शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

गावाच्या उजेडासाठी झिजले वीजखांब!

By admin | Updated: July 26, 2015 00:02 IST

महावितरणचे धोक्याकडे दुर्लक्ष : वाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोखंडी खांब गंजल्यामुळे धोकादायक स्थितीत उभे

संजीव वरे ल्ल वाई स्वत: अंधारात राहून इतरांना उजेड देऊन त्यांचं आयुष्य प्रकाशमान करणारे गावोगावचे वीजखांब आता म्हातारे होऊ लागले आहेत. ज्याच्या खांद्यावर बसून वीज गावात आली ते विजेचे खांब वर्षानुवर्षे ऊन-वारा-पाऊस अंगावर झेलत उभे आहेत. मात्र, त्यांचं आयुष्यही आता संपत आले असून वाई तालुक्यातील वयगाव येथे विजेचे नऊ लोखंडी खांब अक्षरश: कुजून मोडकळीस आले आहेत. गावाला उजेड देता-देता वीजखांब अक्षरश: झिजले आहेत. ही धोक्याची घंटा असून वीजखांबाच्या या दुखण्याकडं वीजवितरण कंपनीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. वाई तालुक्यातील वयगाव या गावात १९७९ मध्ये वीज आली. त्यावेळी गावात लोखंडी वीजखांब रोवून वीजपुरवठ्याची सोय केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सुमारे ३५ वर्षांपासून ते खांब गावाला उजेड देण्याचे काम करत आहेत. मात्र, वर्षानुवर्षे ऊन, वारा अन् पावसाचा मारा सहन करून लोखंडी खांबांना गंज चढला आहे. गावातील ९ लोखंडी वीजखांब गंजल्यामुळे झिजले आहेत. हे खांब लोकवस्तीत असून मोठ्या वादळवाऱ्यात कधीही जमीनदोस्त होऊ शकतात. तालुक्यातील अनेक गावातील वीजखांबांची दुरवस्था झाली आहे. वीजखांबांना गंज चढून ते मोडकळीस आले आहेत. महावितरण कंपनीने धोकादायक वीजखांब बदलावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वायरमनच्याही जिवाला धोका लोखंडी वीजखांब वर्षानुवर्षे पावसात भिजल्यामुळे गंजले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी खांबांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. अशा धोकादायक खांबावर दुरुस्तीसाठी चढणे जिवाशी खेळ आहे. जावळी तालुक्यातील आखाडे येथे शुक्रवारी तार ओढून घेण्यासाठी वीज तंत्रज्ञ खांबावर चढला असता, सिमेंटचा खांब तुटून झालेल्या दुर्घटनेत तंत्रज्ञाचा मृत्यू झाला होता. वीजखांबांच्या दुखण्याला उपचाराची गरज वाई तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये लोखंडी, सिमेंटचे वीजखांब धोकादायक स्थितीत उभे आहेत. अशा वीजखांबांचा सर्व्हे करून ते दुरुस्त करण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास वादळात दुर्घटना घडू शकते.