शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दिवशी घाटातील वाट बनतेय बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

ढेबेवाडी ते नवारस्ता हा २१ किलोमीटरचा घाटरस्ता असून अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. अशा ठिकाणी रात्रीच्यावेळी मृत जनावरे व ...

ढेबेवाडी ते नवारस्ता हा २१ किलोमीटरचा घाटरस्ता असून अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. अशा ठिकाणी रात्रीच्यावेळी मृत जनावरे व दुर्गंधीयुक्त अन्नपदार्थ टाकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. घाटातून प्रवास करताना प्रवाशांना तोंडाला रूमाल बांधून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घाटात कचरा टाकण्याचे प्रकार केले जात आहेत.

कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यावरील मानेगाव व काढणे गावच्या हद्दीत यापूर्वी मृत जनावरे टाकली जात होती. त्यावेळी या मार्गावर मोठी दुर्गंधी पसरत होती. यावर उपाय काढण्यासाठी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी या परिसरात मृत जनावरे टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्याठिकाणी फलक लावल्यानंतर मृत जनावरे टाकणे बंद झाले. आता हाच प्रकार ढेबेवाडी ते नवारस्ता घाटात सुरू आहे. तो थांबविण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- चौकट

घाट बनतोय अपघाती क्षेत्र

ढेबेवाडी ते नवारस्ता या घाट रस्त्यात अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणावरून कधी भरधाव तर कधी ओव्हरटेक करण्याचा वाहनचालक प्रयत्न करतात. अशावेळी अचानक वाहनांच्या आडवी जनावरे येतात. त्यामुळे अपघात होतात. मुळताच हा घाट अपघाती म्हणून ओळखला जातो. या घाटात कायम छोटे-मोठे अपघात झाले असून अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

- कोट

ढेबेवाडी ते नवारस्ता घाटातून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. घाटात मृत जनावरे टाकली जात आहेत. तसेच इतर दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्यात येत असून त्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. यावर तोडगा काढण्याची गरज आहे.

- रूपेशकुमार भोई

प्रवासी, मंदुळकोळे खुर्द