शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

साताऱ्याला चला; पण हायवेला उतरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:03 IST

जगदीश कोष्टी।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वारगेट बसस्थानकातून सांगली, कोल्हापूर, कोकणात जाणाºया एसटी गाड्यांचे वाहक ‘सातारा, सातारा...’ असे ओरडत असतात. त्यांची गाडी साताºयात आल्यानंतर सातारा बसस्थानकासाठी शहरात न येता महामार्गावरच उभी केली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुणे आणि कोल्हापूर या दोन मोठ्या शहरांच्या ...

जगदीश कोष्टी।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वारगेट बसस्थानकातून सांगली, कोल्हापूर, कोकणात जाणाºया एसटी गाड्यांचे वाहक ‘सातारा, सातारा...’ असे ओरडत असतात. त्यांची गाडी साताºयात आल्यानंतर सातारा बसस्थानकासाठी शहरात न येता महामार्गावरच उभी केली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुणे आणि कोल्हापूर या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी सातारा आहे. तसेच पुण्याहून कोकणात जाणाºया गाड्याही साताºयातून जात असतात. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात एसटीची मोठी वर्दळ असते. दिवसभर एकाच वेळी तीन-चार गाड्या उभ्या असतात. त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातर्फेही विना थांबा सेवा पुरविली जाते. त्यामुळे सातारकरांची खूपच चांगली सोय होत असते.असंख्य सातारकर शैक्षणिक, व्यवसायाच्या निमित्ताने दररोज पुण्याला जात असतात. दिवसभर काम करून ते रात्री साताºयाला येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात येतात. तसेच अहमदनगरकडून रात्री साताºयाला येण्यासाठी सोय नसल्याने सातारकरांना पुणेमार्गे यावे लागते. ही मंडळीही शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटला येतात.स्वारगेट बसस्थानकात रात्री दहानंतर विनाथांबा गाडी बंद झालेली असते. त्यामुळे प्रवाशांना इतर विभागांच्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. सांगली, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी या गाड्या मोठ्या संख्येने तेथे उभ्या असतात. या गाड्यांमधील वाहकही ‘चला सातारा, साताराऽऽऽ’ असे ओरडतात. त्यामुळे प्रवासी धावत येऊन गाडीत बसतात. काही गाड्यांचे वाहकही गाडी गावात जाणार नसल्याचे सांगतात; पण बहुतांश वाहक याची पूर्वकल्पना देत नाहीत.एसटी सुरू झाल्यानंतर स्वारगेट बसस्थानक सोडून गाडी मार्गस्थ झाल्यानंतर तिकीट काढण्यासाठी ते जवळ येतात. तेव्हा ‘गाडी आत जाणार नाही, हाय-वेला उतरावे लागेल.’ असे सांगतात. स्वारगेट बसस्थानक सोडलेले असते. त्यामुळे अर्ध्यावर उतरूनही फायदा होत नसल्याने विचार करून प्रवासी ठिक आहे म्हणून नाईलाजाने साताºयात येतात; पण येथे आल्यावर त्यांना वाढेफाटा किंवा बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उतरावेलागते.नातेवाइकांना घ्यावे लागते बोलावूनमहामार्गावर उतरल्यानंतर साताºयात किंवा घरी जाण्यासाठी नातेवाइकांना दुचाकी घेऊन बोलावून घ्यावे लागते. त्यानंतरच ते घरी जाऊ शकतात. परंतु तिकीट काढून मनस्ताप सहन करावा लागत असल्याने असंतोष व्यक्त होत आहे.