शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही वेटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:40 IST

कोरेगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील मृत्युदर जास्त असून, कोरोनाबाधित मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी शासनाकडून करण्यात आलेली स्मशानभूमीची ...

कोरेगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील मृत्युदर जास्त असून, कोरोनाबाधित मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी शासनाकडून करण्यात आलेली स्मशानभूमीची व्यवस्था आता अपुरी ठरू लागली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड यापाठोपाठ आता अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही वेटिंग करावे लागत असल्याने बाधितांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्हा प्रशासनाने आता तरी स्मशानभूमीची संख्या वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वजण अनभिज्ञ होते. त्यामुळे यंत्रणा कशीबशी काम करत होती. पहिल्या लाटेचा तडाखा मोठा नसल्याने अनेकजण घरीच औषधोपचार घेऊन बरे होत होते. त्यामुळे मृत्यूचा दर जास्त नव्हता. पहिल्या लाटेच्यावेळी जिल्हा प्रशासनाने दि. ८ जून २०२० रोजी जिल्हा आणि तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपालिका अथवा नगरपंचायतीच्या स्मशानभूमीमध्येच कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा आदेश काढला होता.

कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्‍वर आणि माण तालुक्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींची संख्या जास्त असल्याने तेथे प्रत्येकी दोन शहरांमध्ये अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आलेली होती. कोरेगाव तालुक्यात दक्षिण भागातील २६ गावांसाठी रहिमतपूरच्या ब्रम्हपुरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आलेली असून, उर्वरित ११६ गावांसाठी कोरेगाव शहरातील दोन स्मशानभूमींमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.

वास्तविक, कोरेगाव तालुक्याची भौगोलिक रचना जर पाहिली, तर उत्तर विभाग हा मोठा असून, त्याचे मुख्यालय हे पिंपोडे बुद्रुक आहे. ज्या भौगोलिक रचनेप्रमाणे कोरेगाव तालुक्याचे तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभाजन झाले आहे. त्याच धर्तीवर अंत्यविधीसाठी स्मशानभूमींचे विभाजन केले जावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जिल्हा प्रशासनाने गेल्यावर्षी जून महिन्यात काढलेल्या आदेशाची आजअखेर अंमलबजावणी सुरू आहे. कोरोनाबाधित व्यक्ती जर रुग्णालयात असेल, तर त्याच्या जवळ जाता येत नाही. मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीला जाता येत नाही. त्यामुळे अंत्यविधीनंतर हिंदू शास्त्राप्रमाणे इतर विधी करणे हे कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कोरेगाव शहरात गर्दी होत आहे. सोळशीपासून ते भाडळेपर्यंत ग्रामीण भागातील लोकांना नाहक कोरेगाव येथे जावे लागत असून, लॉकडाऊनच्या काळात वाहने उपलब्ध होणे, पोलिसांची नाकाबंदी आदी गोष्टींमुळे मृत व्यक्तीचे कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी नवीन आदेश काढून ग्रामीण भागात स्मशानभूमींची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

चौकट..

प्रशासनाच्या आदेशामध्ये बदल करावा...

कोरेगाव तालुक्यात अनेक मोठ्या ग्रामपंचायती असून, त्यांच्या स्मशानभूमी या गावापासून दूर अंतरावर आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव न होण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशामध्ये बदल करून प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय ग्रामीण भागात स्मशानभूमीची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चौकट :

सायरनच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीती...

रुग्णवाहिका चालकांना आता तरी सूचना द्या,

ग्रामीण भागात शववाहिकांचे प्रमाण कमी असल्याने कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी नेताना अथवा कोरोनाबाधित मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी नेताना रुग्णवाहिकेचा सर्रास वापर केला जात आहे. स्मशानभूमीकडे दिवसातून कमीत कमी चार ते पाच वेळा जाताना मोठमोठ्याने सायरन वाजवत रुग्णवाहिका जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे. सध्या लॉकडाऊन असून, रस्त्यावर वर्दळ नाही, त्यामुळे रुग्णवाहिका चालकांनी सायरनवर नियंत्रण आणावे, याबाबत संबंधित प्रशासन, रुग्णालयाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.