शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती

By admin | Updated: May 12, 2015 23:41 IST

रणसिंगवाडीत पाणीटंचाई : जलस्रोत आटले; टॅँकरचा प्रस्ताव धूळखात; प्रशासनाचे मात्र अजूनही दुर्लक्षच

पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात डोंगराळ परिस्थितीत जगणाऱ्या रणसिंगवाडी या गावातील लोकांचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गावात आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याने घरातील मोठ्या माणसांबरोबर लहान मुलांनासुद्धा रखरखत्या उन्हात पाण्याच्या शोधार्थ घराबाहेर भटकावे लागत आहे. गेल्या महिन्यात २० एप्रिल रोजी टँकर मागणीचा प्रस्ताव येथील ग्रामपंचायतीने पंचायत समिती कार्यालयाकडे देऊन सुद्धा अद्याप काहीही कार्यवाही झाली नाही.रणसिंगवाडी हे या तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील एक हजार तीनशे लोकसंख्येचे गाव आहे. गावातील प्रत्येकाकडे पशुधन ही मोठ्या प्रमाणावर आहे. या गावासाठी असलेल्या दोन्ही पाणीपुरवठा योजना केव्हाच कोलमडून गेल्या आहेत. उन्हामुळे विहिरींही कोरड्या पडल्या आहेत. शासन दरबारी पिण्याच्या पाणी टँकरची मागणी महिन्याभरापूर्वी करूनही येथील जनतेकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.शासनाचे दोन टँकरने पाणी आणून गावातील आडात सोडले तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक भागाला एक-एक दिवस पाणीपुरवता येईल; मात्र नेत्यांना रणसिंगवाडी ग्रामस्थांकडे पाहण्यास वेळ मिळत नसल्याने येथील जनता कमालीची संतापली आहे. ग्रामस्थांना स्वत:बरोबरच जनावरांची तहान भागविणे अक्षरश: मुश्कील झाले आहे. येथील लोकांचा दिवस उजाडतो आणि मावळतो तो फक्त पाण्यासाठीच. शासकीय स्तरावरून उपाययोजना करताना केवळ कागदोपत्री पूर्तता नको, तर प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षा रणसिंगवाडीचे ग्रामस्थांंमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)पशुधन धोक्यात तीव्र दुष्काळी स्थितीमुळे उत्तर खटाव तालुक्यातील जनता पाणी, समस्यांनी अक्षरश: हैराण झाली आहे. दुष्काळाच्या वाढत्या झळांनी नागरिकांसह जनावरांची स्थिती बिकट करून ठेवली आहे. पाण्याअभावी जगणे मुश्कील झाले असून, अशा परिस्थितीत लाखमोलाचे पशुधन कवडीमोल किमतीत विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नाही. ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात विविध निवडणुकांत दंग झालेल्या व गुलालात लाल झालेल्या लोकप्रतिनिधींना येथील जनतेच्या दु:खाची जराही जाणीव होताना दिसत नाही.येत्या दोन चार दिवसांत पाण्याचा टँकर शासनाने सुरू न केल्यास ग्रामस्थ जनावरांसह वडूज तहसील व पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात आहेत .