शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

कोयना धरणातील पाणीसाठा मे अखेर संपणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:02 IST

पाटण : तीव्र दुष्काळामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या पाणी मागणीचा भार सतत कोयना धरणातील पाणीसाठ्यावर वाढत चालला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ...

पाटण : तीव्र दुष्काळामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या पाणी मागणीचा भार सतत कोयना धरणातील पाणीसाठ्यावर वाढत चालला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत कोयना धरणातील पाणी पायथा वीजगृह आणि नदी विमांचकद्वारे सांगलीकडे सोडणे सुरू आहे.आजअखेर कोयना धरणात केवळ ३१.०५ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. त्यामुळे मे अखेर कोयनेतील पाणीसाठा संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. असे झाले तर जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांचे नियोजन काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मात्र, वीजनिर्मितीचा वाढता आलेख आणि कर्नाटक, सांगलीकडील पाणीटंचाईचे दुर्भिक्ष यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा एप्रिल आणि मे महिन्यात अत्यंत झपाट्याने खालावला आहे. सध्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक आणि नदी विमांचकमधून १००० क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात सोडणे निरंतर सुरू आहे. यापुढे पाऊस सुरू होईपर्यंत क ोयना धरणातील पाणी सांगलीकडे सोडणे बंद होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता मे महिन्याचे उरलेले १९ दिवस आणि शिल्लक पाणीसाठा ३१ टीएमसी हे गणित वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचनासाठी होणारा पाणीवापर पाहता जुळेल की नाही, याची शाश्वती नाही.जरी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला नाही तर मात्र, कोयना धरणात खडखडाट होऊन राज्याची पाणीबाणी अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आहे. तत्पूर्वी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना धरणातील पाणी राज्याबाहेर देऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मात्र आजअखेर तरी त्यांच्या मागणीचा प्रभाव लागू झालेला दिसत नाही.जूनमध्ये पाऊसतरी संकट राहणारजूनमध्ये पाऊस वेळेवर सुरू झाला तरी कोयना धरणात सुरू होण्याची पाण्याची आवक ही जेमतेम १५ दिवस पाऊस झाला तर त्यानंतर सुरू होते. त्यामुळे जलसंपदा विभागाने जूनमधील कालावधीत काय ठरविले आहे?