शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

पाणी अन् आरोग्य सेवा तुटीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:46 IST

सातारा : महसूल वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पाणी व आरोग्य या सेवा तुटीत असल्याचे अंदाजपत्रकातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

सातारा : महसूल वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पाणी व आरोग्य या सेवा तुटीत असल्याचे अंदाजपत्रकातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पाणीसेवा १५८.२६ तर आरोग्य सेवा तब्बल ३७२.२१ टक्के तुटीत आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत या विषयावर चर्चा होणे अपेक्षित होते; परंतु ऑनलाईनच्या गोंधळात या विषयावर चर्चाच झाली नाही.

शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कोणतीही करवाढ नसणारे ३०७ कोटी ४७ लाख ६६ हजार ४२४ रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहापुढे मांडले. हे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ऑलाईनमुळे कोणत्याही विषयावर तपशीलवार चर्चा करण्यात आली नसली तरी विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, महसूल वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पाणीपुरवठा व आरोग्य सेवेच्या तुटीबाबत कोणीही मत व्यक्त केले नाही.

पाणीपुरवठा सेवेपासून पालिकेला वार्षिक ३ कोटी ३९ लाख २४ हजार ८०८ रुपये उत्पन्न मिळते. मात्र, यंदा पाणीपुरवठा सेवेसाठी ८ कोटी ७६ लाख १५ हजार ५४२ रुपये जादा खर्च झाल्याची बाब समोर आली असून. पाणीपुरवठा सेवेवर उत्पन्नापेक्षा ५ कोटी ३६ हजार ९० हजार ७३४ रुपये जादा खर्च झाला असून, ही सेवा ही सेवा १५८.२६ टक्के तुटीत असल्याचे अर्थसंकल्पात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे साफसफाई सेवेपासून पालिकेला २ कोटी ४५ लाख ८१ हजार २७९ रुपये उत्पन्न मिळते. मात्र, या सेवेवर तब्बल ११ कोटी ६० लाख ७५ हजार २४७ रुपये खर्च झाला आहे. उत्पन्नापेक्षा ९ कोटी १४ लाख ९३ हजार ९६८ रुपये जादा खर्च झाल्याने ही सेवा तब्बल ३७२.२१ टक्के तुटीत आहे.

२०१९-२० च्या अंदाजपत्रकानुसार ५५.८६ टक्के तुटील असलेली दिवाबत्तीची सेवा यंदा तुटीत नाही. या सेवेपासून पालिकेला १ कोटी २५ लाख ३५ हजार ३२५ रुपये उत्पन्न मिळते. यंदा या सेवेवर ९२ लाख २३ हजार ८४३ रुपये खर्च झाला आहे. उत्पन्नापेक्षा ३३ लाख ११ हजार ८३५ रुपये कमी खर्च झाल्याने ही सेवा तुटीत नसल्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे.

लोगो : सातारा पालिकेचा फोटो