शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

नीरा-देवघरचे पाणी शेखमीरेवाडीत खळाळणार

By admin | Updated: January 21, 2017 21:00 IST

मकरंद पाटील : कालव्याच्या कामाबाबत संभ्रम निर्माण करू नये

खंडाळा : ‘नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी खंडाळा तालुक्यातील लाभक्षेत्राखालील गावांना मिळावे. यासाठी आजपर्यंत सातत्याने प्रयत्न केले. कालव्याच्या कामातील अनेक तांत्रिक अडचणींवर मात करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे नीरा-देवघर कालव्याद्वारे येत्या चार दिवसांत पाणी शेखमीरेवाडीपर्यंत पोहोचेल,’ अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.खंडाळा येथील ११ गावांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘नीरा-देवघर कालव्याद्वारे खंडाळा तालुक्यातील २४ गावे लाभक्षेत्रात येत आहेत. या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच ठेवली आहे. मात्र, या कालव्यात अनेक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी बराच अवधी गेला. विशेषत: सांगवी येथील ओढ्यावरील पुलाचे बांधकाम वनविभागाच्या जागेची परवानगी त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटर कालव्याचे क्रॉसिंग करण्यासाठी येथील जमिनीतील २४० खातेदारांचा शोध घेण्याची मोहीम राबवावी लागली.ही क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील महत्त्वाची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे लोकांच्या भावनेचा आदर करून येत्या चार दिवसांत प्रजासत्ताक दिनापर्यंत पाणी ४८ किलोमीटर शेखमीरेवाडीपर्यंत पोहोचले जाईल. तालुक्यातील बहुतांशी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. वाघोशीपर्यंत पाणी पोहोच-विण्यासाठी मोर्वे येथील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या जातील. यावेळी सभापती नितीन भरगुडे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, यशवंत साळुंखे, अजय भोसले, लक्ष्मण चव्हाण, मयूर भोसले, राजेंद्र भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोटपाटाची कामे मार्चनंतर सुरू...‘मोर्वे गावच्या हद्दीतील दोन किलोमीटर अंतरातील कालव्याचे कामही येत्या काही दिवसांत वेगाने करण्यात येईल.’ ते पूर्ण होताच वाघोशीपर्यंत पाणी जाण्यात कोणतीही अडचण राहणार नाही. याशिवाय या कालव्याच्या पोटपाटाची कामेही मार्चनंतर हाती घेण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचेल. या परिसरातील गावांनी, शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये. या कालव्याच्या कामाबाबात कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये,’ असे आवाहन आ. मकरंद पाटील यांनी केले.