शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

तब्बल १२६४ किलोमीटर रस्त्याची अतिवृष्टीत ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात जीवित, शेती, पिकांची हानी झाली. तसेच जिल्हा परिषदेकडील तब्बल १२६४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात जीवित, शेती, पिकांची हानी झाली. तसेच जिल्हा परिषदेकडील तब्बल १२६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची वाट लागली. सर्वाधिक रस्त्यांचे नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. या रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी १९ कोटी तर कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी १०७ कोटी लागण्याचा प्राथमिक अहवाल आहे. दरम्यान, रस्ते दुरुस्त होईपर्यंत धोकादायक प्रवास असणार आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर, कास, पाटण या तालुक्यांत तुफान पाऊस पडला होता. पुरामुळे रस्ते तुटून गेले, पूल वाहिले. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाच्या मदतीने रस्ते दुरुस्त करत आहेत. पण, रस्ते कायमस्वरूपी सुरू होण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टीत प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदेकडील १२६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पाटण तालुक्यात ५१२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना फटका बसला. तर वाई तालुक्यात २३० किलोमीटर, महाबळेश्वर तालुक्यात १९८ किलोमीटर, कऱ्हाड १५७, सातारा १२१, जावळी तालुक्यात ४६ किलोमीटर लांबीचे रस्ते नादुरुस्त झाले आहेत. हे सर्व रस्ते ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग आहेत. माती भराव वाहून जाणे, दरड कोसळून रस्ता बंद होणे, मोऱ्या वाहून जाणे, संरक्षक भिंती पडणे आदी स्वरूपात रस्त्यांचे नुकसान झालेले आहे.

अतिवृष्टीतील रस्ते तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी १८ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी प्राथमिक अहवालानुसार १०७ कोटी ३५ लाख लागू शकतात. त्याचबरोबर नुकसानग्रस्त रस्त्यांची नवीन माहिती समोर आल्यानंतर निधी आणखी लागणार आहे. रस्ते कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी पाटण तालुक्यात ५१ कोटी २० लागणार आहेत. तर महाबळेश्वर तालुक्यात १९ कोटी ८० लाख, वाई तालुक्यात १४ कोटी ३७ लाख रुपये लागणार आहेत. तर कऱ्हाड तालुक्यात ९ कोटी ८१ लाख, जावळी ४ कोटी ६० लाख आणि सातारा तालुक्यासाठी १ कोटी ८१ लाख रुपये लागणार आहेत.

जिल्हा परिषदेकडील रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. त्यामुळे निधी मिळून रस्ते दुरुस्त होईपर्यंत वाहनधारकांचा प्रवास हा खडतरच राहणार आहे.

चौकट :

तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचा प्रयत्न...

जिल्हा परिषदेकडील मार्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. किमान एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. ३१ जुलैअखेर अतिवृष्टीत सापडलेले रस्ते दुरुस्त करण्याचे नियोजन आहे. तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग समिती सभेत रस्ता दुरुस्तीसाठी आपत्कालीनमधून निधी देण्याचा ठरावही झाला आहे. त्यामुळे काही निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

.......................................................................