शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

वाईत नागरिकीकरणाला गैरसोयींचा विळखा

By admin | Updated: November 14, 2014 23:18 IST

मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प : सुविधा पुरविताना यंत्रणेवर ताण

वाई : वाई शहर व परिसरामध्ये नागरिकीकरण झापाट्याने वाढत आहे. याचे कारण शहराचे ऐतिहासिक महत्त्व, प्रसिद्ध पर्यटनस्थळ व राहण्यासाठी चांगले वातावरण. यामुळे मुंबई, पुण्यातील नागरिकांची पसंती वाईमध्ये सदनिका घेण्यासाठी आहे़ पण, नागरिकीकरण वाढत चालले आहे तसतसे मूलभूत सुविधा पुरविणा-या यंत्रणावर ताण येत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे़यशवंतनगर ग्रामपंचायत ही वाई शहरास लागून असल्याने झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प तयार होत आहेत. त्याप्रमाणात त्यांना मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यामध्ये गटार, कच-याचे व्यवस्थापन, पाणीपुरवठा या सुविधा देणे आवश्यक आहे. परंतु यशवंंतनगर येथील सोनजाई देवीरोड मुख्य रस्ता व उपगल्ल्यांमध्ये गटराची व्यवस्था नसल्याने मैला, सांडपाणी खुल्यावर सोडले आहे़ त्यामुळे दूषित पाण्याची डबकी साठल्याने डासांचे प्रमाण वाढल्याने साथीचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे़ तसेच येथे बांधलेल्या एका इमारतीला व इतर घरांना मैला, सांडपाणी सोडण्यासाठी गटराची सोय नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मुख्य रस्त्यावर गटराची सोय नसल्याने मैला व सांडपाणी सोडल्याने येथील नजीकच्या शासकीय हातपंपाचे पाणी दूषित झाले आहे. ते पिण्यास अपायकारक आहे़ तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली असून, त्यामध्ये दूषित पाणी शिरण्याची शक्यता आहे़ वाई-बावधन रोडवर दवाखान्यापुढील बावधनकडे जाताना नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण झाल्यामुळे तेथील पाण्याचा नैसर्गिक प्रवाहाला अटकाव झाल्याने पाणी रस्त्यावर साठत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे़ या प्रश्नाबाबत ग्रामपंचायतीस निवेदन दिले असून, अनेक ग्रामसभेत हा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर ठोस कार्यवाही झाली नाराजी व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी) नागरिकांनी अनेकवेळा निवेदने दिली. प्रत्यक्ष अवस्था दाखवण्यात आली; पणग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही़ तरी प्रत्यक्ष उपाययोजना करावी़-संपतराव सावंत, नागरिकनागरिकांनी कचरा कोठेही टाकू नये, तसेच दूषित पाण्यांच्या डबक्यांमुळे साथीचे रोगपसरण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो़ तेव्हा योग्य उपाययोजना करावी़- अ‍ॅड़ अर्जुन ननावरे, नागरिकग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरू आहे. नागरिकांनी कचरा घंटागाडीत टाकावा, तसेच सोनजाई रोड परिसरातील रहिवासी वस्तीसाठी भुयारी गटार योजना मंजूर करीत आहोत, त्यामुळे तेथील समस्या संपतील. ---महेश सावंत, उपसरपंच यशवंतनगर