शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

गावोगावी एल्गार... जय मल्हार!

By admin | Updated: March 13, 2017 22:53 IST

मल्हार क्रांतीसाठी रणरागिणीही सज्ज : धनगर समाजाच्या बैठका अन् भेटींचा धडाका; दहिवडीतील मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात

सातारा : धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दहिवडी येथे दि. १६ रोजी मल्हार क्रांतीच्या झेंड्याखाली महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी माता अहिल्यादेवी रणरागिणी सेना कार्यरत झाली आहे. या सेनेच्या माध्यमातून माण तालुक्यातील विविध गावे, वाडी-वस्त्यांवर बैठका घेण्यात येत असून, त्याद्वारे महिलांना मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्या गाव अणि वाडी-वस्तीतील महिला दि. १६ च्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. आजअखेर आरक्षण मागणीसाठीचे २० हजारांच्या आसपास अर्ज माण तालुक्यातील धनगर बांधवांनी भरल्याची माहिती संयोजकांनी दिली. ‘ना कोणत्या नेत्याचा, ना कोणत्या पक्षाचा, मोर्चा फक्त धनगर समाजाचा’ अशा घोषणा देत धनगर बांधव सक्रिय झाल्याने निघणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.बारामती येथील धनगर समाजाच्या मोर्चादरम्यान तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचा फडणवीस यांना विसर पडला आहे. दिलेल्या आश्वासनाचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरण करून देण्यासाठी मल्हार क्रांतीच्या झेंड्याखाली दहिवडी येथे १६ मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात आपलाही सहभाग असावा, यासाठी महिला आक्रमक झाल्या असून, माता अहिल्यादेवी रणरागिणी सेनेच्या माध्यमातून महिलांनी गावे आणि वाडी-वस्त्यांवर बैठकांचा धडाका लावला आहे. बैठकांदरम्यान गाव आणि वाडी-वस्तीतील महिला चूल बंद ठेवत दि. १६ रोजी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. ‘ना कोणत्या नेत्याचा ना कोणत्या पक्षाचा मोर्चा फक्त धनगरांचा’ या संकल्पनेला महिला वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.‘आता नाय तर कधीच नाय’ असे बोलून दाखवत महिला मोर्चासाठी आक्रमक झाल्या आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी घरातील व इतर कामे अगोदरच आटोपून घेण्यात सध्या महिलावर्ग गुंतला असल्याचे चित्र माण तालुक्याच्या विविध गावे आणि वाडी-वस्तीत दिसून येत आहे. (प्रतिनिधी)