शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

गावाच्या उजेडासाठी झिजले वीजखांब!

By admin | Updated: July 26, 2015 00:02 IST

महावितरणचे धोक्याकडे दुर्लक्ष : वाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोखंडी खांब गंजल्यामुळे धोकादायक स्थितीत उभे

संजीव वरे ल्ल वाई स्वत: अंधारात राहून इतरांना उजेड देऊन त्यांचं आयुष्य प्रकाशमान करणारे गावोगावचे वीजखांब आता म्हातारे होऊ लागले आहेत. ज्याच्या खांद्यावर बसून वीज गावात आली ते विजेचे खांब वर्षानुवर्षे ऊन-वारा-पाऊस अंगावर झेलत उभे आहेत. मात्र, त्यांचं आयुष्यही आता संपत आले असून वाई तालुक्यातील वयगाव येथे विजेचे नऊ लोखंडी खांब अक्षरश: कुजून मोडकळीस आले आहेत. गावाला उजेड देता-देता वीजखांब अक्षरश: झिजले आहेत. ही धोक्याची घंटा असून वीजखांबाच्या या दुखण्याकडं वीजवितरण कंपनीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. वाई तालुक्यातील वयगाव या गावात १९७९ मध्ये वीज आली. त्यावेळी गावात लोखंडी वीजखांब रोवून वीजपुरवठ्याची सोय केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सुमारे ३५ वर्षांपासून ते खांब गावाला उजेड देण्याचे काम करत आहेत. मात्र, वर्षानुवर्षे ऊन, वारा अन् पावसाचा मारा सहन करून लोखंडी खांबांना गंज चढला आहे. गावातील ९ लोखंडी वीजखांब गंजल्यामुळे झिजले आहेत. हे खांब लोकवस्तीत असून मोठ्या वादळवाऱ्यात कधीही जमीनदोस्त होऊ शकतात. तालुक्यातील अनेक गावातील वीजखांबांची दुरवस्था झाली आहे. वीजखांबांना गंज चढून ते मोडकळीस आले आहेत. महावितरण कंपनीने धोकादायक वीजखांब बदलावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वायरमनच्याही जिवाला धोका लोखंडी वीजखांब वर्षानुवर्षे पावसात भिजल्यामुळे गंजले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी खांबांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. अशा धोकादायक खांबावर दुरुस्तीसाठी चढणे जिवाशी खेळ आहे. जावळी तालुक्यातील आखाडे येथे शुक्रवारी तार ओढून घेण्यासाठी वीज तंत्रज्ञ खांबावर चढला असता, सिमेंटचा खांब तुटून झालेल्या दुर्घटनेत तंत्रज्ञाचा मृत्यू झाला होता. वीजखांबांच्या दुखण्याला उपचाराची गरज वाई तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये लोखंडी, सिमेंटचे वीजखांब धोकादायक स्थितीत उभे आहेत. अशा वीजखांबांचा सर्व्हे करून ते दुरुस्त करण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास वादळात दुर्घटना घडू शकते.