शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

महर्षी शिंदे विद्यालयात शुद्ध पाण्याची वॉटर बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 00:20 IST

वाई : दोन हजार लिटर क्षमता; ८०० विद्यार्थ्यांना फायदा, पाण्याचे ओळखले महत्त्व

वाई : पाणी म्हणजे जीवन असे म्हणतात. कारण दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे स्वच्छ व शुद्ध पाणी पिणे हितकारक असते. असाच विचार करून वाईतील महर्षी शिंदे विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्याची वॉटर बँक तयार करण्यात आली आहे. त्यासाठी एका बँकेने अर्थसहाय्य केले आहे. त्यामुळे संबंधित मशीनमध्ये २ हजार लिटर शुद्ध पाणी साठवणूक होणार आहे. तसेच ८०० विद्यार्थ्यांना पाणी मिळणार आहे. शेतामध्ये रासायनिक खतांचा व औषधांचा वारेमाप वापर होत आहे. तसेच औद्योगिकीकरणात झपाट्याने वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणावर हवेत कार्बन डायआॅक्साईड व इतर विषारी वायू सोडले जात आहेत. तसेच कारखान्यामधून सोडले जाणारे दूषित केमिकल मिश्रित पाणी यांचा एकत्रित परिणाम म्हणून पिण्याचे पाणी हे कमालीचे दूषित झाल्याचे दिसत आहे. पाणी हा घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. निरोगी राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी प्यावे लागते; परंतु हे पाणीच जर दूषित असेल तर यामुळे अनेक आजार होऊ शकतात. आरोग्यासाठी संजीवनी समजले जाणारे पाणी हे विष सिद्ध होऊ शकते. त्यामुळे अलीकडच्या काळात शुद्ध पाण्याचे महत्त्व वाढले आहे. शुद्ध पाण्याचे महत्त्व ओळखून वाई येथील महर्षी शिंदे विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी देण्याचा निश्चय मुख्याध्यापक बी. ए. पाटील व शिक्षक विजय मागळी यांनी केला. या विद्यालयात वाई शहरातील व ग्रामीण भागातून सुमारे ८०० मुले-मुली शिक्षणासाठी येत असतात. आपल्या विद्यालयातील ही मुलांना शुद्ध पाणी प्यायला मिळावे व त्यांचे आरोग्य निरोगी राहावे, या हेतूने प्रेरित होऊन हा प्रकल्प करण्याचे योजले. त्यांच्या या प्रयत्नाला दि बुलढाणा कॉ. बँकेने संपूर्ण अर्थिक सहकार्य केले. साधारणपणे २ लाख ५० हजारांचा हा प्रकल्प मोफत व सेवाभावी वृत्तीने बुलढाणा बँकेच्या सहकार्याने झाला. (प्रतिनिधी)मी पहिल्यापासून विद्यार्थी पितात तेच पाणी पितो. अनेक आजार हे दूषित पाण्यामुळेच होत असतात. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे व त्यांचे आरोग्य निरोगी राहावे, या उद्देशाने आम्ही प्रयत्न केले आणि त्याला बुलढाणा अर्बन बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे हा प्रकल्प होऊ शकला. - बी. ए. पाटील, मुख्याध्यापक आम्ही परगावावरून येत असतो. घरून पाणी आणवे लागत असल्याने दप्तराचा बोजा जास्त होत असे. आम्ही आणलेले पाणीही पुरेसे पडत नाही. आता आम्हाला विद्यालयात पुरेसे शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळत असल्याने आमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे.- प्रताप सोनावणे, विद्यार्थी