शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सत्तासंघर्षाला हिंसक वळण

By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST

दोन पोलीस जखमी : सोसायटी अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने गोरे बंधूंमधील

दहिवडी : आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्यात माण तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र सत्तासंघर्षाने गुरुवारी हिंसक रूप धारण केले. आंधळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकली नाही, तेव्हा दोन्ही गटांकडून प्रचंड दगडफेक आणि घोषणा युद्ध झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आंधळीत हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुरांची नळकांडी फोडण्याची तयारी पोलिसांनी केली, तेव्हा जमाव पांगला. दहिवडी येथेही दोन्ही गटांमध्ये हिंसक संघर्षाच्या घटना घडल्या.याबाबतची माहिती अशी, आंधळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली होती. पदाधिकारी निवडीसाठी नूतन संचालकांची बैठक गुरुवारी बोलविण्यात आली होती. या निवडीबाबत आमदार जयकुमार गोरे गट व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे गट यांच्यात चुरस निर्माण झाली होती. आमदार गोरे यांच्या गटाकडे सहा सदस्य तर शेखर गोरे गटाकडे सात सदस्य होते. एका सदस्याच्या अपहरणाची फिर्यादही दाखल झाली होती. दोन्ही गटांत या निवडीवरुन टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता.(पान १ वरून) त्यामुळे पोलिसांच्या पत्रानुसार, दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पदाधिकारी निवडीवेळी १४४ कलमान्वये जमावबंदी आदेश लागू केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. असे असूनही दोन्ही गट समोरासमोर आले.दुपारी एक वाजता पदाधिकारी निवडी होणार होत्या; पण निवडणूक निर्णय अधिकारी पी. ए. तायडे हे या प्रक्रियेलाच उपस्थित राहिले नाहीत. त्यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पदाधिकारी निवडीची प्रक्रियाच रद्द करण्यात आली. सोसायटी कार्यालयातून दोन्ही गटांचे संचालक बाहेर आल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळातच काही समजण्याच्या आत दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक सुरू झाली. काहीजणांकडून पेटते बोळे फेकण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे मोठी चकमक उडाली. दगडफेकीचा फटका कार्यकर्त्यांबरोबरच पोलिसांनाही बसला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांच्या वाहनाची मागील काच फुटली. दोन पोलीस जखमी झाले. खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. तरीही जमाव नियंत्रणात येत नव्हता. अखेर पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडण्याची तयारी केली. ते पाहून जमाव पांगला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. डॉ. देशमुख हे आंधळी येथे घटनेची माहिती घेत असतानाच दहिवडी येथे काही जणांना मारहाण करण्यात आल्याची माहिती त्यांना समजली. लगेचच राजलक्ष्मी शिवणकर व दंगल नियंत्रण पथकाने दहिवडीकडे मोर्चा वळविला. अघोषित संचारबंदीदहिवडीमध्ये काही जणांना मारहाण करण्यात आली. दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे आंधळीप्रमाणेच दहिवडी येथेही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंधळी आणि दहिवडी अशा दोन्ही ठिकाणी दुपारनंतर संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.