शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडी आले.. समतेचे विचार घेऊन गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:55 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विवाह सोहळा म्हटलं की डामडौल आलाचं. परंतु या डामडौल व अतिरिक्त खर्चाला बगल देत साताऱ्यात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषांचे विचार समाजमनात रुजावे, यासाठी विवाहाला आलेल्या वºहाडी मंडळींना संविधानासह महापुरुषांची स्फूर्तीदायी पुस्तके ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विवाह सोहळा म्हटलं की डामडौल आलाचं. परंतु या डामडौल व अतिरिक्त खर्चाला बगल देत साताऱ्यात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषांचे विचार समाजमनात रुजावे, यासाठी विवाहाला आलेल्या वºहाडी मंडळींना संविधानासह महापुरुषांची स्फूर्तीदायी पुस्तके भेट स्वरुपात देण्यात आली. या अनोख्या सोहळ्याचे उपस्थितांनी कौतुक केले.साताºयातील प्रतापसिंहनगरात राहणारे गोकुळदास निवृत्ती उदागे व पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील सुप्रिया शिंदे यांचा रविवारी साताºयात विवाह सोहळा पार पडला. गोकुळदास उदागे हे ग्रामसेवक असून, त्यांना समाजकार्याची पूर्वीपासून आवड आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले या थोर महापुरुषांच्या विचाराने प्रभावित झालेल्या उदागे यांनी समाजात समता, बंधूता व एकता रुजविण्यासाठी काहीतरी वेगळं करावं, असा संकल्प चार वर्षांपूर्वी केला होता. त्यानुसार आपल्या विवाहात फटाके व डॉल्बीसारख्या वाद्यांवर खर्च न करता विवाहाला उपस्थित राहणाºया वºहाडी मंडळींना भारतीय संविधान व महापुरुषांची पुस्तके भेट स्वरुपात देण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्या या निर्णयाचे कुटुंबीय व मित्रपरिवारानेही स्वागत केले.गोकुळदास उदागे यांनी स्वत: तसेच मित्रांच्या मदतीने भारतीय संविधान व महापुरुषांची एक हजार पुस्तके खरेदी केली. या पुस्तकाचे त्यांनी लग्नाला आलेल्या वºहाडी मंडळींना वाटप केले. या पुस्तकांमध्ये राज्यघटनेसह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाडचा मुक्तीसंग्राम अशा पुस्तकांचा समावेश होता. सद्य:परिस्थिती पाहता आजचा समाज महापुरुषांच्या विचारापासून भरकटत चालला आहे. जाती-पातीच्या भिंती तोडून या समाजात थोर महापुरुषांचे विचार रुजविण्याबरोबरच सर्वांमध्ये समता व बंधुता निर्माण करण्यासाठी ही पुस्तके प्रेरणादायी ठरतील, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.बोधी वृक्षाच्या लागवडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेशगोकुळदास उदागे व सुप्रिया शिंदे यांनी रेशीमगाठ बांधण्यापूर्वी बोधी (पिंपळ) वृक्षाचे रोपण केले. बोधी वृक्षाचे वैज्ञानिक कारण म्हणजे चोवीस तास आॅक्सिजन देणारा या वृक्ष आहे. या वृक्षाचा आदर्श ठेवून प्रत्येकाने स्वत:सह इतरांच्या जीवनात आनंदरुपी प्राणवायू फुंकावा तसेच पर्यावरणाचे रक्षण करावे, असा संदेश उदागे यांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून दिला.