शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिचारी गावातून फिरती... कोरोना घेऊन यायची..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST

कोरोना शिरकाव झाल्यापासून तळागाळात काम केवळ आशा वर्कर्स करत आहेत. घरोघरी जाऊन ग्रामस्थांचा सर्व्हे करतात. कोणाला सर्दी, खोकला, ताप ...

कोरोना शिरकाव झाल्यापासून तळागाळात काम केवळ आशा वर्कर्स करत आहेत. घरोघरी जाऊन ग्रामस्थांचा सर्व्हे करतात. कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का, याची माहिती संकलित करत असत. तसेच कोरोनाबाधित गावातून कोणी आलेले आहेत का? याची माहिती त्यांना ठेवावी लागत. यातून कोरोना संशयित व्यक्ती वाटली तर ती माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यावी लागते. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून फोन करून पाठपुरवा घेतला जातो. मात्र विलगीकरणात ठेवले जाईल या भीतीने अनेक ठिकाणी आशांवर गावकऱ्यांनी राग काढल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामस्थ खरी माहिती दडवत असतात.

एका गावात कोरोनाबाधित क्षेत्रातून एक मुलगा आला होता. त्याच्या हातावर शिक्का मारलेला होता. तरीही तो गावातून फिरत होता. यामुळे शेजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. पण कोण बोलणार, वाईट कोणी व्हायचं म्हणून आशा स्वयंसेविकेला माहिती देण्यात आली. साहजिकच याबाबत त्या संबंधित घरी गेल्या असता तेथील महिलांनी ‘आशा’लाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. असे अनुभव सर्वच आशांना कमी-अधिक प्रमाणात आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकारी, दक्षता समितीचे पदाधिकारी चांगले असते तर ते पाठीशी राहतात. मात्र बहुतांश वेळेला उपेक्षाच पदरात पडली आहे.

चौकट :

घराकडेही कोणी फिरकत नाही

आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन काम करतात. त्यांच्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल, या भीतीमुळे गावातील लोक त्यांच्या घराकडेही फिरकत नाहीत. तर जास्त सदस्य असलेल्या आशांच्या घरातूनही त्यांचा तिरस्कार केला जात होता. अनेकांना सर्वांसोबत जेवण न देणे, मिसळू न देणे असे प्रकार घडले आहेत.

कोट :

कोरोना महामारी आली आहे. कोरोनापासून समाजाला वाचविण्यासाठी आम्ही जनजागृती करतो. अनेकदा वाईट अनुभव आले; पण दक्षता समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी कायम सोबत राहिले.

- संगीता दरेकर,

आशा स्वयंसेविका, खटाव.

जबाबदारी

३४२ घरे

१,३५० लोकसंख्या

काय बाय यांना पडलंय...

एक आशा वर्कर दररोज २५ ते ३० घरी भेटी देते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्यांना त्याच घरी जावे लागतेे. अशा वेळी घरात कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का विचारावे लागते. पण सतत घरी जाणे, तेच प्रश्न विचारल्याने ग्रामस्थ चिडतात. ‘काय बाय यांना पडलंय..’ म्हणून चिडचिड केली जाते.

फोटो मेल केला आहे.

- जगदीश कोष्टी