शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

वसना योजनेचं पाणी हवंय..पण फुकट नाही !

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

कोरेगाव तालुका : शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरावा; शासनाची भूमिका

संजय कदम--  वाठार स्टेशन --दुष्काळ पडलाय... शेतीला पाणी न्हाय... आतातरी पाणी सोडा... अशी साद गेल्या अनेक वर्षांपासून वसनाकाठचा शेतकरी मारत आहे. मात्र वसनेचं पाणी आता फुकट मिळणार नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांना दोन पावलं पुढं टाकावीत आणि पाण्यासाठी रितसर पाणी मागणी अर्ज भरावा. तरच हे पाणी शेताला मिळेल, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे वसनेचं पाणी मोकळं सुटण्याच्या आशा आता मावळल्या आहेत. कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांच्या परिश्रमातून १९९८ मध्ये कोरेगावच्या उत्तर दुष्काळी भागाला हरित स्वप्न दाखवणारी वसना उपसा सिंचन योजना खऱ्या अर्थाने कागदावर आली. युती शासनाच्या काळात या योजनेचा शुभारंभ रेवडी गावच्या हद्दीत झाला. सुरुवातील तीन टप्यात असलेली ही ०.९२ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजना बीओटी तत्त्वावर बांधण्यास मंजुरी मिळाली. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने यात बदल घडवत दोन टप्यात या योजनेला मान्यता दिली. दि. ९ मे २००० रोजी शरद पवार यांच्या मूळगावात या योजनेची कोनशीला उभारण्यात आली. यावेळी अवघ्या ७२ कोटींत पूर्ण होणारी ही योजना आज शासनाच्या उदासिन भूमिकेमुळे १५० कोटींच्या घरात पोहोचली आहे. ती आता सर्वांसाठीच दिवास्वप्न ठरू लागली आहे. दरम्यान, वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ काही वर्षांपूर्वीच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर या टप्यातील सहा गावांना या योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. या पाण्यामुळे या दुष्काळी भागात समाधानाचे वातावरण होते. आताही पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी या योजनेतून पूर्वी प्रमाणेच सर्वच गावांतील ओढ्या-नाल्यांना पाणी सोडावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान, आमदार आदर्श ग्राम योजनेत देऊरचा सहभाग झाला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी देऊरला आढावा बैठक घेतली. पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार वसनेच्या पहिल्या टप्यातील पाणी एका चेंबरमधून देऊरमधील एका ओढ्यातून ७५० अश्वशक्तीच्या मोटारीद्वारे गेल्या सोमवारपासून सोडण्यास सुरुवात केली. परंतु भारनियमनामुळे मंगळवारी हे पाणी बंद होते. बुधवारी पुन्हा दुपारी १ ते ४ या वेळेत सोडले होते. मात्र पाण्याची गरज सर्वांनाच असल्याने या योजनेतील इतर गावांतील शेतकऱ्यांनीही ते आपल्या शेतात सोडण्यासाठी या पाईपलाईनची तोडफोड करण्याचा प्रकार केल्याने हे पाणी बंद ठेवले आहे. धोम पाटबंधारे विभागाची सूचनापाणी सोडण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरावेत. पाणी वापर संस्थांची निर्मिती करावी. ती केल्यास या योजनेतून पाणी सोडणे शक्य होणार आहे. मात्र ओढ्यानाल्यांना मोकळे पाणी सोडणं हे न परवडणार असल्याने शेतकऱ्यांनी या पाण्याची मागणी विहित नमुन्यातच करणे गरजेचे आहे, अशी सूचना धोम पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.