शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

धरणातला पाणीसाठी अडकला ‘गाळात’!

By admin | Updated: May 30, 2016 00:44 IST

पाणी साठणार तरी कसं? : क्षमतेएवढं पाणी साठतच नसल्याचं वास्तव चित्र

 सागर गुजर -- सातारा  साताऱ्यासह सांगली जिल्ह्याचे शेतीक्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या जिल्ह्यातील धरणांतील गाळ हा मोठा प्रश्न सध्या आ वासून उभा आहे. जिल्ह्यामध्ये जलसिंचनाचे तब्बल ३१ लहान-मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांनी सलग दोन वर्षे पडलेल्या दुष्काळाशी लढण्याचे बळ लोकांना दिले; परंतु यापैकी बहुतांश प्रकल्पांमध्ये गाळाचे साम्राज्य साठले असल्याने येत्या पावसाळ्यात जरी चांगला पाऊस झाला, तरी पाणी साठविण्यावर मर्यादा येणार आहेत. पावसाळ्यामध्ये धरणांतील पाणीसाठ्याचे परिमाण जलसंपदा खात्याकडे असते; परंतु वास्तवात धरणांत साठलेल्या गाळामुळे क्षमतेइतकेही पाणी धरणांमध्ये साठू शकत नाही, हे वास्तव चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरण प्रकल्पांतील गाळच काढला जात नसल्याने वर्षानुवर्षे गाळाचे प्रमाण वाढतच चालले आहे. साहजिकच गाळामुळे पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पाऊस कितीही झाला तरी एका मर्यादेच्या पलीकडे पाणी साठवता येत नसल्याने धरणांतील पाणी नदीत सोडून दिले जाते.पावसाळ्यामध्ये धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारी उपलब्ध होते, ती या साठलेल्या गाळासकट असते. गाळ वगळून पाण्याची मोजदाद निश्चितच कमी भरते. गळती झालेल्या कालव्यांमुळे पाणी वाया जाते, हे डोळ्याने दिसणारे चित्र आहे; परंतु धरणांच्या पोटात साठलेल्या गाळाला जलसंपदा खाते कोणता ‘मायक्रोस्कोप’ लावणार आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. या साठलेल्या गाळाबाबत कोणी चकार शब्द काढायला तयार नाही. गाळ काढल्यास मोठा पाणीसाठा निर्माण होऊ शकतो. प्रकल्पनिहाय क्षमता व उद्देशउरमोडी-परळी जवळच्या या धरणाची ९.९६ टीएमसी इतकी पाणी साठविण्याची क्षमता आहे. या धरणाद्वारे सातारा, खटाव, माण तालुक्यांतील एकूण २७ हजार ७५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.धोम-बलकवडी या धरणाची ४.०८ टीएमसी इतकी पाणी साठवण क्षमता आहे. भोर, खंडाळा, फलटण तालुक्यांती १८ हजार १०० हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली येणार आहे.तारळी-पाटण तालुक्यांतील डांगिष्टेवाडी येथील या धरणाची ५.९५ टीएमसी इतकी आहे. या धरणाद्वारे सातारा, खटाव, माण, पाटण, कऱ्हाड तालुक्यांतील १४ हजार २७३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणायचे आहे.महू-हातगेघर - कुडाळी नदीवरील या धरणाची क्षमता ०.२६ टीएमसी इतकी असणार आहे; या धरणाद्वारे जावळी तालुक्यातील ५ हजार ३२७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणावयाचे असून, गेल्या कित्येक वर्षांपासून या धरणाचे काम रखडलेले आहे.मोरणा-गुरेघर- पाटण तालुक्यातील मोरणा नदीवर गुरेघर गावाजवळ १.३९६ क्षमतेचे हे धरण असून, याद्वारे पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील ३ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणावयाचे आहे.