शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगतच्या अडचणींमुळे ग्रामस्थ हैराण ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:42 IST

खंडाळा : पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. दळणवळणाच्या सोयीसाठी व वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी ...

खंडाळा : पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. दळणवळणाच्या सोयीसाठी व वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी महामार्गात हे बदल करण्यात आले असले तरी कामे खोळंबल्याने अडचणी वाढत आहेत. वास्तविक, या राष्ट्रीय महामार्गाचे रूपांतर आशियाई महामार्गात केले असले तरी सध्या हा बदल केवळ नावापुरताच दिसून येतोय. महामार्गालगतच्या गावांच्या अडचणी मात्र तशाच असल्याने ग्रामस्थ हैराण आहेत.

पुणे-बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी या मार्गाचे सुरुवातीला चौपदरीकरण व त्यानंतर सहापदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. या कामादरम्यान अनेक गावांतील रस्त्यालगतच्या अडचणी वाढत गेल्या आहेत. मात्र, यावर तोडगा काढण्यापूर्वी केवळ नावात बदल करून त्याचे नामकरण आशियाई महामार्ग-४७ असे करण्यात आले आहे. त्यामुळे समस्या सुटलेल्या नाहीत.

खंडाळा तालुक्यात पारगाव येथील महामार्गालगत दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांचे रुंदीकरण करणे, अंडरपास बोगदा दोन्ही बाजूंनी काँक्रिट भिंत बांधून बंदिस्त गटार करणे, अंडरपास एलईडी दिवे बसविण्यात यावेत, सेवारस्त्यालगत दोन्ही बाजूने गटार काढणे, एसटी बसस्थानकासमोरील बोगद्यात लोखंडी, अथवा स्टील खांब बसविण्यात यावेत, गाव हद्दीत रस्त्याकडेला दुतर्फा लाईटची सोय करणे, अशी अनेक कामे अपूर्ण आहेत. तसेच खंडाळा बसस्थानक ते सातारा मार्गावरील सेवा रस्त्यालगत असणाऱ्या विहिरी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे नावात बदल होत असताना कामातही तत्परतेने तोडगा निघावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.

(कोट)

महामार्गाच्या रुंदीकरणाने दळणवळण सुविधा सुरळीत झाल्या असल्या तरी सेवारस्ते, अंडरपास बोगदे व इतर सुविधा चांगल्या रीतीने मिळणे गरजेचे आहे. कामे अपूर्ण राहिल्याने शेतकरी वर्गाची मोठी अडचण झाली आहे. बसस्थानक ते सातारा रोडपर्यंतच्या सेवारस्त्यालगतची विहीर धोकादायक आहे. ती बुजवून सेवा रस्त्याची रुंदी वाढवणे गरजेचे आहे.

- युवराज ढमाळ, सामाजिक कार्यकर्ते, पारगाव

फोटो आहे.

१७ खंडाळा

खंडाळा बसस्थानक ते सातारा महामार्ग सेवा रस्ता अरुंद व दुरवस्था असल्याने वारंवार अपघात होत असतात.