शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वडूजला लागलंय नगरपंचायतीचे वेध

By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST

ग्रामपंचायतीवर वाढता ताण : ग्रामस्थांच्या आशा पल्लवित; जोरदार चर्चा सुरू--गाव होतंय मोठं - एक

शेखर जाधव -- वडूज -खटाव तालुक्याची राजधानी म्हणून वडूज शहराची एक वेगळी ओळख तर आहेच; परंतु त्याचबरोबरीने हुतात्म्यांची भूमी म्हणून राज्यालाही हे शहर परिचित आहे. २५ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या वडूज शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. तर नागरिकांना सोयी-सुविधा देताना ग्रामपंचायतीवर पडणारा अतिरिक्त ताण ही नगरपंचायत झाल्यास जाणवणार नाही. त्यामुळे वडूज नगरपंचायत होणार या नुसत्या चर्चेमुळे वडूजमधील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.संभाव्य नगरपंचायतीचे शिल्पकार कोण? यासाठी लवकरच ‘फ्लेक्स वॉर’ सुरू होईल. मात्र त्यापूर्वीच चौकाचौकात संभाव्य उमेदवारांचे वाढदिवसानिमित्त अथवा इतर सामाजिक उपक्रमाचे बोर्ड झळकू लागले आहेत. नगरपंचायत जाहीर होण्यापूर्वीच वडूजमधील राजकीय वातावरणाने चांगलाच पेट घेतला आहे. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर या ना त्या कारणाने वडूज परिसरात फटाक्यांची आतषबाजी होत आहे. मोहित करणारे आकाशातील फटाके आणि कर्णकर्कश फटाके, यामुळे नगरपंचायतीचा बिगुल वाजला हे न समजणारे वडूजकर तर मग कसले!वडूज नगरपंचायतीला पहिला नगराध्यक्ष व नगरसेवक बनण्यासाठीही अनेकांनी आतापासूनच व्यूहरचना आखली आहे. तर प्रभाग कसे पडणार, आपला पत्ता कसा चालेल, यासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. साम, दाम, दंड यांची रंगीत तालीम ही सुरू आहे. नगरपंचायत होणार या चर्चेतच वडूज नगरी बरोबरीने खटाव तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळले आहे.आता मात्र शिवसेना-भाजप, रासप व इतर पक्षांनाही नगरपंचायतीमुळे संधी प्राप्त होऊ शकते.वडूज नगरपंचायत होणार यामुळे ग्रामीण भागातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी नि:श्वास सोडला असून, आता आपल्याला जिल्हा परिषद सदस्य होण्यास कोणीच रोखू शकत नसल्याचे स्वप्न पडू लागली आहेत. नगरपंचायतीच्या दिव्यस्वप्नात स्थानिक नेते मंडळी हरवलेली असली तरी ब्रह्मअस्त्रांचा राजकीय माऱ्याला ते कसे तोंड देतात हा येणारा काळच ठरवणार आहे. या बातमीमुळे वडूजचे नागरिक सुखावले असले तरी नेमका काय फायदा व तोटा, याकडे न पाहता आता सोयी-सुविधा मिळणार याच आनंदोत्सवात आदेशाची वाट पाहत दिवाळी सुटीचा उपभोग घेत आहेत. राजकीय नेत्यांचे महत्त्व होणार कमी?जिल्ह्याच्या व तालुक्याच्या राजकारणात वडूच्या नेत्यांना आत्तापर्यंत राजकीय अनन्य साधारण महत्त्व होते. मात्र नगरपंचायतीनंतर हे महत्त्व कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सत्तेच्या समीकरणात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्हीच पक्षांचा अदलाबदल करून समावेश असायचा. हुतात्म्यांची भूमी असा राज्यात ठसावडूज शहर खटाव तालुक्याची राजधानी असले तरीही त्याला हुतात्म्यांची भूमी म्हणून राज्यात ओळख आहे. स्वातंत्र्य संग्रामात येथील भूमीचे आणि भूमीपूत्रांचे योगदानही मोठे आहे.