शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

वर्‍हाडी आले.. समतेचे विचार घेऊन गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:55 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विवाह सोहळा म्हटलं की डामडौल आलाचं. परंतु या डामडौल व अतिरिक्त खर्चाला बगल देत साताऱ्यात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषांचे विचार समाजमनात रुजावे, यासाठी विवाहाला आलेल्या वºहाडी मंडळींना संविधानासह महापुरुषांची स्फूर्तीदायी पुस्तके ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विवाह सोहळा म्हटलं की डामडौल आलाचं. परंतु या डामडौल व अतिरिक्त खर्चाला बगल देत साताऱ्यात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषांचे विचार समाजमनात रुजावे, यासाठी विवाहाला आलेल्या वºहाडी मंडळींना संविधानासह महापुरुषांची स्फूर्तीदायी पुस्तके भेट स्वरुपात देण्यात आली. या अनोख्या सोहळ्याचे उपस्थितांनी कौतुक केले.साताºयातील प्रतापसिंहनगरात राहणारे गोकुळदास निवृत्ती उदागे व पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील सुप्रिया शिंदे यांचा रविवारी साताºयात विवाह सोहळा पार पडला. गोकुळदास उदागे हे ग्रामसेवक असून, त्यांना समाजकार्याची पूर्वीपासून आवड आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले या थोर महापुरुषांच्या विचाराने प्रभावित झालेल्या उदागे यांनी समाजात समता, बंधूता व एकता रुजविण्यासाठी काहीतरी वेगळं करावं, असा संकल्प चार वर्षांपूर्वी केला होता. त्यानुसार आपल्या विवाहात फटाके व डॉल्बीसारख्या वाद्यांवर खर्च न करता विवाहाला उपस्थित राहणाºया वºहाडी मंडळींना भारतीय संविधान व महापुरुषांची पुस्तके भेट स्वरुपात देण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्या या निर्णयाचे कुटुंबीय व मित्रपरिवारानेही स्वागत केले.गोकुळदास उदागे यांनी स्वत: तसेच मित्रांच्या मदतीने भारतीय संविधान व महापुरुषांची एक हजार पुस्तके खरेदी केली. या पुस्तकाचे त्यांनी लग्नाला आलेल्या वºहाडी मंडळींना वाटप केले. या पुस्तकांमध्ये राज्यघटनेसह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाडचा मुक्तीसंग्राम अशा पुस्तकांचा समावेश होता. सद्य:परिस्थिती पाहता आजचा समाज महापुरुषांच्या विचारापासून भरकटत चालला आहे. जाती-पातीच्या भिंती तोडून या समाजात थोर महापुरुषांचे विचार रुजविण्याबरोबरच सर्वांमध्ये समता व बंधुता निर्माण करण्यासाठी ही पुस्तके प्रेरणादायी ठरतील, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.बोधी वृक्षाच्या लागवडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेशगोकुळदास उदागे व सुप्रिया शिंदे यांनी रेशीमगाठ बांधण्यापूर्वी बोधी (पिंपळ) वृक्षाचे रोपण केले. बोधी वृक्षाचे वैज्ञानिक कारण म्हणजे चोवीस तास आॅक्सिजन देणारा या वृक्ष आहे. या वृक्षाचा आदर्श ठेवून प्रत्येकाने स्वत:सह इतरांच्या जीवनात आनंदरुपी प्राणवायू फुंकावा तसेच पर्यावरणाचे रक्षण करावे, असा संदेश उदागे यांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून दिला.