शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

टेंभूच्या अधिकाऱ्यांना पाजले दूषित पाणी

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

बोंबाबोंब आंदोलन : अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे कऱ्हाडमध्ये ‘मनसे’चे कृत्य; साथीचे रोग होत असल्याचा आरोप

कऱ्हाड : टेंभू उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कृष्णेचे पाणी अडविल्याने कऱ्हाडसह सैदापूर, हजारमाची, ओगलेवाडीसह सतरा गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्याचा निषेध म्हणून सोमवारी (दि. २) येथील टेंभू उपसा योजनेच्या कार्यालयासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंंब आंदोलन केले़ यावेळी काहींनी अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना हे दूषित पाणी पाजले़ त्यामुळे येथील वातावरणही दूषित झाले आहे़ कृष्णा नदीपात्रावर टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प राबविण्यात आला आहे़ त्याअंतर्गत टेंभू येथे पाणी अडवून तेथून ते पाणी उचलून सांगली जिल्ह्यातील गावांना दिले जाते़ मात्र, हे पाणी अडविल्याने कृष्णा नदीपात्राचा प्रवाह थांबला जातो़ त्याचा विपरीत परिणाम कऱ्हाडसह परिसरातील गावांत पिण्याच्या पाण्यावरती होत आहे़ कृष्णेच्या पाण्यात कऱ्हाड व मलकापूर नगरपरिषदेचे सांडपाणी सोडले जाते़ त्यामुळे अडवून ठेवलेल्या या पाण्याला दुर्गंधी येत आहे़ साहजिकच नदीकाठावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमधून हेच पाणी लोकांना पिण्यासाठी मिळत आहे़ परिणामी, लोकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे़ याबाबत ‘मनसे’ने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी ओगलेवाडी येथील टेंभूच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले, तर काहींनी अधिकाऱ्यांनाच हे पाणी पाजले़आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ विकास पवार, महेश जगताप, रवींंद्र शेलार, दादा शिंगण, सागर बर्गे, चंद्रकांत पवार, सतीश यादव, चंद्रकांत गायकवाड, नितीन महाडिक, आदींचा समावेश होता़ (प्रतिनिधी)बैठक घेण्याचे आश्वासन -- दरम्यान, कऱ्हाड व मलकापूर नगरपरिषद, कृष्णा हॉस्पिटल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्याचे लेखी आश्वासन टेंभूच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनाला स्वल्पविराम मिळाला आहे़