शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गावं तहानलेली... ऊसशेती मात्र भिजलेली!

By admin | Updated: September 8, 2015 22:08 IST

फलटण तालुक्यातील स्थिती : अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप

फलटण : एकीकडे फलटण तालुक्यात दुष्काळाने उग्ररूप धारण केल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे येथील नीरा उजवा कालव्यातून पिकांना पाणी देण्यासाठी दररोज लाखो लिटर पाण्याची सायपन पद्धतीने दिवसाढवळ्या चोरी होत आहे. पाणी चोरीमुळे लाखोंचा फटका शासनाला बसत असताना अधिकारी वर्ग याकडे मुद्दामहून कानाडोळा करीत आहे. फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा वाहत जातो. यावर ३५ गावे अवलंबून असण्याबरोबरच पुढे जाणाऱ्या पाण्यावर माळशिरस, पंढरपूर, सांगोला हेही तालुके अवलंबून आहेत. फलटण तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असून, तालुक्यात अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ती टँकरही या कालव्याद्वारे भरली जात असतात.तालुक्यात अनेक गावांमध्ये भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला वणवण भटकावे लागत असून, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न बनला बनला आहे. दुष्काळी पट्ट्यातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. अशा परिस्थितीत नीरा उजवा कालव्यालगतच्या बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. कॅनाल भरून वाहत असताना उसासाठी लगतच्या काही शेतकऱ्यांनी काही पाटकऱ्यांना हाताशी धरून कालव्यातून सरसकट पाणी चोरी सुरू केली आहे. काहीजणांनी मोठमोठेले पाईपलाईन थेट कालव्यामध्ये टाकून मोटारीद्वारे उपसा सुरू केला आहे. हे पाणी पाटाद्वारे थेट शेतामध्ये पोहोचविले जात आहे, तर काहीनी या पाण्यावर आपल्या विहिरींही भरून घेतल्या आहेत. दिवसाढवळ्या पाण्याची चोरी होत असताना संबंधित पाटकरी व काही अधिकारी याकडे दुर्लक्ष करून अर्थपूर्ण व्यवहारात मग्न आहेत. (प्रतिनिधी)कालव्यातून पाणी उपसा दुसरीकडे बारामती व इंदापूर तालुक्यांतून वाहत जाणाऱ्या नीरा डाव्या कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांवर कडक कारवाई तेथील अधिकाऱ्यांनी करताना पाईपलाइन व मोटारीही जप्त केल्या आहेत. मात्र, फलटण तालुक्यात याच्या उलट परिस्थिती असून, अर्थपूर्ण व्यवहारात अधिकारी वर्ग मग्न दिसत आहेत. पाण्याच्या प्रचंड उपसामुळे शासनाचे लाखोंचे नुकसान होत असून, वरिष्ठांनीच लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.कार्यवाही करू : सिद्धमल पाणी चोरीसंदर्भात नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता सिद्धमल यांच्याशी संपर्क साधला असता, हे प्रकार सातत्याने सुरूच असतात. आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत. तरीही आम्ही माहिती घेऊन कार्यवाही करू,’ असे मोघम उत्तरही सिद्धमल यांनी दिले. सातत्याने नीरा उजवा कालव्यातून पाणी चोरी होऊन शासनाचे लाखोंचे नुकसान होत असते, याला अधिकारी वर्गच जबाबदार असून, पाण्याच्या बदल्यात पैसे उकळले जात असल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे.- युवराज शिंदे, (उपजिल्हाप्रमुख मनसे)