शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

गावे एकोणीस अन् वायरमन तीनच!

By admin | Updated: December 26, 2014 00:51 IST

माण तालुका : ग्राहकांची गैरसोय; वीजवितरण कंपनीमुळे खेळखंडोबा!

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील देवापूर वीजवितरण शाखा कार्यालयाअंतर्गत १९ गावे असले तरी अवघे तीनच वायरमन सध्या काम करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना सेवा देता-देता येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे. खंडित वीजपुरवठा सुरळीत करायचा झाला किंवा गावागावांतील ग्राहकांच्या गैरसोयी दूर करायचे म्हटले तर चार-चार दिवस त्यांची कामे होत नाहीत. वीजवितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे मात्र ग्राहकांना विनाकारण मन:स्ताप सहन करावा लागत आहे. देवापूर येथे सुमारे तीस वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य विद्युत मंडळाचे शाखा कार्यालय सुरू झाले. या केंद्राअंतर्गत १९ गावे येतात. त्यामध्ये वरकुटे मलवडी, देवापूर, शिरताव, काळचौंडी, जांभुळणी, महाबळेश्वरवाडी, कुरणवाडी, वळई, पानवण, गंगोती, पळसावडे, चिलारवाडी, विरळी, लाडेवाडी आदी गावांचा समावेश आहे. वाड्या-वस्त्या वेगळ्याच आहेत. या केंद्राअंतर्गत ११ केव्हीचे सहा फिडर, आणि ३३ केव्हीचे तीन फिडर आहेत. यामधील वरकुटे मलवडी हे गाव सर्वात मोठे आहे. सुमारे सहा हजार लोकसंख्या एकट्या वरकुटे मलवडी गावाची आहे. या ठिकाणी मागील पाच वर्षे मुक्कामी वायरमन नाही. गावातील वीज गेल्यावर कोणाला तरी सांगून फ्यूज टाकावा लागत आहे. विजेचा घोटाळा असेल तर दोन-दोन दिवस तो निघत नाही. वरकुटे मलवडीसारख्या गावाची अशी स्थिती असताना छोट्या गावांची व वाड्या-वस्तीवरील ग्राहकांची अडचण तर अनेक दिवस न सुटणारी अशीच आहे. त्यामुळे अनेकवेळा मागणी करूनही या भागात अद्यापही पुरेसी वीज कर्मचारी संख्या मिळालेली नाही. (वार्ताहर) अकराच्या ठिकाणी तिघे...देवापूर येथे शाखा कार्यालय सुरू झाले तेव्हा अकरा वायरमनचा स्टाफ मंजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सुमारे तीस वर्षांनंतर ग्राहकांची संख्येत वाढ झाली तरी या पदात वाढ झाली नाही. उलट आहे त्यातील कर्मचारी कमी झाले आहेत. देवापूर कार्यालयांतर्गत भौगोलिक स्थिती पाहिली तर येथील गावे दूर व दुर्गम अशा ठिकाणी आहेत. आंदोलनाचा इशारा...वरकुटे मलवडी येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याने वीजकंपनीच्या विरोधात दहिवडी येथे आंदोलन केले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामधील किती मागण्या मान्य झाल्या, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे येथील वीज ग्राहकांनी आता वीज कंपनीच्या कारभाराबाबत पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.रिडिंग चुकीचे घेण्यात येते...सध्या मीटरवरील रिडिंग घेण्याचे काम ठेकेदारांमार्फत घेण्यात येत आहे. त्यामुळे अनेकवळा रिडिंग घेतले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना जादा प्रमाणात बिल येत आहे. खरेतर मीटरवरील आकडा वेगळाच असतो आणि बिलावर रिडिंगचा आकडा दुसराच असतो. त्यामुळे ग्राहकांना बिल कमी करण्यासाठी दहिवडीपर्यंत हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे वसुलीवर परिणाम होत आहे. लाईनमनचे पद तीन वर्षांपासून रिक्तदेवापूर शाखा कार्यालयात दुय्यम अभियंता हे प्रमुख आहेत. त्यानंतर दुसरे महत्त्वाचे पद हे लाईनमनचे असते. या लाईनमनवर सर्वच कामे अवलंबून असतात. मात्र, हेच पद गेले तीन वर्षे झाले रिक्त आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्यावर व तीन वायरमनवर सर्वच गावांचा व सर्व कामांचा भार पडत आहे. कर्मचारी येणार कधी ?येथील विजेच्या समस्यांबाबत वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर कर्मचारी देण्यात येतील. ग्राहकांना अडचणी येणार नाहीत, असे आश्वासन देण्यात येत आहे. आतापर्यंत अनेकवेळा हे झाले आहे. पण, जादा कर्मचारी मिळणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.