शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तापमानवाढीचा डोक्याला ‘ताप’!

By admin | Updated: April 27, 2016 00:55 IST

डोईवर छत्र्यांचं छत्र : साताराचा पारा चाळिशीवरून हटेना

सातारा : कुठे धूर निघत असला तर आपण सहज म्हणतो की, कुठे तरी काही तरी पेटतंय! काही पेटल्याशिवाय धूर निघत नाही, हे जसं खरं आहे, तसंच वाढतं तापमान पाहता पृथ्वीला जाळण्याचं काम सुरू आहे, हेच यावरून सिद्ध होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सातारा शहराचं एप्रिल महिन्यातील बहुतांश वेळा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे. मंगळवारी शहरात ४०.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. वाढत्या तापमानामुळे अनेक समस्या उद्भवल्या असून हा डोक्याचा ‘ताप’ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातील तापमानाची आकडेवारी पाहिली तर दि. ३० एप्रिल २०१५ या दिवशी सर्वाधिक म्हणजे ३९.९ अंश सेल्सिअस तामपानाची नोंद झाली होती. इतर दिवसांचे तापमान मात्र ३३, ३४, ३५, ३६ अंशाच्या आसपास फिरत होते. त्यामानाने यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमानानं चाळिशीच्या घरात प्रवेश केला व पुढे पंधरा दिवस तापमानाचा पारा हा ३८, ३९ अंश सेल्सिअस असाच राहिल्याचे दिसते. दि. १५ एप्रिल २०१६ पासून मात्र सातारा शहरातील तापमानानं चाळिशीचं घर काही सोडलेले दिसत नाही. उलट त्यामध्ये वाढच झालेली दिसते. (प्रतिनिधी) हातातील वस्तू डोक्यावर!भर उन्हात बाहेर पडलेले अनेक नागरिक आपल्याकडील वस्तूंचा उन्हापासून बचाव होण्यासाठी वापर करतात. मग ती छत्री असेल, बॅग असेल किंवा अन्य कोणतीही वस्तू. घरात डोक्यावर पदर न घेणाऱ्या महिला उन्हात गेल्यावर मात्र डोकं उन्हानं तापू नये म्हणून डोक्यावर पदर घेतात. कुणी कागदपत्रांची पिशवी डोक्यावर ठेवून उन्हाच्या चटक्यापासून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसतात.वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी सातारकर नागरिक विविध उपाय करत आहेत. वृद्ध, महिलावर्ग घरातून बाहेर पडताना डोक्यावर छत्री घेतात. तर दुचाकीवरून प्रवास करणारे युवक हेल्मेट, रुमाल, मास्कचा वापर करताना दिसतात. दुचाकी चालविताना युवती मात्र स्वत:ला कपड्यात लपेटून घेत आहेत. स्टोलने डोके व चेहरा झाकून टाकतात आणि डोळ्यांना गॉगल लावतात. कोपरापर्यंतचे हातमोजांचा वापर करतात.