शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

पाणी उशाला... कोरड घशाला!

By admin | Updated: October 16, 2015 00:57 IST

माण तालुका : बंधाऱ्याला दरवाजे बसविण्याची मागणी

शरद देवकुळे -- पळशी  माण तालुक्यातील पळशी येथील माणगंगा नदीवरील कोल्हापूरपद्धतीच्या बंधाऱ्याला दरवाजे न बसविल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून, पाण्यावाचून रब्बी हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. बंधाऱ्याला तत्काळ दरवाजे बसविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.पळशी येथील तोरशे वस्तीनजीक माणगंगा नदीवर कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत दहा वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. यावर्षी लोधवडे परिसरात जोरदार पाऊस झाल्याने माणगंगा नदी वाहू लागली; पण बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने पाणी अडवले जात नाही. परिणामी पाण्याचा अपव्यय होत आहे.हा बंधारा सर्वात मोठा असून, पाण्याचा साठा अंदाजे चार-पाच किलोमीटरपर्यंत असल्याने पळशी, जाशी, मणकर्णवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. या बंधाऱ्याला दरवाजे बसविले तर हजारो एकर जमीन ओलिताखाली येऊ शकते, असे जाणकार सांगतात. बंधाऱ्यात पाणी असूनही ते वाया जात आहे. त्यामुळे ‘पाणी उशाला... कोरड घशाला’ अशी परिस्थती पळशी परिसरात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, कांदा, मका अशा पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या अद्यापही सुरूच आहेत. जर बंधाऱ्याला दरवाजे बसविले नाहीत, तर रब्बी हंगाम वाया जाऊ शकतो. तरी संबंधित विभागाने त्वरित बंधाऱ्याला दरवाजे बसवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतूमधून जोर धरू लागली आहे. बंधाऱ्यात पाणी असल्याने वेळोवेळी संबंधित विभागाला याबाबत कळवूनदेखील बंधाऱ्याला दरवाजे बसविले जात नाहीत. यावर्षी नदीला पाणी आले; पण बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.-प्रशांत खाडे, शेतकरी, पळशी