅनलाईन लोकमतमल्हारपेठ (जि. सातारा), दि. १८ : बोडकेवाडी-उरूल, ता. पाटण गावात चार दिवसानंतर एकदा फक्त पंधरा मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे. जलयुक्त शिवारमध्ये गाव असूनही पाणी योजना राबविली नसल्यामुळे या गावाला ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला गावास सामोरे जावे लागत आहे.पाटण तालुक्यातील ९ गावे जलयुक्त शिवारसाठी निवडण्यात आली होती. डोंगराच्या पायथ्याशी ९०० लोकसंख्या असणारे बोडकेवाडी गाव अनेक वर्ष पाणी टंचाईशी सामना करत असल्यामुळे जलयुक्त शिवारात या गावाची निवड झाली. जलयुक्तमुळे गावातील १३२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार होते. २०१६ साली फेब्रुवारीत या गावाची जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवड झाली. त्यानंतर शासनामार्फत बैठका होवून अधिकाऱ्यांनी गाव टंचाईमुक्त होईल, असे आश्वासन दिले.कृषी विभागाने सुमारे ११ लाख खर्चाचा अहवाल तयार केला. वनविभागाने दोन नवीन बंधारे बांधतो, असे सांगितले. मात्र, आश्वासनाची ती बैठक संपल्यानंतर गावाकडे कोणीच फिरकले नाही. ३५ वषार्पुर्वी १९८० साली बांधलेले ४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व ११ मातीचे बंधारे सध्या गाळाने भरले आहेत.गतवर्षी पावसाळ्यात बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाला. मात्र, पावसाळा संपताच दोन महिन्यात बंधारे कोरडे पडले. सर्व बंधाऱ्यांतील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत कृषी विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, कृषी विभागाने त्याची दखलच घेतली नाही.