शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वाईकरांनी कोल्हापूरच्या संघर्षाचा आदर्श घ्यावा !

By admin | Updated: January 9, 2016 00:26 IST

भाजी मंडईत निषेध सभा : विकास आराखड्याच्या विरोधात शंभर टक्के कडकडीत बंद

वाई : ‘वाई नगपालिकेने सुधारित विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून हरकती घेण्याचे काम सुरू आहे़ हरकती देण्याच्या अंतिम दिवशी शुक्रवारी वाई संघर्ष समितीने नागरिकांना बंदची हाक दिली होती़ त्याला वाईकर नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद देत शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला़ दरम्यान, भाजी मंडईत झालेल्या निषेध सभेत वाईकरांनी कोल्हापूर येथील नागरिकांच्या संघर्षाचा आदर्श घ्यावा,’ असे आवाहन संघर्ष समितीचे काशिनाथ शेलार यांनी केले़ संपूर्ण दिवस कडकडीत बंद पाळल्यानतंर वाईच्या भाजी मंडईत संघर्ष समिती व वाईकर नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष विवेक पटवर्धन, श्रीकांत चव्हाण, अजित वनारसे, अनिल सावंत, सचिन फरांदे, महेंद्र धनवे, धनंजय मोरे, किरण खामकर, संजय गायकवाड, कैलास जमदाडे, विश्वास सोनावणे, विराज शिंदे, शिवाजीराव जगताप, विजयाताई भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती़ शेलार म्हणाले, ‘आधी पालिकेने हद्दवाढ करावी व नतंरच नवीन आरक्षण आराखडा तयार करण्यात यावा़ यशवंतनगर ग्रामपंचायत व शहाबाग यांना पालिकेच्या हद्दीत सामावून घ्यावे तर आरक्षणाचे चित्र बदलेल़ १९८५ मध्ये जो आराखडा तयार करण्यात आला, तो त्यावेळचा लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आला होता़ सध्याची वाई शहराची लोकसंख्या दुप्पटीने वाढली असताना त्याच आराखड्याची अंमलबजावणी करणे हे पूर्णपणे चुकीचे असून, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही़ शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्यासाठी पालिकेकडे आरक्षित जागा नाही, याच्या इतकी दुसरी दुर्दैवाची बाब नाही़ सध्याचा विकास आराखडा हा पक्षपातीपणाचा असून, विशेष सर्वसाधारण सभेत पालिकेच्या सर्व नगरसेवकांनी याला कडाडून विरोध करून शासनाला विरोध झालेला आराखडा पाठविण्यात यावा, तरच जनतेच्या पाठीमागे नगरसेवक आहे, असे मानावे लागेल़ (प्रतिनिधी)निषेधाचा ठराव मंजूर वाईत शुक्रवारी शंभर टक्के बंद असताना विद्यमान नगराध्यक्षांचे देशीदारूचे दुकान व विद्यमान सदस्या शर्मिला जाधव यांचे हॉटेल राजरोस सुरू ठेवल्याने संघर्ष समितीचे सचिन फरांदे यांनी सभेत निषेध ठराव मांडला़ आरक्षण विरोधात घेतल्या जाणाऱ्या हरकती हा निव्वळ फार्स असून, विकास आराखड्याची अंमलबजावणी प्रक्रिया पालिकेच्या अखत्यारीत राहिली नसून राज्याच्या नगरविकास मंत्र्यांकडे हा प्रस्ताव गेला आहे़ वाई विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे़ वाईकरांना आपला विरोध नगरविकास मंत्रालयाकडे नोंदवावा लागणार आहे.- श्रीकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष, वाई पालिका