शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नळाला चार दिवसातून एकदा पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:34 IST

पावसाळ्यातही टंचाई : जलयुक्तमधील गावाची स्थिती; बंधारे गाळाने भरले; विहीरही कोरडी

आॅनलाईन लोकमतमल्हारपेठ (जि. सातारा), दि. १८ : बोडकेवाडी-उरूल, ता. पाटण गावात चार दिवसानंतर एकदा फक्त पंधरा मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे. जलयुक्त शिवारमध्ये गाव असूनही पाणी योजना राबविली नसल्यामुळे या गावाला ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला गावास सामोरे जावे लागत आहे.पाटण तालुक्यातील ९ गावे जलयुक्त शिवारसाठी निवडण्यात आली होती. डोंगराच्या पायथ्याशी ९०० लोकसंख्या असणारे बोडकेवाडी गाव अनेक वर्ष पाणी टंचाईशी सामना करत असल्यामुळे जलयुक्त शिवारात या गावाची निवड झाली. जलयुक्तमुळे गावातील १३२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार होते. २०१६ साली फेब्रुवारीत या गावाची जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवड झाली. त्यानंतर शासनामार्फत बैठका होवून अधिकाऱ्यांनी गाव टंचाईमुक्त होईल, असे आश्वासन दिले.कृषी विभागाने सुमारे ११ लाख खर्चाचा अहवाल तयार केला. वनविभागाने दोन नवीन बंधारे बांधतो, असे सांगितले. मात्र, आश्वासनाची ती बैठक संपल्यानंतर गावाकडे कोणीच फिरकले नाही. ३५ वषार्पुर्वी १९८० साली बांधलेले ४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व ११ मातीचे बंधारे सध्या गाळाने भरले आहेत.गतवर्षी पावसाळ्यात बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाला. मात्र, पावसाळा संपताच दोन महिन्यात बंधारे कोरडे पडले. सर्व बंधाऱ्यांतील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत कृषी विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, कृषी विभागाने त्याची दखलच घेतली नाही.