शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

वडूज :  कचरा डेपो स्थलांतरासाठी रास्ता रोको तासभर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:44 IST

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको

ठळक मुद्देवडूजच्या आंदोलनात भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाºयांसह नागरिकांचा सहभाग

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको केला. आठवडा बाजारादिवशीच आंदोलन झाल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली. 

कचरा डेपोसंदर्भात आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांसह संबंधित विभागाला कचरा डेपो स्थलांतराबाबत निवेदन दिले होते. परंतु याबाबतीत गंभीर नसलेल्या प्रशासनाने डोळेझाक करत हा प्रश्न सोयीस्कररीत्या बाजूला ठेवला. वडूजनगरीच्या वसाहतीत झपाट्याने वाढ होत असली तरी नगरपंचायत याबाबतीत गंभीर नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

नागरीवस्ती झपाट्याने वाढत असल्याने कचºयाचीही वाढ तेवढ्या गतीने होत आहे. लक्षात घेता सद्य:स्थितीतील कचरा डेपोत कचºयाची होणारी भरमसाठ वाढ, त्या परिसरातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. कचराच्या दुर्गंधीबरोबरीनेच सातत्याने कचरा पेटविल्याने होणारे हवा प्रदूषण या सर्वच गोष्टींचा येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. हा कचरा वसाहत परिसरातही दिसून येत आहे.

कचरा डेपो लगतच विविध समाज बांधवांच्या स्मशानभूमी असल्याने अंत्यसंस्कार करताना अडचणी येत आहेत. तरीही नगरपंचायत प्रशासन याबाबत विचाराधीन नाही, ही शोकांतिका ठरत आहे, असा नागरिकांमधून सूर निघत आहे. या संदर्भात स्वच्छता मंत्री, जिल्हाधिकारी, वडूज नगरपंचायत, पोलीस ठाणे आदींना निवेदन दिलेले होते.आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कचरा डेपो स्थलांतराबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे लक्षात येताच भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते व या परिसरातील नागरिकांनी वडूजमधील शेतकरी चौकात एक तास रास्ता रोको केला. 

स्वच्छ वडूजसाठीही प्रयत्न व्हावेत..सातारा जिल्हा स्वच्छतेबाबत देशात प्रथम क्रमांक मिळवला म्हणून एकीकडे आनंदोत्सव साजरा करताना दिसून येत आहे. दुसरीकडे हुतात्म्यांच्या भूमी व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजनगरीत कचरा निर्मूलनाबाबत नगरपंचायत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ वडूजसाठीही प्रयत्न व्हावेत, अशी मागणी सध्या जोर धरू  लागली आहे.