शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघरचे पाणी शेखमीरेवाडीत खळाळणार

By admin | Updated: January 21, 2017 21:00 IST

मकरंद पाटील : कालव्याच्या कामाबाबत संभ्रम निर्माण करू नये

खंडाळा : ‘नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी खंडाळा तालुक्यातील लाभक्षेत्राखालील गावांना मिळावे. यासाठी आजपर्यंत सातत्याने प्रयत्न केले. कालव्याच्या कामातील अनेक तांत्रिक अडचणींवर मात करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे नीरा-देवघर कालव्याद्वारे येत्या चार दिवसांत पाणी शेखमीरेवाडीपर्यंत पोहोचेल,’ अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.खंडाळा येथील ११ गावांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘नीरा-देवघर कालव्याद्वारे खंडाळा तालुक्यातील २४ गावे लाभक्षेत्रात येत आहेत. या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच ठेवली आहे. मात्र, या कालव्यात अनेक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी बराच अवधी गेला. विशेषत: सांगवी येथील ओढ्यावरील पुलाचे बांधकाम वनविभागाच्या जागेची परवानगी त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटर कालव्याचे क्रॉसिंग करण्यासाठी येथील जमिनीतील २४० खातेदारांचा शोध घेण्याची मोहीम राबवावी लागली.ही क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील महत्त्वाची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे लोकांच्या भावनेचा आदर करून येत्या चार दिवसांत प्रजासत्ताक दिनापर्यंत पाणी ४८ किलोमीटर शेखमीरेवाडीपर्यंत पोहोचले जाईल. तालुक्यातील बहुतांशी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. वाघोशीपर्यंत पाणी पोहोच-विण्यासाठी मोर्वे येथील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या जातील. यावेळी सभापती नितीन भरगुडे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, यशवंत साळुंखे, अजय भोसले, लक्ष्मण चव्हाण, मयूर भोसले, राजेंद्र भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोटपाटाची कामे मार्चनंतर सुरू...‘मोर्वे गावच्या हद्दीतील दोन किलोमीटर अंतरातील कालव्याचे कामही येत्या काही दिवसांत वेगाने करण्यात येईल.’ ते पूर्ण होताच वाघोशीपर्यंत पाणी जाण्यात कोणतीही अडचण राहणार नाही. याशिवाय या कालव्याच्या पोटपाटाची कामेही मार्चनंतर हाती घेण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचेल. या परिसरातील गावांनी, शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये. या कालव्याच्या कामाबाबात कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये,’ असे आवाहन आ. मकरंद पाटील यांनी केले.