शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

धरणातला पाणीसाठी अडकला ‘गाळात’!

By admin | Updated: May 30, 2016 00:44 IST

पाणी साठणार तरी कसं? : क्षमतेएवढं पाणी साठतच नसल्याचं वास्तव चित्र

 सागर गुजर -- सातारा  साताऱ्यासह सांगली जिल्ह्याचे शेतीक्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या जिल्ह्यातील धरणांतील गाळ हा मोठा प्रश्न सध्या आ वासून उभा आहे. जिल्ह्यामध्ये जलसिंचनाचे तब्बल ३१ लहान-मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांनी सलग दोन वर्षे पडलेल्या दुष्काळाशी लढण्याचे बळ लोकांना दिले; परंतु यापैकी बहुतांश प्रकल्पांमध्ये गाळाचे साम्राज्य साठले असल्याने येत्या पावसाळ्यात जरी चांगला पाऊस झाला, तरी पाणी साठविण्यावर मर्यादा येणार आहेत. पावसाळ्यामध्ये धरणांतील पाणीसाठ्याचे परिमाण जलसंपदा खात्याकडे असते; परंतु वास्तवात धरणांत साठलेल्या गाळामुळे क्षमतेइतकेही पाणी धरणांमध्ये साठू शकत नाही, हे वास्तव चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरण प्रकल्पांतील गाळच काढला जात नसल्याने वर्षानुवर्षे गाळाचे प्रमाण वाढतच चालले आहे. साहजिकच गाळामुळे पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पाऊस कितीही झाला तरी एका मर्यादेच्या पलीकडे पाणी साठवता येत नसल्याने धरणांतील पाणी नदीत सोडून दिले जाते.पावसाळ्यामध्ये धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारी उपलब्ध होते, ती या साठलेल्या गाळासकट असते. गाळ वगळून पाण्याची मोजदाद निश्चितच कमी भरते. गळती झालेल्या कालव्यांमुळे पाणी वाया जाते, हे डोळ्याने दिसणारे चित्र आहे; परंतु धरणांच्या पोटात साठलेल्या गाळाला जलसंपदा खाते कोणता ‘मायक्रोस्कोप’ लावणार आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. या साठलेल्या गाळाबाबत कोणी चकार शब्द काढायला तयार नाही. गाळ काढल्यास मोठा पाणीसाठा निर्माण होऊ शकतो. प्रकल्पनिहाय क्षमता व उद्देशउरमोडी-परळी जवळच्या या धरणाची ९.९६ टीएमसी इतकी पाणी साठविण्याची क्षमता आहे. या धरणाद्वारे सातारा, खटाव, माण तालुक्यांतील एकूण २७ हजार ७५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.धोम-बलकवडी या धरणाची ४.०८ टीएमसी इतकी पाणी साठवण क्षमता आहे. भोर, खंडाळा, फलटण तालुक्यांती १८ हजार १०० हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली येणार आहे.तारळी-पाटण तालुक्यांतील डांगिष्टेवाडी येथील या धरणाची ५.९५ टीएमसी इतकी आहे. या धरणाद्वारे सातारा, खटाव, माण, पाटण, कऱ्हाड तालुक्यांतील १४ हजार २७३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणायचे आहे.महू-हातगेघर - कुडाळी नदीवरील या धरणाची क्षमता ०.२६ टीएमसी इतकी असणार आहे; या धरणाद्वारे जावळी तालुक्यातील ५ हजार ३२७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणावयाचे असून, गेल्या कित्येक वर्षांपासून या धरणाचे काम रखडलेले आहे.मोरणा-गुरेघर- पाटण तालुक्यातील मोरणा नदीवर गुरेघर गावाजवळ १.३९६ क्षमतेचे हे धरण असून, याद्वारे पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील ३ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणावयाचे आहे.