शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
3
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
4
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
5
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
6
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
7
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
8
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
9
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
10
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
11
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
12
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
13
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
14
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
15
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
16
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
17
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
18
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
19
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
20
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

सत्तासंघर्षाला हिंसक वळण

By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST

दोन पोलीस जखमी : सोसायटी अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने गोरे बंधूंमधील

दहिवडी : आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्यात माण तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र सत्तासंघर्षाने गुरुवारी हिंसक रूप धारण केले. आंधळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकली नाही, तेव्हा दोन्ही गटांकडून प्रचंड दगडफेक आणि घोषणा युद्ध झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आंधळीत हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुरांची नळकांडी फोडण्याची तयारी पोलिसांनी केली, तेव्हा जमाव पांगला. दहिवडी येथेही दोन्ही गटांमध्ये हिंसक संघर्षाच्या घटना घडल्या.याबाबतची माहिती अशी, आंधळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली होती. पदाधिकारी निवडीसाठी नूतन संचालकांची बैठक गुरुवारी बोलविण्यात आली होती. या निवडीबाबत आमदार जयकुमार गोरे गट व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे गट यांच्यात चुरस निर्माण झाली होती. आमदार गोरे यांच्या गटाकडे सहा सदस्य तर शेखर गोरे गटाकडे सात सदस्य होते. एका सदस्याच्या अपहरणाची फिर्यादही दाखल झाली होती. दोन्ही गटांत या निवडीवरुन टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता.(पान १ वरून) त्यामुळे पोलिसांच्या पत्रानुसार, दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पदाधिकारी निवडीवेळी १४४ कलमान्वये जमावबंदी आदेश लागू केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. असे असूनही दोन्ही गट समोरासमोर आले.दुपारी एक वाजता पदाधिकारी निवडी होणार होत्या; पण निवडणूक निर्णय अधिकारी पी. ए. तायडे हे या प्रक्रियेलाच उपस्थित राहिले नाहीत. त्यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पदाधिकारी निवडीची प्रक्रियाच रद्द करण्यात आली. सोसायटी कार्यालयातून दोन्ही गटांचे संचालक बाहेर आल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळातच काही समजण्याच्या आत दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक सुरू झाली. काहीजणांकडून पेटते बोळे फेकण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे मोठी चकमक उडाली. दगडफेकीचा फटका कार्यकर्त्यांबरोबरच पोलिसांनाही बसला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांच्या वाहनाची मागील काच फुटली. दोन पोलीस जखमी झाले. खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. तरीही जमाव नियंत्रणात येत नव्हता. अखेर पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडण्याची तयारी केली. ते पाहून जमाव पांगला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. डॉ. देशमुख हे आंधळी येथे घटनेची माहिती घेत असतानाच दहिवडी येथे काही जणांना मारहाण करण्यात आल्याची माहिती त्यांना समजली. लगेचच राजलक्ष्मी शिवणकर व दंगल नियंत्रण पथकाने दहिवडीकडे मोर्चा वळविला. अघोषित संचारबंदीदहिवडीमध्ये काही जणांना मारहाण करण्यात आली. दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे आंधळीप्रमाणेच दहिवडी येथेही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंधळी आणि दहिवडी अशा दोन्ही ठिकाणी दुपारनंतर संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.