शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

महादरे तलावातील पाणी शून्य पातळीवर!

By admin | Updated: May 22, 2017 23:12 IST

महादरे तलावातील पाणी शून्य पातळीवर!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यातील ऐतिहासिक असलेल्या महादरे तलावातील पाण्याने शून्य पातळी गाठली. तलावातील गाळ दिसायला लागला असून, तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दरम्यान, तलावातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढण्याचे नियोजन आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या साताऱ्याला भरभरून निसर्ग संपदा लाभली आहे. यवतेश्वर, अजिंक्यतारा किल्ल्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून साताऱ्यात मोठी तजवीज करण्यात आली. पावसाचा प्रत्येक थेंब न् थेंब वापरता यावा म्हणून तलावांची निर्मिती करण्यात आली. यवतेश्वरवर पडलेल्या पावसाचे पाणी हत्ती तलावात साठते. ते भरल्यानंतर महादरे तलावात पाणी येते. महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एक किलोमीटर अंतर जमिनीतून प्रवास करून पाणी मंगळवार तळ्यात येते अन् पुढे जादा पाणी मोती तळे व प्रतापसिंह हायस्कूलच्या तळघरात येते. महादरे तलावातून व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ, मंगळवार तळे परिसराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे महादरे तलावाची परिसरातील हजारो नागरिकांना खूप मोलाची मदत होते. या तलावातील पाणी पातळी यंदा चांगलीच खालावली. तलावात उतरण्याच्या पायऱ्या उघड्या पडल्या असून, पश्चिम दिशेने जमीन उघडी पडली. त्यामुळे तलावातून होणारा पाणीपुरवठा पालिकेला बंद करावा लागला आहे. व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ व मंगळवार तळे परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कासचे पाणी दिले जात आहे.