शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूच्या अधिकाऱ्यांना पाजले दूषित पाणी

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

बोंबाबोंब आंदोलन : अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे कऱ्हाडमध्ये ‘मनसे’चे कृत्य; साथीचे रोग होत असल्याचा आरोप

कऱ्हाड : टेंभू उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कृष्णेचे पाणी अडविल्याने कऱ्हाडसह सैदापूर, हजारमाची, ओगलेवाडीसह सतरा गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्याचा निषेध म्हणून सोमवारी (दि. २) येथील टेंभू उपसा योजनेच्या कार्यालयासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंंब आंदोलन केले़ यावेळी काहींनी अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना हे दूषित पाणी पाजले़ त्यामुळे येथील वातावरणही दूषित झाले आहे़ कृष्णा नदीपात्रावर टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प राबविण्यात आला आहे़ त्याअंतर्गत टेंभू येथे पाणी अडवून तेथून ते पाणी उचलून सांगली जिल्ह्यातील गावांना दिले जाते़ मात्र, हे पाणी अडविल्याने कृष्णा नदीपात्राचा प्रवाह थांबला जातो़ त्याचा विपरीत परिणाम कऱ्हाडसह परिसरातील गावांत पिण्याच्या पाण्यावरती होत आहे़ कृष्णेच्या पाण्यात कऱ्हाड व मलकापूर नगरपरिषदेचे सांडपाणी सोडले जाते़ त्यामुळे अडवून ठेवलेल्या या पाण्याला दुर्गंधी येत आहे़ साहजिकच नदीकाठावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमधून हेच पाणी लोकांना पिण्यासाठी मिळत आहे़ परिणामी, लोकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे़ याबाबत ‘मनसे’ने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी ओगलेवाडी येथील टेंभूच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले, तर काहींनी अधिकाऱ्यांनाच हे पाणी पाजले़आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ विकास पवार, महेश जगताप, रवींंद्र शेलार, दादा शिंगण, सागर बर्गे, चंद्रकांत पवार, सतीश यादव, चंद्रकांत गायकवाड, नितीन महाडिक, आदींचा समावेश होता़ (प्रतिनिधी)बैठक घेण्याचे आश्वासन -- दरम्यान, कऱ्हाड व मलकापूर नगरपरिषद, कृष्णा हॉस्पिटल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्याचे लेखी आश्वासन टेंभूच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनाला स्वल्पविराम मिळाला आहे़