शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

टेंभूच्या अधिकाऱ्यांना पाजले दूषित पाणी

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

बोंबाबोंब आंदोलन : अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे कऱ्हाडमध्ये ‘मनसे’चे कृत्य; साथीचे रोग होत असल्याचा आरोप

कऱ्हाड : टेंभू उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कृष्णेचे पाणी अडविल्याने कऱ्हाडसह सैदापूर, हजारमाची, ओगलेवाडीसह सतरा गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्याचा निषेध म्हणून सोमवारी (दि. २) येथील टेंभू उपसा योजनेच्या कार्यालयासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंंब आंदोलन केले़ यावेळी काहींनी अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना हे दूषित पाणी पाजले़ त्यामुळे येथील वातावरणही दूषित झाले आहे़ कृष्णा नदीपात्रावर टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प राबविण्यात आला आहे़ त्याअंतर्गत टेंभू येथे पाणी अडवून तेथून ते पाणी उचलून सांगली जिल्ह्यातील गावांना दिले जाते़ मात्र, हे पाणी अडविल्याने कृष्णा नदीपात्राचा प्रवाह थांबला जातो़ त्याचा विपरीत परिणाम कऱ्हाडसह परिसरातील गावांत पिण्याच्या पाण्यावरती होत आहे़ कृष्णेच्या पाण्यात कऱ्हाड व मलकापूर नगरपरिषदेचे सांडपाणी सोडले जाते़ त्यामुळे अडवून ठेवलेल्या या पाण्याला दुर्गंधी येत आहे़ साहजिकच नदीकाठावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमधून हेच पाणी लोकांना पिण्यासाठी मिळत आहे़ परिणामी, लोकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे़ याबाबत ‘मनसे’ने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी ओगलेवाडी येथील टेंभूच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले, तर काहींनी अधिकाऱ्यांनाच हे पाणी पाजले़आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ विकास पवार, महेश जगताप, रवींंद्र शेलार, दादा शिंगण, सागर बर्गे, चंद्रकांत पवार, सतीश यादव, चंद्रकांत गायकवाड, नितीन महाडिक, आदींचा समावेश होता़ (प्रतिनिधी)बैठक घेण्याचे आश्वासन -- दरम्यान, कऱ्हाड व मलकापूर नगरपरिषद, कृष्णा हॉस्पिटल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्याचे लेखी आश्वासन टेंभूच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनाला स्वल्पविराम मिळाला आहे़