शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

भर उन्हाळ्यात गणेशखिंडीत पाण्याचे पाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:04 IST

पेट्री : सातारा शहराला कास व शहापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. कास तलावातील पाणीपातळी खालावत असतानाच गणेशखिंड परिसरातील कासच्या ...

पेट्री

: सातारा शहराला कास व शहापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. कास तलावातील पाणीपातळी खालावत असतानाच गणेशखिंड परिसरातील कासच्या एअर व्हॉल्व्हच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. भर उन्हाळ्यात वाहून जात असलेल्या पाण्याचे पाट थांबविण्यासाठी दुरुस्ती करून गळती थांबविण्याची मागणी केली जात आहे.

कास तलावामधून सातारा शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होत असतो. सद्य:स्थितीला उन्हाची तीव्रता तसेच शहराला दररोज होत असलेल्या एक ते दीड इंचापर्यंतचा पाणीपुरवठा यामुळे कास तलावातील शिल्लक पाणीसाठा नऊ फुटाच्या खाली आला आहे. आत्तापर्यंत झालेल्या वळीव पावसाने तलावाच्या पाणीपातळीत कसलीच वाढ झालेली नसून केवळ जमिनीची धर धरण्यास मदत झाली आहे. यामुळे मान्सूनला सुरुवात होईपर्यंत पुरेसा पाणीसाठा शिल्लक असणे महत्त्वाचे आहे. मागीलवर्षी परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कमी कमी होत गेला. तसेच दिवसा उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने गतवर्षीपेक्षा यंदा एक फुटाने पाणीसाठा कमी शिल्लक आहे. खालावलेली पाणीपातळी पाहता गतवर्षीपेक्षा यंदा दहा ते बारा दिवस अगोदर दुसरा व्हॉल्व्ह बंद करून तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहून पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे वारंवार आवाहन केले जात आहे. दुसरीकडे सातारा-कास रस्त्यावरील गणेशखिंड परिसरातील कासच्या एका एअर व्हॉल्व्हच्या ठिकाणी कित्येक दिवसांपासून गळती लागली आहे. आत्तापर्यंत लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे.

चौकट

सातारा-कास मार्गावरील गणेशखिंड परिसर ठिकाणी कासच्या व्हॉल्व्हला गळती लागून वाया जाणारे पाणी मोठ्या प्रमाणावर साठून रस्त्यानजीकच्या चरीतून वाहत असल्याने लवकरात लवकर या व्हॉल्व्हची गळती थांबवून पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी होत आहे.

कोट

उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर असून कडक उन्हाळा जाणवत आहे. यामुळे पश्चिमेकडील काही भागांत बहुतांशी ठिकाणी पाणीटंचाईचे चित्र आहे. मात्र, गणेशखिंड परिसरातील गेल्या कित्येक दिवसांपासून कासच्या एका व्हॉल्व्हला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने गळती थांबवण्यासाठी दुरुस्ती करण्यात यावी.

- बाळासाहेब काळे,

नागरिक, सातारा.

०४कास वॉटर

सातारा-कास मार्गावर गणेशखिंड परिसरात कासच्या एअर व्हॉल्व्हला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. (छाया : सागर चव्हाण)