शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वसना योजनेचं पाणी हवंय..पण फुकट नाही !

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

कोरेगाव तालुका : शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरावा; शासनाची भूमिका

संजय कदम--  वाठार स्टेशन --दुष्काळ पडलाय... शेतीला पाणी न्हाय... आतातरी पाणी सोडा... अशी साद गेल्या अनेक वर्षांपासून वसनाकाठचा शेतकरी मारत आहे. मात्र वसनेचं पाणी आता फुकट मिळणार नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांना दोन पावलं पुढं टाकावीत आणि पाण्यासाठी रितसर पाणी मागणी अर्ज भरावा. तरच हे पाणी शेताला मिळेल, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे वसनेचं पाणी मोकळं सुटण्याच्या आशा आता मावळल्या आहेत. कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांच्या परिश्रमातून १९९८ मध्ये कोरेगावच्या उत्तर दुष्काळी भागाला हरित स्वप्न दाखवणारी वसना उपसा सिंचन योजना खऱ्या अर्थाने कागदावर आली. युती शासनाच्या काळात या योजनेचा शुभारंभ रेवडी गावच्या हद्दीत झाला. सुरुवातील तीन टप्यात असलेली ही ०.९२ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजना बीओटी तत्त्वावर बांधण्यास मंजुरी मिळाली. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने यात बदल घडवत दोन टप्यात या योजनेला मान्यता दिली. दि. ९ मे २००० रोजी शरद पवार यांच्या मूळगावात या योजनेची कोनशीला उभारण्यात आली. यावेळी अवघ्या ७२ कोटींत पूर्ण होणारी ही योजना आज शासनाच्या उदासिन भूमिकेमुळे १५० कोटींच्या घरात पोहोचली आहे. ती आता सर्वांसाठीच दिवास्वप्न ठरू लागली आहे. दरम्यान, वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ काही वर्षांपूर्वीच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर या टप्यातील सहा गावांना या योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. या पाण्यामुळे या दुष्काळी भागात समाधानाचे वातावरण होते. आताही पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी या योजनेतून पूर्वी प्रमाणेच सर्वच गावांतील ओढ्या-नाल्यांना पाणी सोडावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान, आमदार आदर्श ग्राम योजनेत देऊरचा सहभाग झाला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी देऊरला आढावा बैठक घेतली. पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार वसनेच्या पहिल्या टप्यातील पाणी एका चेंबरमधून देऊरमधील एका ओढ्यातून ७५० अश्वशक्तीच्या मोटारीद्वारे गेल्या सोमवारपासून सोडण्यास सुरुवात केली. परंतु भारनियमनामुळे मंगळवारी हे पाणी बंद होते. बुधवारी पुन्हा दुपारी १ ते ४ या वेळेत सोडले होते. मात्र पाण्याची गरज सर्वांनाच असल्याने या योजनेतील इतर गावांतील शेतकऱ्यांनीही ते आपल्या शेतात सोडण्यासाठी या पाईपलाईनची तोडफोड करण्याचा प्रकार केल्याने हे पाणी बंद ठेवले आहे. धोम पाटबंधारे विभागाची सूचनापाणी सोडण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरावेत. पाणी वापर संस्थांची निर्मिती करावी. ती केल्यास या योजनेतून पाणी सोडणे शक्य होणार आहे. मात्र ओढ्यानाल्यांना मोकळे पाणी सोडणं हे न परवडणार असल्याने शेतकऱ्यांनी या पाण्याची मागणी विहित नमुन्यातच करणे गरजेचे आहे, अशी सूचना धोम पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.