शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

बिबी परिसरात कारखान्याची मळी सोडल्याने पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:29 IST

आदर्की : बिबी गावच्या परिसरात कारखान्याची मळी, डिस्टिलरीचे पाणी सोडल्याने पाणी दूषित होत असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. कोणीही ...

आदर्की : बिबी गावच्या परिसरात कारखान्याची मळी, डिस्टिलरीचे पाणी सोडल्याने पाणी दूषित होत असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. कोणीही कोणत्याही कारखान्याची मळी किंवा दूषित पाणी सोडल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

बिबी, ता. फलटण येथील ऑनलाइन ग्रामसभा सरपंच प्रीती काशीद यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी ग्रामसेवक हणमंत चव्हाण यांनी ग्रामसभेपुढील विषयाचे वाचन केले.

सभेमध्ये दारू, मटका, मळी यावर चर्चा झाली.

मोहन बोबडे यांनी मदनेवस्ती येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याचे सांगितले. यावर ग्रामसेवक चव्हाण यांनी हातपंप घेण्याचा प्रस्ताव दिला आहे; पण भूजल सर्वेक्षण विभागाने मनुष्यबळ नसल्याने उशीर होत आहे; पण लवकरच खासगी लोकांकडून सर्वेक्षण करणार असल्याचे सांगितले.

कृषी सहायक गोविद शिंगाडे यांनी फळभाग, नापेड, यांत्रिकीकरण यांची माहिती दिली. शासनाने कृषी समिती निवडीची माहिती मागविल्याने ग्रामपंचायत सदस्यांबरोबर चर्चा करून शासनाला दिली आहे. त्यास ग्रामसभेने मंजुरी देण्याची मागणी केली.

त्यावेळी सुभाष बोबडे यांनी समिती सदस्यांची यादी वाचून दाखविण्यास सांगितले. अप्पासाहेब मोरे यांनी गावात कोरोना संसर्ग वाढत असून, गावात सर्वेक्षण करण्याची सूचना मांडली. यावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य

कर्मचारी, ग्रामपंचायत सर्वेक्षण सुरू केले. संशयित रुग्ण किंवा पॉझिटिव्ह रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल न झाल्यास पोलीस स्टेशनला कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना प्रीती काशीद यांनी सर्वांच्या सहकार्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पंचवीस टक्के निधी त्यावर खर्च करण्यात येणार आहे; पण शासनाच्या मार्गदर्शक सूचना आल्या नाहीत.

विहिरीवर झाकण टाकणे, नळ पाणीपुरवठा योजना आदींवर खर्च करण्यात येणार आहे. कामासंदर्भात ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन

केले. ऑनलाइन ग्रामसभेत उपसरपंच सचिन बोबडे, अप्पासाहेब मोरे, विशाल बोबडे, अमोल बोबडे, विजय बोबडे, बबन बोबडे, रावसाहेब बोबडे आदी ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.