शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

गावोगावी फलकयुद्ध अन् जेवणावळ्यांना ऊत!

By admin | Updated: October 29, 2015 00:14 IST

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : जिल्ह्यात १0४ ग्रामपंचायतींचा प्रचार टिपेला; नेतेमंडळींसाठी निवडणूक प्रतिष्ठेची

सातारा : जिल्ह्यातील १0४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार, नेतेमंडळींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून गावागावांत फलकयुध्द सुरु आहे. जेवणावळ्यांनाही ऊत आला असून ढाबे चालकांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींपैकी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर सातारा तालुक्यातल्या नांदगावची निवडणूक रद्द झाली असून उर्वरित गावांमध्ये धूमशान सुरु झाले आहे. सातारा तालुक्यातील ९२ पैकी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाली असून कोडोली, अंबवडे बुद्रूक, चिंचणेर वंदन, गोवे, नागठाणे या गावांत टस्सल लढत पाहायला मिळत आहे. बहुतांश गावे सातारा, कऱ्हाड, कोरेगाव या तीन तालुक्यांत विभागली गेली असली तरीही आमदार मंडळींनी यात विशेष लक्ष घातलेले दिसत नाही. स्थानिक पातळीवरील गटा-तटांत लढाया सुरु असून कोण वरचढ ठरतो? याचे आडाखे बांधले जात आहेत. कोरेगाव तालुक्यातल्या ६ पैकी बोधेवाडी व देऊर या दोन ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आमदार शशिकांत शिंदे यांना यश आले आहे. उर्वरित होलेवाडी, पेठकिन्हई, वाठार बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये सातारा तालुक्यातील आंबळे, अंगापूर तर्फ तारगाव, बनघर, जोतिबाचीवाडी, खडगाव, कोंडवे, कुस बु., मापारवाडी, पाटेघर, वासोळे, अगुंडेवाडी, चाळकेवाडी, धनगरवाडी (निगडी), धनवडेवाडी, कूस खुर्द, निगुडमाळ, पिलाणीवाडी, राकुसलेवाडी, रामकृष्णनगर, भैरवगड. वाई तालुक्यातील गोळेगाव, सुलतानपूर. पाटण तालुक्यातील गुढे, अंबेघर तर्फ मरळी, डांगिष्टेवाडी, गहनबी, कारवट, पाचपुतेवाडी. महाबळेश्वरमधील कुंभरोशी, आमशी, पाली तर्फ आटेगाव, सोनाट, वानवली तर्फ सोळशी, वारसोळीदेव, वेळापूर, भीमनगर (पुनर्वसन), दाभदाभेकर, अकल्पे, बिरमणी, चिखली, घावरी, नाकिंदा, कोरेगावातील देऊर. कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी. जावळीतील अपटी, दापवडी, धनकवडी, धोंडेवाडी, दिवदेव, जरेवाडी, केडांबे, केसकरवाडी, मोहाट, मोरावळे, शेंबडी, बाहुले या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.पेठकिन्हई, वाठार किरोली, होलेवाडी, कठापूर (ता. कोरेगाव), अखेगणी, भालेघर, दुदुस्करवाडी, काटवली, महामुलकरवाडी, शेते, पवारवाडी, काळोशी (ता. जावळी), उंब्रज, कोपर्डे हवेली, शिरगाव, तांबवे (ता. कऱ्हाड), मेंढेघर, साखरी, नेचल, आंबळे, मोरेवाडी (ता. पाटण), केंजळ, जांभ, ओझर्डे, वाघजाईवाडी (वाई), कुमठे, उंबरी, चतूरबेट, दानवली, पारपार (महाबळेश्वर), वडगाव, धनगरवाडी, मोर्वे (ता. खंडाळा), वेटणे, पुनवडी (ता. खटाव), इंजबाब, रांजणी, देवापूर, वारुगड, शिंगणापूर (ता. माण), शेरेचीवाडी, पिराचीवाडी (ता. फलटण) या ग्रामपंचायतींत धूमशान होणार असून, काही ठिकाणी दुरंगी तर बहुतांश ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होणार आहे. (प्रतिनिधी)चिन्हे लक्षात कशी ठेवायची हा प्रश्ननिवडणूक लागलेल्या मोठ्या गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढत होत आहेत. काँगे्रस, राष्टवादीमधील पारंपरिक लढतीही जागोजागी होणार असल्याचे चित्र आहेत. ज्या गावांत उमेदवारांची संख्या मोठी आहे, तिथे चिन्हांची संख्याही जास्त आहे. मात्र ही चिन्हे लक्षात रहावीत, यासाठी योजनाबध्द ‘प्रचार’ सुरु आहे. आपले चिन्ह घरा-घरांत पोहोचावे, यासाठी काही उमेदवारांनी हात ढिले सोडले आहेत, तर काहींनी आपल्या चिन्हाची वस्तूच वॉर्डात पोहोचवली आहे. कपबशी, काठ्या, केरसुन्या, घड्याळे, टेबल, खुर्च्या, टीव्ही, खराटा, बॅट, बॉल अशी चिन्हे निवडणूक लागलेल्या गावांमध्ये घरा-घरांत पाहायला मिळत आहेत. या गावांत होणार तोडीस-तोड लढत तासगाव, कोडोली, अतित, चिंचणेर वंदन, नागठाणे, गोवे, पेठकिन्हई, वाठार किरोली, कठापूर, काळोशी, पवारवाडी, शेते, उंब्रज, कोपर्डे हवेली, तांबवे, केंजळ, जांभ, ओझर्डे, मोर्वे, वडगाव, धनगरवाडी, शेरेचीवाडी, पिराचीवाडी, वेटणे, पुनवडी, इंजबाब, रांजणी, देवापूर, वारुगड, शिंगणापूर या गावांमध्ये तोडीस-तोड लढती पाहायला मिळत आहेत. काँगे्रस-राष्ट्रवादीतील पारंपरिक लढतीत आता शिवसेना-भाजपने आपले बळ आजमावण्याचा प्रयत्न जागोजागी केला आहे. राज्यातील सत्तेच्या आधारावर जिल्हा काबीज करण्याचे काहींचे धोरण आहे.