शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गायब झाली गावं; उरली फक्त नावं !

By admin | Updated: February 27, 2015 00:16 IST

अनेक गावांचे स्थलांतर : धरण, प्रकल्पांमुळे ग्रामस्थांनी गाव सोडलं; पोटापाण्यासाठी गाठले पुणे, मुंबई

सणबूर : डोंगरी आणि जंगल पट्ट्यातील लोकांसाठी वरदान ठरलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर शासनाने व उद्योजकांनी लादलेल्या प्रकल्पांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. परिणामी, येथील ग्रामस्थांना जगण्यासाठी आवश्यक असलेली साधनेच नष्ट होऊ लागली आहे. आता जगायचे कसे? असा प्रश्न जनतेला सतावत आहे. रोजगाराच्या शोधात येथील कुटुंबांचे स्थलांतर मुंबई, पुण्याकडे होत आहे. भविष्यात या विभागातील गावे ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे.ढेबेवाडी विभागातील पश्चिम भागामध्ये जंगलाच्या कुशीत अनेक गावे वसली होती. तेथील ग्रामस्थ हिरव्यागार वनश्रीच्या कोंदणात पशुपालन, शेतीसह निसर्गाच्या साधन संपत्तीवर आपला उदरनिर्वाह करीत होती. मात्र शासनाच्या कोयना व चांदोली अभयारण्यामुळे काही वर्षांपूर्वी वरील सर्व गावे विस्थापित झाली आणि तेथील जनतेला पुढे नरकयातना भोगाव्या लागल्या. १९९७ मध्ये शासनाच्या वांग-मराठवाडी सारख्या प्रकल्पामुळे या आगोदरच रेठरेकरवाडी, यादववाडी ही गावे विस्थापित झाली आहेत. तर उमरकांचन, मेंढ, घोटील ही गावे पूर्ण विस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत. येथील लोकांच्या जमिनी शसनाने संपादित केल्या आहेत. मात्र, त्या धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे घोंगडे आजही कायम आहे. यातूनच न्याय हक्कासाठी मोर्चे, आंदोलन व पोलिसांच्या लाठ्या खाऊन धरणग्रस्त थकले आहेत. तरी शासनाला जाग येत नाही. संपादित केलेल्या जमिनी पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. त्या पाठोपाठ आता संपूर्ण वाल्मीक पठारावरील पवनऊर्जा प्रकल्पाचे भूत शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसले आहे. पवनचक्की कंपनीच्या दलालांनी आणि गावगुंडांनी सर्वसामान्य जनतेच्या जमिनी बळकावून गोरगरीब शेतकऱ्यांना कंगाल बनविले आहे. सायकलवरून फिरण्याची परिस्थिती नसणारे आता वातानुकूलित कारमधून फिरत आहेत. तर आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचे उद्योगही सुरू आहेत. विभागातील १३ गावे व्याघ्र प्रकल्पाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये जात आहेत. या प्रकल्पासाठी शासन हजारो कुटुंबे देशोधडीला लावणार का ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.कोयना व चांदोली अभयारण्यामुळे वन्य प्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय व पशुपालन व्यवसाय अडचणीत आला आहे. प्रकल्पाच्या दुष्परिणामांमुळे शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होत आहे. यामुळे रोजगाराच्या शोधात लोक शहराकडे स्थलांतर करत आहेत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे विनाशकारी प्रकल्प कशासाठी असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे वनपरीक्षेत्राचे क्षेत्र कमी होणार आहे. त्यामुळे वनविभागाचे कार्यालय स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे वनविभागाला बकाल स्वरूप प्राप्त होणार आहे. गामस्थांना वनविभागाच्या कामासाठी पाटणला हेलपाटे मारावे लागणार आहेत. (वार्ताहर)ढेबेवाडी परिसरात मोठ्याप्रमाणात वनसंपदा आहे. मात्र, काही लोक दिवसा-ढवळ्या झाडे तोडत आहेत. त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही. त्यामुळे वनविभागाचे कार्यालय अतिशय गरजेचे आहे. या कार्यालयामुळे विभागातील वनसंपत्तीचे जतन होणार आहे. सध्या शासनाने हे कार्यालय पाटणला हलविण्याचा घाट घातला आहे. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागला तरी आमची तयारी आहे. पण शासनाने याची वेळीच दखल घेऊन वनविभागाचे कार्यालय कायम ठेवावे.- रमेश साळुंखे, ग्रामस्थ, जिंतीप्रकल्पाचा झळ अनेक गावांना कोयना व चांदोली अभयारण्यामुळे वाल्मिकी पठारावरील कोळेकरवाडी, सातर, पानेरी, कारळे, मोडकवाडी, माइंगडेवाडी, अंबवडे, निगडे (वरचे), घोटील यासारख्या गावांतील लोकांना प्रकल्पाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे गावातील कुटुंबे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत त्यामुळे गावंच्या गावे ओस पडू लागली आहेत. ढेबेवाडी विभागातील पश्चिमेचा भाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. पूर्वी या जंगलाच्या कुशीत यती, निवळे, गव, चाँदोल, टाकळे, झुळवी, आळोली, अबोली, लोटीव अशी अनेक गावे वसली होती. आज ही गावे गायब झाली आहेत. विभागातील इतर गावातील ग्रामस्थांच्या तोंडी या गावांची फक्त नावे ऐकायला मिळतात. प्रकल्प आणि धरणांच्या नावावर येथील जनतेने आजपर्यंत खूप सहन केलं; पण यापुढे सहन करणार नाही. जनतेची सहनशक्ती संपली आहे. आता आम्ही संघर्ष करू. जनतेला देशोधडीला लावण्यासाठीच विनाशकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. - हणमंत कदम, निगडे, ग्रामस्थ