शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

पावसामुळे मायणी परिसरातील द्राक्ष बागा अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

मायणी : गेल्या चार दिवसांपासून निर्माण होत असलेले ढगाळ वातावरण व अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसाच्या हलक्या सरी यामुळे द्राक्ष ...

मायणी : गेल्या चार दिवसांपासून निर्माण होत असलेले ढगाळ वातावरण व अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसाच्या हलक्या सरी यामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. जर असेच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मायणीसह, कलेढोण, गारळेवाडी, विखळे, पाचवड, मुळकवाडी, कान्हरवाडी, हिवरवाडी, अनफळे, मोराळे, मराठानगर, निमसोड, आदी गावांच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला जोडव्यवसाय म्हणून द्राक्ष बागांची लागवड केली. लोकल बाजारपेठेबरोबर परदेशातील बाजारपेठेत द्राक्ष निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या द्राक्षाचे उत्पादन घेण्यास या भागातील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले.

परिसरामध्ये ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांतच द्राक्ष बाग छाटणी करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली साधारण १२० ते १३० दिवसांमध्ये पूर्ण परिपक्व होऊन द्राक्ष बाजारपेठेत जात आहेत. आज यावर्षीच्या द्राक्ष हंगामातील शेवटचे काही दिवस शिल्लक असताना रविवार, सोमवारपासून या भागात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

या ढगाळ वातावरणाबरोबरच अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. पावसाच्या हलक्या सरी येत असल्याने द्राक्ष फळावर धावण्या किंवा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. तसेच पावसाचे मोठे थेंब पडले तर द्राक्षाचा मनी फुटण्याची व तुटण्याची शक्यता अधिक आहे. सतत होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे द्राक्षाचे पीक वाया जाण्याची शक्यता आहेच, शिवाय आणखी काही दिवस असेच वातावरण राहिले तर द्राक्ष पिकाला मोठा फटका बसून बागायतदार आर्थिक संकटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौकट :

निर्यातीसाठी पूर्ण पक्व झालेल्या द्राक्षाला वातावरणाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, मोठा पाऊस झाला तर द्राक्षाचे मणी फुटण्याची शक्यता आहे व फुटलेल्या द्राक्षामध्ये पाणीसाठी, तर द्राक्ष कुजण्याची व नासण्याची शक्यता अधिक आहे.

कोट..

सध्या असलेल्या वातावरणाचा फारसा फरक द्राक्षावर जाणवणार नाही. त्यामुळे अधिक काळजी करण्याची गरज नाही. मात्र, असेच वातावरण अजून काही दिवस राहिल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

-दीपक यलमर, द्राक्ष बागायतदार, कान्हरवाडी

०७मायणी द्राक्ष...

मायणी परिसरातील द्राक्ष हंगाम ऐन बहरात असताना ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली आहे. (छाया : संदीप कुंभार)