शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नळाला चार दिवसातून एकदा पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:34 IST

पावसाळ्यातही टंचाई : जलयुक्तमधील गावाची स्थिती; बंधारे गाळाने भरले; विहीरही कोरडी

आॅनलाईन लोकमतमल्हारपेठ (जि. सातारा), दि. १८ : बोडकेवाडी-उरूल, ता. पाटण गावात चार दिवसानंतर एकदा फक्त पंधरा मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे. जलयुक्त शिवारमध्ये गाव असूनही पाणी योजना राबविली नसल्यामुळे या गावाला ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला गावास सामोरे जावे लागत आहे.पाटण तालुक्यातील ९ गावे जलयुक्त शिवारसाठी निवडण्यात आली होती. डोंगराच्या पायथ्याशी ९०० लोकसंख्या असणारे बोडकेवाडी गाव अनेक वर्ष पाणी टंचाईशी सामना करत असल्यामुळे जलयुक्त शिवारात या गावाची निवड झाली. जलयुक्तमुळे गावातील १३२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार होते. २०१६ साली फेब्रुवारीत या गावाची जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवड झाली. त्यानंतर शासनामार्फत बैठका होवून अधिकाऱ्यांनी गाव टंचाईमुक्त होईल, असे आश्वासन दिले.कृषी विभागाने सुमारे ११ लाख खर्चाचा अहवाल तयार केला. वनविभागाने दोन नवीन बंधारे बांधतो, असे सांगितले. मात्र, आश्वासनाची ती बैठक संपल्यानंतर गावाकडे कोणीच फिरकले नाही. ३५ वषार्पुर्वी १९८० साली बांधलेले ४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व ११ मातीचे बंधारे सध्या गाळाने भरले आहेत.गतवर्षी पावसाळ्यात बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाला. मात्र, पावसाळा संपताच दोन महिन्यात बंधारे कोरडे पडले. सर्व बंधाऱ्यांतील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत कृषी विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, कृषी विभागाने त्याची दखलच घेतली नाही.