शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा तपापासून जलवाहिनीला गळती

By admin | Updated: August 13, 2015 22:45 IST

विद्यानगर वसाहत : दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप

सातारा : शहरात अनेक आंदोलने हे पाण्यासाठी होतात. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा अशा अनेक कारणांना संबंधित विभागाला तोंड द्यावे लागते; परंतु येथील औद्योगिक वसाहतीमध्ये याला अपवादात्मक गोष्ट म्हणजे येथील पाण्याच्या टाकीला पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला एक-दोन नव्हे, तर तब्बल १५ वर्षांहून अधिक काळापासून गळती लागली आहे. या गळतीमुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांमधून बोलले जात आहे. कोडोली येथील गणेश चौकाजवळील विद्यानगर वसाहतीतून औद्योगिक वसाहतीच्या जलटाकीत पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला ही गळती लागली आहे. ही जलवाहिनी जवळपास अडीच फूट व्यासाची असून, विद्यानगर येथील वसाहतीमध्ये या वाहिनीला दोन ठिकाणी वळविण्यात आल्याने येथे सतत पाण्याचा दाब असतो. त्यामुळे येथे नेहमी गळती लागलेली असते. ज्या ठिकाणी ही गळती लागली आहे, त्या ठिकाणी मोठे डबके झाले असून, शेजारहून सांडपाण्याचा नालाही या डबक्यातूनच जात आहे. त्यामुळे जलवाहिनीचे पाणी अन् सांडपाणी एकत्र मिसळत असून, हेच पाणी येथील वाहणाऱ्या ओढ्यात जात आहे. या जलवाहिनीला चोवीस तास पाणीपुरवठा होत असल्याने प्राधिकरणाचे लाखो लिटर पाणी येथून वाया जात आहे. हे सर्व पाणी ओढ्यात जात असल्याने प्राधिकरणाचे लाखो रुपये पाण्यात जात असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.दरम्यान, जलवाहिनी सांडपाणी वाहणाऱ्या गटारीला चिटकून आहे. सांडपाणी व गळती लागलेल्या जलवाहिनीतील पाणी मिश्रित होत असून, येथील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी प्राधिकरणाला कळवून देखील प्राधिकरण तात्पुरती मलमपट्टी करून जातात व पुन्हा दोन दिवसांनी जलवाहिनीला गळती लागते. पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्याने ही मलमपट्टी टिकत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.जलवाहिनीला ज्या ठिकाणी गळती लागली आहे, त्या ठिकाणी पडलेल्या डबक्यात मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक गोंधळ घालत आहेत. धुणे, भांडी, अंघोळीसुद्धा या ठिकाणी होत असून, जणू काही या ठिकाणी धोबीघाटच आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली असून, काही विघ्नसंतोषी नागरिकच या जलवाहिनीला फोडत आहे, असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष पाण्याची होणारी गळती थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न करणारी जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांना १५ वर्षांहून अधिक काळ झाला. या जलवाहिनीची गळती काढता आली नाही. दिवसरात्र पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीलाच गळती लागली असल्याने प्राधिकरणाचे या १५ वर्षांत किती नुकसान झाले याचा अंदाजसुद्धा लावता येणार नसल्याचे नागरीक सांगतात..पाण्याच्या दाबाने गळती जीवन प्राधिकरणाच्या या जलवाहिनीला प्रचंड पाण्याचा दाब असून या परिसरातल्या पाईपला दोन बेंड आहेत. त्यामुळे ही जलवाहिनी सतत फुटत आहे. रात्रं दिवस पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने त्याची तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक आहे.- राजेंद्र यादव