शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

गावाच्या उजेडासाठी झिजले वीजखांब!

By admin | Updated: July 26, 2015 00:02 IST

महावितरणचे धोक्याकडे दुर्लक्ष : वाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोखंडी खांब गंजल्यामुळे धोकादायक स्थितीत उभे

संजीव वरे ल्ल वाई स्वत: अंधारात राहून इतरांना उजेड देऊन त्यांचं आयुष्य प्रकाशमान करणारे गावोगावचे वीजखांब आता म्हातारे होऊ लागले आहेत. ज्याच्या खांद्यावर बसून वीज गावात आली ते विजेचे खांब वर्षानुवर्षे ऊन-वारा-पाऊस अंगावर झेलत उभे आहेत. मात्र, त्यांचं आयुष्यही आता संपत आले असून वाई तालुक्यातील वयगाव येथे विजेचे नऊ लोखंडी खांब अक्षरश: कुजून मोडकळीस आले आहेत. गावाला उजेड देता-देता वीजखांब अक्षरश: झिजले आहेत. ही धोक्याची घंटा असून वीजखांबाच्या या दुखण्याकडं वीजवितरण कंपनीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. वाई तालुक्यातील वयगाव या गावात १९७९ मध्ये वीज आली. त्यावेळी गावात लोखंडी वीजखांब रोवून वीजपुरवठ्याची सोय केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सुमारे ३५ वर्षांपासून ते खांब गावाला उजेड देण्याचे काम करत आहेत. मात्र, वर्षानुवर्षे ऊन, वारा अन् पावसाचा मारा सहन करून लोखंडी खांबांना गंज चढला आहे. गावातील ९ लोखंडी वीजखांब गंजल्यामुळे झिजले आहेत. हे खांब लोकवस्तीत असून मोठ्या वादळवाऱ्यात कधीही जमीनदोस्त होऊ शकतात. तालुक्यातील अनेक गावातील वीजखांबांची दुरवस्था झाली आहे. वीजखांबांना गंज चढून ते मोडकळीस आले आहेत. महावितरण कंपनीने धोकादायक वीजखांब बदलावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वायरमनच्याही जिवाला धोका लोखंडी वीजखांब वर्षानुवर्षे पावसात भिजल्यामुळे गंजले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी खांबांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. अशा धोकादायक खांबावर दुरुस्तीसाठी चढणे जिवाशी खेळ आहे. जावळी तालुक्यातील आखाडे येथे शुक्रवारी तार ओढून घेण्यासाठी वीज तंत्रज्ञ खांबावर चढला असता, सिमेंटचा खांब तुटून झालेल्या दुर्घटनेत तंत्रज्ञाचा मृत्यू झाला होता. वीजखांबांच्या दुखण्याला उपचाराची गरज वाई तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये लोखंडी, सिमेंटचे वीजखांब धोकादायक स्थितीत उभे आहेत. अशा वीजखांबांचा सर्व्हे करून ते दुरुस्त करण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास वादळात दुर्घटना घडू शकते.