शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

वडूज :  कचरा डेपो स्थलांतरासाठी रास्ता रोको तासभर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:44 IST

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको

ठळक मुद्देवडूजच्या आंदोलनात भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाºयांसह नागरिकांचा सहभाग

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको केला. आठवडा बाजारादिवशीच आंदोलन झाल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली. 

कचरा डेपोसंदर्भात आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांसह संबंधित विभागाला कचरा डेपो स्थलांतराबाबत निवेदन दिले होते. परंतु याबाबतीत गंभीर नसलेल्या प्रशासनाने डोळेझाक करत हा प्रश्न सोयीस्कररीत्या बाजूला ठेवला. वडूजनगरीच्या वसाहतीत झपाट्याने वाढ होत असली तरी नगरपंचायत याबाबतीत गंभीर नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

नागरीवस्ती झपाट्याने वाढत असल्याने कचºयाचीही वाढ तेवढ्या गतीने होत आहे. लक्षात घेता सद्य:स्थितीतील कचरा डेपोत कचºयाची होणारी भरमसाठ वाढ, त्या परिसरातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. कचराच्या दुर्गंधीबरोबरीनेच सातत्याने कचरा पेटविल्याने होणारे हवा प्रदूषण या सर्वच गोष्टींचा येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. हा कचरा वसाहत परिसरातही दिसून येत आहे.

कचरा डेपो लगतच विविध समाज बांधवांच्या स्मशानभूमी असल्याने अंत्यसंस्कार करताना अडचणी येत आहेत. तरीही नगरपंचायत प्रशासन याबाबत विचाराधीन नाही, ही शोकांतिका ठरत आहे, असा नागरिकांमधून सूर निघत आहे. या संदर्भात स्वच्छता मंत्री, जिल्हाधिकारी, वडूज नगरपंचायत, पोलीस ठाणे आदींना निवेदन दिलेले होते.आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कचरा डेपो स्थलांतराबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे लक्षात येताच भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते व या परिसरातील नागरिकांनी वडूजमधील शेतकरी चौकात एक तास रास्ता रोको केला. 

स्वच्छ वडूजसाठीही प्रयत्न व्हावेत..सातारा जिल्हा स्वच्छतेबाबत देशात प्रथम क्रमांक मिळवला म्हणून एकीकडे आनंदोत्सव साजरा करताना दिसून येत आहे. दुसरीकडे हुतात्म्यांच्या भूमी व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजनगरीत कचरा निर्मूलनाबाबत नगरपंचायत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ वडूजसाठीही प्रयत्न व्हावेत, अशी मागणी सध्या जोर धरू  लागली आहे.