शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

आसनगाव परिसरात पाणी पातळीत घट

By admin | Updated: February 8, 2016 23:24 IST

विहिरी आटल्या : नगदी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत

शेंद्रे : सातारा शहरापासून १५ ते २० किलोमीटरवर असणाऱ्या आसनगाव परिसरात चालू वर्षी चांगला पाऊस न झाल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी तर विहिरी आटल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याच्या मोटारी दिवसात १० ते १५ मिनिटेच चालत आहेत.त्यामुळे या परिसरातील विहिरींवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची शेतातील पिके धोक्यात आली आहेत. ऊस, आले तसेच इतर पालेभाज्यांसाठी शेतकऱ्याला जादा पाण्याची आवश्यकता असते. परंतु विहिरींमध्ये पाणी नसल्यामुळे आसनगाव परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे.चालू हंगामात शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला तोडून जात आहेत. परंतु येथून पुढे उन्हाळ्यात उसाला व इतर पिकाला पाणी कोढून आणणार या भीतीने शेतकरी आडसाली उस न ठेवता उस पीक शेतातून काढत आहेत. त्यामुळे साखर कारखानाजवळ असूनही या परिसरातील उस पिकाचे प्रमाण कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता मापरवाडी येथील युवा शेतकरी अधिक बाबर म्हणाले, ‘गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्यामुळे विहिरीमधील पाण्याची पातळी फेब्रुवारी महिन्यातच संपली आहे. विहिरींमध्ये पाण्याचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत. शेतातील पिके वाळू लागली आहेत. (वार्ताहर)