शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

नीरा-देवघरचे पाणी शेखमीरेवाडीत खळाळणार

By admin | Updated: January 21, 2017 21:00 IST

मकरंद पाटील : कालव्याच्या कामाबाबत संभ्रम निर्माण करू नये

खंडाळा : ‘नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी खंडाळा तालुक्यातील लाभक्षेत्राखालील गावांना मिळावे. यासाठी आजपर्यंत सातत्याने प्रयत्न केले. कालव्याच्या कामातील अनेक तांत्रिक अडचणींवर मात करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे नीरा-देवघर कालव्याद्वारे येत्या चार दिवसांत पाणी शेखमीरेवाडीपर्यंत पोहोचेल,’ अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.खंडाळा येथील ११ गावांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘नीरा-देवघर कालव्याद्वारे खंडाळा तालुक्यातील २४ गावे लाभक्षेत्रात येत आहेत. या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच ठेवली आहे. मात्र, या कालव्यात अनेक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी बराच अवधी गेला. विशेषत: सांगवी येथील ओढ्यावरील पुलाचे बांधकाम वनविभागाच्या जागेची परवानगी त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटर कालव्याचे क्रॉसिंग करण्यासाठी येथील जमिनीतील २४० खातेदारांचा शोध घेण्याची मोहीम राबवावी लागली.ही क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील महत्त्वाची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे लोकांच्या भावनेचा आदर करून येत्या चार दिवसांत प्रजासत्ताक दिनापर्यंत पाणी ४८ किलोमीटर शेखमीरेवाडीपर्यंत पोहोचले जाईल. तालुक्यातील बहुतांशी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. वाघोशीपर्यंत पाणी पोहोच-विण्यासाठी मोर्वे येथील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या जातील. यावेळी सभापती नितीन भरगुडे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, यशवंत साळुंखे, अजय भोसले, लक्ष्मण चव्हाण, मयूर भोसले, राजेंद्र भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोटपाटाची कामे मार्चनंतर सुरू...‘मोर्वे गावच्या हद्दीतील दोन किलोमीटर अंतरातील कालव्याचे कामही येत्या काही दिवसांत वेगाने करण्यात येईल.’ ते पूर्ण होताच वाघोशीपर्यंत पाणी जाण्यात कोणतीही अडचण राहणार नाही. याशिवाय या कालव्याच्या पोटपाटाची कामेही मार्चनंतर हाती घेण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचेल. या परिसरातील गावांनी, शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये. या कालव्याच्या कामाबाबात कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये,’ असे आवाहन आ. मकरंद पाटील यांनी केले.