शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

गावं तहानलेली... ऊसशेती मात्र भिजलेली!

By admin | Updated: September 8, 2015 22:08 IST

फलटण तालुक्यातील स्थिती : अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप

फलटण : एकीकडे फलटण तालुक्यात दुष्काळाने उग्ररूप धारण केल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे येथील नीरा उजवा कालव्यातून पिकांना पाणी देण्यासाठी दररोज लाखो लिटर पाण्याची सायपन पद्धतीने दिवसाढवळ्या चोरी होत आहे. पाणी चोरीमुळे लाखोंचा फटका शासनाला बसत असताना अधिकारी वर्ग याकडे मुद्दामहून कानाडोळा करीत आहे. फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा वाहत जातो. यावर ३५ गावे अवलंबून असण्याबरोबरच पुढे जाणाऱ्या पाण्यावर माळशिरस, पंढरपूर, सांगोला हेही तालुके अवलंबून आहेत. फलटण तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असून, तालुक्यात अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ती टँकरही या कालव्याद्वारे भरली जात असतात.तालुक्यात अनेक गावांमध्ये भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला वणवण भटकावे लागत असून, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न बनला बनला आहे. दुष्काळी पट्ट्यातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. अशा परिस्थितीत नीरा उजवा कालव्यालगतच्या बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. कॅनाल भरून वाहत असताना उसासाठी लगतच्या काही शेतकऱ्यांनी काही पाटकऱ्यांना हाताशी धरून कालव्यातून सरसकट पाणी चोरी सुरू केली आहे. काहीजणांनी मोठमोठेले पाईपलाईन थेट कालव्यामध्ये टाकून मोटारीद्वारे उपसा सुरू केला आहे. हे पाणी पाटाद्वारे थेट शेतामध्ये पोहोचविले जात आहे, तर काहीनी या पाण्यावर आपल्या विहिरींही भरून घेतल्या आहेत. दिवसाढवळ्या पाण्याची चोरी होत असताना संबंधित पाटकरी व काही अधिकारी याकडे दुर्लक्ष करून अर्थपूर्ण व्यवहारात मग्न आहेत. (प्रतिनिधी)कालव्यातून पाणी उपसा दुसरीकडे बारामती व इंदापूर तालुक्यांतून वाहत जाणाऱ्या नीरा डाव्या कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांवर कडक कारवाई तेथील अधिकाऱ्यांनी करताना पाईपलाइन व मोटारीही जप्त केल्या आहेत. मात्र, फलटण तालुक्यात याच्या उलट परिस्थिती असून, अर्थपूर्ण व्यवहारात अधिकारी वर्ग मग्न दिसत आहेत. पाण्याच्या प्रचंड उपसामुळे शासनाचे लाखोंचे नुकसान होत असून, वरिष्ठांनीच लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.कार्यवाही करू : सिद्धमल पाणी चोरीसंदर्भात नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता सिद्धमल यांच्याशी संपर्क साधला असता, हे प्रकार सातत्याने सुरूच असतात. आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत. तरीही आम्ही माहिती घेऊन कार्यवाही करू,’ असे मोघम उत्तरही सिद्धमल यांनी दिले. सातत्याने नीरा उजवा कालव्यातून पाणी चोरी होऊन शासनाचे लाखोंचे नुकसान होत असते, याला अधिकारी वर्गच जबाबदार असून, पाण्याच्या बदल्यात पैसे उकळले जात असल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे.- युवराज शिंदे, (उपजिल्हाप्रमुख मनसे)