शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

बिचारी गावातून फिरती... कोरोना घेऊन यायची..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST

कोरोना शिरकाव झाल्यापासून तळागाळात काम केवळ आशा वर्कर्स करत आहेत. घरोघरी जाऊन ग्रामस्थांचा सर्व्हे करतात. कोणाला सर्दी, खोकला, ताप ...

कोरोना शिरकाव झाल्यापासून तळागाळात काम केवळ आशा वर्कर्स करत आहेत. घरोघरी जाऊन ग्रामस्थांचा सर्व्हे करतात. कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का, याची माहिती संकलित करत असत. तसेच कोरोनाबाधित गावातून कोणी आलेले आहेत का? याची माहिती त्यांना ठेवावी लागत. यातून कोरोना संशयित व्यक्ती वाटली तर ती माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यावी लागते. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून फोन करून पाठपुरवा घेतला जातो. मात्र विलगीकरणात ठेवले जाईल या भीतीने अनेक ठिकाणी आशांवर गावकऱ्यांनी राग काढल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामस्थ खरी माहिती दडवत असतात.

एका गावात कोरोनाबाधित क्षेत्रातून एक मुलगा आला होता. त्याच्या हातावर शिक्का मारलेला होता. तरीही तो गावातून फिरत होता. यामुळे शेजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. पण कोण बोलणार, वाईट कोणी व्हायचं म्हणून आशा स्वयंसेविकेला माहिती देण्यात आली. साहजिकच याबाबत त्या संबंधित घरी गेल्या असता तेथील महिलांनी ‘आशा’लाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. असे अनुभव सर्वच आशांना कमी-अधिक प्रमाणात आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकारी, दक्षता समितीचे पदाधिकारी चांगले असते तर ते पाठीशी राहतात. मात्र बहुतांश वेळेला उपेक्षाच पदरात पडली आहे.

चौकट :

घराकडेही कोणी फिरकत नाही

आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन काम करतात. त्यांच्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल, या भीतीमुळे गावातील लोक त्यांच्या घराकडेही फिरकत नाहीत. तर जास्त सदस्य असलेल्या आशांच्या घरातूनही त्यांचा तिरस्कार केला जात होता. अनेकांना सर्वांसोबत जेवण न देणे, मिसळू न देणे असे प्रकार घडले आहेत.

कोट :

कोरोना महामारी आली आहे. कोरोनापासून समाजाला वाचविण्यासाठी आम्ही जनजागृती करतो. अनेकदा वाईट अनुभव आले; पण दक्षता समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी कायम सोबत राहिले.

- संगीता दरेकर,

आशा स्वयंसेविका, खटाव.

जबाबदारी

३४२ घरे

१,३५० लोकसंख्या

काय बाय यांना पडलंय...

एक आशा वर्कर दररोज २५ ते ३० घरी भेटी देते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्यांना त्याच घरी जावे लागतेे. अशा वेळी घरात कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का विचारावे लागते. पण सतत घरी जाणे, तेच प्रश्न विचारल्याने ग्रामस्थ चिडतात. ‘काय बाय यांना पडलंय..’ म्हणून चिडचिड केली जाते.

फोटो मेल केला आहे.

- जगदीश कोष्टी