शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सव्वा तपापासून जलवाहिनीला गळती

By admin | Updated: August 13, 2015 22:45 IST

विद्यानगर वसाहत : दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप

सातारा : शहरात अनेक आंदोलने हे पाण्यासाठी होतात. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा अशा अनेक कारणांना संबंधित विभागाला तोंड द्यावे लागते; परंतु येथील औद्योगिक वसाहतीमध्ये याला अपवादात्मक गोष्ट म्हणजे येथील पाण्याच्या टाकीला पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला एक-दोन नव्हे, तर तब्बल १५ वर्षांहून अधिक काळापासून गळती लागली आहे. या गळतीमुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांमधून बोलले जात आहे. कोडोली येथील गणेश चौकाजवळील विद्यानगर वसाहतीतून औद्योगिक वसाहतीच्या जलटाकीत पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला ही गळती लागली आहे. ही जलवाहिनी जवळपास अडीच फूट व्यासाची असून, विद्यानगर येथील वसाहतीमध्ये या वाहिनीला दोन ठिकाणी वळविण्यात आल्याने येथे सतत पाण्याचा दाब असतो. त्यामुळे येथे नेहमी गळती लागलेली असते. ज्या ठिकाणी ही गळती लागली आहे, त्या ठिकाणी मोठे डबके झाले असून, शेजारहून सांडपाण्याचा नालाही या डबक्यातूनच जात आहे. त्यामुळे जलवाहिनीचे पाणी अन् सांडपाणी एकत्र मिसळत असून, हेच पाणी येथील वाहणाऱ्या ओढ्यात जात आहे. या जलवाहिनीला चोवीस तास पाणीपुरवठा होत असल्याने प्राधिकरणाचे लाखो लिटर पाणी येथून वाया जात आहे. हे सर्व पाणी ओढ्यात जात असल्याने प्राधिकरणाचे लाखो रुपये पाण्यात जात असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.दरम्यान, जलवाहिनी सांडपाणी वाहणाऱ्या गटारीला चिटकून आहे. सांडपाणी व गळती लागलेल्या जलवाहिनीतील पाणी मिश्रित होत असून, येथील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी प्राधिकरणाला कळवून देखील प्राधिकरण तात्पुरती मलमपट्टी करून जातात व पुन्हा दोन दिवसांनी जलवाहिनीला गळती लागते. पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्याने ही मलमपट्टी टिकत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.जलवाहिनीला ज्या ठिकाणी गळती लागली आहे, त्या ठिकाणी पडलेल्या डबक्यात मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक गोंधळ घालत आहेत. धुणे, भांडी, अंघोळीसुद्धा या ठिकाणी होत असून, जणू काही या ठिकाणी धोबीघाटच आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली असून, काही विघ्नसंतोषी नागरिकच या जलवाहिनीला फोडत आहे, असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष पाण्याची होणारी गळती थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न करणारी जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांना १५ वर्षांहून अधिक काळ झाला. या जलवाहिनीची गळती काढता आली नाही. दिवसरात्र पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीलाच गळती लागली असल्याने प्राधिकरणाचे या १५ वर्षांत किती नुकसान झाले याचा अंदाजसुद्धा लावता येणार नसल्याचे नागरीक सांगतात..पाण्याच्या दाबाने गळती जीवन प्राधिकरणाच्या या जलवाहिनीला प्रचंड पाण्याचा दाब असून या परिसरातल्या पाईपला दोन बेंड आहेत. त्यामुळे ही जलवाहिनी सतत फुटत आहे. रात्रं दिवस पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने त्याची तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक आहे.- राजेंद्र यादव