शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

गॅस क्लोरिनेशन प्रणालीद्वारे पाणी

By admin | Updated: April 7, 2016 23:51 IST

किरणराज यादव : ‘नगरोत्थान’मधून पाण्यासाठी ६५ लाखांचा निधी

कोरेगाव : ‘नगरविकास विभागाच्या अत्यंत महत्त्वाच्या नगरोत्थान योजनेद्वारे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नवनिर्मित कोरेगाव नगरपंचायतीसाठी ६५ लाखांचा निधी पाणी योजना विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी मंजूर केला आहे. या निधीतून जुनी पाणी शुद्धीकरण यंत्रणेऐवजी नवीन आधुनिक गॅस क्लोरिनेशन प्रणाली बसविली जाणार आहे,’ अशी माहिती प्रशासक किरणराज यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य सरकारने कोरेगावात नगरपंचायत स्थापनेनंतर अवघ्या १९ दिवसांतच शहरातील पाणी योजनांचा आढावा घेतला होता. पाणी योजनांची यंत्रणा जुनी असल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विनय कुलकर्णी यांच्यासह अभियंत्यांच्या टीमने पाणी योजनांची अत्यंत बारकाईने पाहणी करून नगरोत्थान योजनेतून पाणी योजना विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी सुमारे एक कोटीचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकारी मुदगल यांना सादर केले होते. मार्च अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. पाणी शुद्धीकरणासाठी जुन्या टी.सी.एल. प्रणालीला मूठमाती देऊन नव्याने मंजूर झालेल्या निधीद्वारे आधुनिक गॅस क्लोरिनेशन प्रणाली बसविली जाणार आहे. वसना-वांगणा नद्यांच्या संगमावरील जॅकवेल, पंपिंग स्टेशन, कठापूर योजनेतील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, आरफळ कॉलनी ई. एस. आर. साठी नवीन जलवाहिनी, एअर व्हॉल्व्ह दुरुस्ती केली जाणार आहे. पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शशिकांत शिंदे व जिल्हा नियोजन अधिकारी हणमंतराव माळी यांनी परिश्रम घेतल्याने कमीत कमी कालावधीत निधी मंजूर झाला असून, कामाला तातडीने सुरुवात केली जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मलकापूर पाठोपाठ कोरेगावात प्रकल्प...नगरपंचायत स्थापनेनंतर महिना संपण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने मुबलक निधी उपलब्ध करून दिल्याने विकासकामांना आता सुरुवात होणार आहे. पाणी शुद्धीकरणाबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला असून, जिल्ह्यात केवळ मलकापूर (कऱ्हाड) येथेच आधुनिक गॅस क्लोरिनेशन प्रणाली कार्यान्वित आहे. मलकापूर पाठोपाठ आता कोरेगावात ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने जनतेला शुद्ध पाणी मिळणार आहे. दलित वस्ती सुधारण्यासाठी २५ लाखांचा निधी...शहरातील दलित वस्ती सुधारण्यासाठी स्वतंत्रपणे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रस्ते, गटार्स, जलवाहिनी व इतर विकासकामे केली जाणार आहेत, असे यादव यांनी सांगितले.