शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वडूज :  कचरा डेपो स्थलांतरासाठी रास्ता रोको तासभर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:44 IST

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको

ठळक मुद्देवडूजच्या आंदोलनात भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाºयांसह नागरिकांचा सहभाग

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको केला. आठवडा बाजारादिवशीच आंदोलन झाल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली. 

कचरा डेपोसंदर्भात आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांसह संबंधित विभागाला कचरा डेपो स्थलांतराबाबत निवेदन दिले होते. परंतु याबाबतीत गंभीर नसलेल्या प्रशासनाने डोळेझाक करत हा प्रश्न सोयीस्कररीत्या बाजूला ठेवला. वडूजनगरीच्या वसाहतीत झपाट्याने वाढ होत असली तरी नगरपंचायत याबाबतीत गंभीर नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

नागरीवस्ती झपाट्याने वाढत असल्याने कचºयाचीही वाढ तेवढ्या गतीने होत आहे. लक्षात घेता सद्य:स्थितीतील कचरा डेपोत कचºयाची होणारी भरमसाठ वाढ, त्या परिसरातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. कचराच्या दुर्गंधीबरोबरीनेच सातत्याने कचरा पेटविल्याने होणारे हवा प्रदूषण या सर्वच गोष्टींचा येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. हा कचरा वसाहत परिसरातही दिसून येत आहे.

कचरा डेपो लगतच विविध समाज बांधवांच्या स्मशानभूमी असल्याने अंत्यसंस्कार करताना अडचणी येत आहेत. तरीही नगरपंचायत प्रशासन याबाबत विचाराधीन नाही, ही शोकांतिका ठरत आहे, असा नागरिकांमधून सूर निघत आहे. या संदर्भात स्वच्छता मंत्री, जिल्हाधिकारी, वडूज नगरपंचायत, पोलीस ठाणे आदींना निवेदन दिलेले होते.आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कचरा डेपो स्थलांतराबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे लक्षात येताच भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते व या परिसरातील नागरिकांनी वडूजमधील शेतकरी चौकात एक तास रास्ता रोको केला. 

स्वच्छ वडूजसाठीही प्रयत्न व्हावेत..सातारा जिल्हा स्वच्छतेबाबत देशात प्रथम क्रमांक मिळवला म्हणून एकीकडे आनंदोत्सव साजरा करताना दिसून येत आहे. दुसरीकडे हुतात्म्यांच्या भूमी व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजनगरीत कचरा निर्मूलनाबाबत नगरपंचायत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ वडूजसाठीही प्रयत्न व्हावेत, अशी मागणी सध्या जोर धरू  लागली आहे.