शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

टेंभूच्या अधिकाऱ्यांना पाजले दूषित पाणी

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

बोंबाबोंब आंदोलन : अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे कऱ्हाडमध्ये ‘मनसे’चे कृत्य; साथीचे रोग होत असल्याचा आरोप

कऱ्हाड : टेंभू उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कृष्णेचे पाणी अडविल्याने कऱ्हाडसह सैदापूर, हजारमाची, ओगलेवाडीसह सतरा गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्याचा निषेध म्हणून सोमवारी (दि. २) येथील टेंभू उपसा योजनेच्या कार्यालयासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंंब आंदोलन केले़ यावेळी काहींनी अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना हे दूषित पाणी पाजले़ त्यामुळे येथील वातावरणही दूषित झाले आहे़ कृष्णा नदीपात्रावर टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प राबविण्यात आला आहे़ त्याअंतर्गत टेंभू येथे पाणी अडवून तेथून ते पाणी उचलून सांगली जिल्ह्यातील गावांना दिले जाते़ मात्र, हे पाणी अडविल्याने कृष्णा नदीपात्राचा प्रवाह थांबला जातो़ त्याचा विपरीत परिणाम कऱ्हाडसह परिसरातील गावांत पिण्याच्या पाण्यावरती होत आहे़ कृष्णेच्या पाण्यात कऱ्हाड व मलकापूर नगरपरिषदेचे सांडपाणी सोडले जाते़ त्यामुळे अडवून ठेवलेल्या या पाण्याला दुर्गंधी येत आहे़ साहजिकच नदीकाठावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमधून हेच पाणी लोकांना पिण्यासाठी मिळत आहे़ परिणामी, लोकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे़ याबाबत ‘मनसे’ने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी ओगलेवाडी येथील टेंभूच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले, तर काहींनी अधिकाऱ्यांनाच हे पाणी पाजले़आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ विकास पवार, महेश जगताप, रवींंद्र शेलार, दादा शिंगण, सागर बर्गे, चंद्रकांत पवार, सतीश यादव, चंद्रकांत गायकवाड, नितीन महाडिक, आदींचा समावेश होता़ (प्रतिनिधी)बैठक घेण्याचे आश्वासन -- दरम्यान, कऱ्हाड व मलकापूर नगरपरिषद, कृष्णा हॉस्पिटल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्याचे लेखी आश्वासन टेंभूच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनाला स्वल्पविराम मिळाला आहे़