शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणातील पाणीसाठा मे अखेर संपणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:02 IST

पाटण : तीव्र दुष्काळामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या पाणी मागणीचा भार सतत कोयना धरणातील पाणीसाठ्यावर वाढत चालला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ...

पाटण : तीव्र दुष्काळामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या पाणी मागणीचा भार सतत कोयना धरणातील पाणीसाठ्यावर वाढत चालला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत कोयना धरणातील पाणी पायथा वीजगृह आणि नदी विमांचकद्वारे सांगलीकडे सोडणे सुरू आहे.आजअखेर कोयना धरणात केवळ ३१.०५ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. त्यामुळे मे अखेर कोयनेतील पाणीसाठा संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. असे झाले तर जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांचे नियोजन काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मात्र, वीजनिर्मितीचा वाढता आलेख आणि कर्नाटक, सांगलीकडील पाणीटंचाईचे दुर्भिक्ष यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा एप्रिल आणि मे महिन्यात अत्यंत झपाट्याने खालावला आहे. सध्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक आणि नदी विमांचकमधून १००० क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात सोडणे निरंतर सुरू आहे. यापुढे पाऊस सुरू होईपर्यंत क ोयना धरणातील पाणी सांगलीकडे सोडणे बंद होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता मे महिन्याचे उरलेले १९ दिवस आणि शिल्लक पाणीसाठा ३१ टीएमसी हे गणित वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचनासाठी होणारा पाणीवापर पाहता जुळेल की नाही, याची शाश्वती नाही.जरी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला नाही तर मात्र, कोयना धरणात खडखडाट होऊन राज्याची पाणीबाणी अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आहे. तत्पूर्वी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना धरणातील पाणी राज्याबाहेर देऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मात्र आजअखेर तरी त्यांच्या मागणीचा प्रभाव लागू झालेला दिसत नाही.जूनमध्ये पाऊसतरी संकट राहणारजूनमध्ये पाऊस वेळेवर सुरू झाला तरी कोयना धरणात सुरू होण्याची पाण्याची आवक ही जेमतेम १५ दिवस पाऊस झाला तर त्यानंतर सुरू होते. त्यामुळे जलसंपदा विभागाने जूनमधील कालावधीत काय ठरविले आहे?