शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वर्‍हाडी आले.. समतेचे विचार घेऊन गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:55 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विवाह सोहळा म्हटलं की डामडौल आलाचं. परंतु या डामडौल व अतिरिक्त खर्चाला बगल देत साताऱ्यात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषांचे विचार समाजमनात रुजावे, यासाठी विवाहाला आलेल्या वºहाडी मंडळींना संविधानासह महापुरुषांची स्फूर्तीदायी पुस्तके ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विवाह सोहळा म्हटलं की डामडौल आलाचं. परंतु या डामडौल व अतिरिक्त खर्चाला बगल देत साताऱ्यात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषांचे विचार समाजमनात रुजावे, यासाठी विवाहाला आलेल्या वºहाडी मंडळींना संविधानासह महापुरुषांची स्फूर्तीदायी पुस्तके भेट स्वरुपात देण्यात आली. या अनोख्या सोहळ्याचे उपस्थितांनी कौतुक केले.साताºयातील प्रतापसिंहनगरात राहणारे गोकुळदास निवृत्ती उदागे व पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील सुप्रिया शिंदे यांचा रविवारी साताºयात विवाह सोहळा पार पडला. गोकुळदास उदागे हे ग्रामसेवक असून, त्यांना समाजकार्याची पूर्वीपासून आवड आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले या थोर महापुरुषांच्या विचाराने प्रभावित झालेल्या उदागे यांनी समाजात समता, बंधूता व एकता रुजविण्यासाठी काहीतरी वेगळं करावं, असा संकल्प चार वर्षांपूर्वी केला होता. त्यानुसार आपल्या विवाहात फटाके व डॉल्बीसारख्या वाद्यांवर खर्च न करता विवाहाला उपस्थित राहणाºया वºहाडी मंडळींना भारतीय संविधान व महापुरुषांची पुस्तके भेट स्वरुपात देण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्या या निर्णयाचे कुटुंबीय व मित्रपरिवारानेही स्वागत केले.गोकुळदास उदागे यांनी स्वत: तसेच मित्रांच्या मदतीने भारतीय संविधान व महापुरुषांची एक हजार पुस्तके खरेदी केली. या पुस्तकाचे त्यांनी लग्नाला आलेल्या वºहाडी मंडळींना वाटप केले. या पुस्तकांमध्ये राज्यघटनेसह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाडचा मुक्तीसंग्राम अशा पुस्तकांचा समावेश होता. सद्य:परिस्थिती पाहता आजचा समाज महापुरुषांच्या विचारापासून भरकटत चालला आहे. जाती-पातीच्या भिंती तोडून या समाजात थोर महापुरुषांचे विचार रुजविण्याबरोबरच सर्वांमध्ये समता व बंधुता निर्माण करण्यासाठी ही पुस्तके प्रेरणादायी ठरतील, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.बोधी वृक्षाच्या लागवडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेशगोकुळदास उदागे व सुप्रिया शिंदे यांनी रेशीमगाठ बांधण्यापूर्वी बोधी (पिंपळ) वृक्षाचे रोपण केले. बोधी वृक्षाचे वैज्ञानिक कारण म्हणजे चोवीस तास आॅक्सिजन देणारा या वृक्ष आहे. या वृक्षाचा आदर्श ठेवून प्रत्येकाने स्वत:सह इतरांच्या जीवनात आनंदरुपी प्राणवायू फुंकावा तसेच पर्यावरणाचे रक्षण करावे, असा संदेश उदागे यांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून दिला.