शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

गावं तहानलेली... ऊसशेती मात्र भिजलेली!

By admin | Updated: September 8, 2015 22:08 IST

फलटण तालुक्यातील स्थिती : अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप

फलटण : एकीकडे फलटण तालुक्यात दुष्काळाने उग्ररूप धारण केल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे येथील नीरा उजवा कालव्यातून पिकांना पाणी देण्यासाठी दररोज लाखो लिटर पाण्याची सायपन पद्धतीने दिवसाढवळ्या चोरी होत आहे. पाणी चोरीमुळे लाखोंचा फटका शासनाला बसत असताना अधिकारी वर्ग याकडे मुद्दामहून कानाडोळा करीत आहे. फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा वाहत जातो. यावर ३५ गावे अवलंबून असण्याबरोबरच पुढे जाणाऱ्या पाण्यावर माळशिरस, पंढरपूर, सांगोला हेही तालुके अवलंबून आहेत. फलटण तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असून, तालुक्यात अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ती टँकरही या कालव्याद्वारे भरली जात असतात.तालुक्यात अनेक गावांमध्ये भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला वणवण भटकावे लागत असून, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न बनला बनला आहे. दुष्काळी पट्ट्यातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. अशा परिस्थितीत नीरा उजवा कालव्यालगतच्या बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. कॅनाल भरून वाहत असताना उसासाठी लगतच्या काही शेतकऱ्यांनी काही पाटकऱ्यांना हाताशी धरून कालव्यातून सरसकट पाणी चोरी सुरू केली आहे. काहीजणांनी मोठमोठेले पाईपलाईन थेट कालव्यामध्ये टाकून मोटारीद्वारे उपसा सुरू केला आहे. हे पाणी पाटाद्वारे थेट शेतामध्ये पोहोचविले जात आहे, तर काहीनी या पाण्यावर आपल्या विहिरींही भरून घेतल्या आहेत. दिवसाढवळ्या पाण्याची चोरी होत असताना संबंधित पाटकरी व काही अधिकारी याकडे दुर्लक्ष करून अर्थपूर्ण व्यवहारात मग्न आहेत. (प्रतिनिधी)कालव्यातून पाणी उपसा दुसरीकडे बारामती व इंदापूर तालुक्यांतून वाहत जाणाऱ्या नीरा डाव्या कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांवर कडक कारवाई तेथील अधिकाऱ्यांनी करताना पाईपलाइन व मोटारीही जप्त केल्या आहेत. मात्र, फलटण तालुक्यात याच्या उलट परिस्थिती असून, अर्थपूर्ण व्यवहारात अधिकारी वर्ग मग्न दिसत आहेत. पाण्याच्या प्रचंड उपसामुळे शासनाचे लाखोंचे नुकसान होत असून, वरिष्ठांनीच लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.कार्यवाही करू : सिद्धमल पाणी चोरीसंदर्भात नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता सिद्धमल यांच्याशी संपर्क साधला असता, हे प्रकार सातत्याने सुरूच असतात. आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत. तरीही आम्ही माहिती घेऊन कार्यवाही करू,’ असे मोघम उत्तरही सिद्धमल यांनी दिले. सातत्याने नीरा उजवा कालव्यातून पाणी चोरी होऊन शासनाचे लाखोंचे नुकसान होत असते, याला अधिकारी वर्गच जबाबदार असून, पाण्याच्या बदल्यात पैसे उकळले जात असल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे.- युवराज शिंदे, (उपजिल्हाप्रमुख मनसे)