शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

गावकारभाऱ्यांची निवड २६ ते २८ दरम्यान!

By admin | Updated: August 19, 2015 21:19 IST

कऱ्हाड तालुका : आठवड्याचा अवधी; गावोगावी सरपंचाच्या निवडीची तयारी

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केला आहे. या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. २६ ते २८ आॅगस्ट दरम्यान ९७ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची निवड होणार असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.पाच ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या ९८ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर आता सरपंचपदाच्या निवडीकडे ग्रामीण भागातील लोकांचे लक्ष लागून राहिले होते. ग्रामीण भागात ज्या गावात सर्वसाधारण गटातील सरपंचपदासाठी निवड करावयाची आहे. त्यासाठी काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.गावाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्तवाच्या मानल्या जाणाऱ्या सरपंचपदाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीवर कोणत्या राजकीय पक्षाचे वर्चस्व राहणार आहे याचा फैसला सरपंचपदाच्या निवडीनंतरच होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षातील मंडळींनी देखील या सरपंचपदाच्या निवडीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तर तालुक्यातील हजारमाची येथील ग्रामपंचायतीची सरपंचपदाची मुदत सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. मुदत संपेपर्यंत ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्य नामधारी असणार आहेत. (प्रतिनिधी)२८ रोजी निवडी होणाऱ्या ग्रामपंचायतीपार्ले, आबईचीवाडी, बामणवाडी, भरेवाडी, भवानवाडी, भुयाचीवाडी, चचेगाव, चिखली, चोरे, धोंडेवाडी, गोळेश्वर, कालवडे, कामथी, करवडी, केसे, खोडशी, खोडजाईवाडी, खुबी, किरपे, कोडोली, म्हारूगडेवाडी, म्हासोली, नांदगाव, नवीन कवठे, सैदापूर, साजूर, साळशिरंबे, शहापूर, शेवाळेवाडी (उंडाळे), वडोली निळेश्वर, वराडे, वसंतगड, येणके या ३३ गावांतील निवडणूका होणार आहेत.२६ रोजी निवड होणाऱ्या ग्रामपंचायती...अंबवडे, भोळेवाडी, गमेवाडी, घोगाव, गोटेवाडी, हणबरवाडी, हरपळवाडी, इंदोली, जिंती, कार्वे, काले, खालकरवाडी, कोणेगाव, मालखेड, म्होप्रे, मौजे साकुर्डी, मुंढे, निगडी, रिसवड, शेळकेवाडी, उंडाळे, विरवडे, वडगाव (उंब्रज), वहागाव, वाठार आणि विंग या २६ गावांत सरपंचपदाची निवड होणार आहे.२७ रोजी निवडी होणाऱ्या ग्रामपंचायती...आकाईचीवाडी, बनवडी, बेलवडे बुद्रुक, बेलदरे, बेलवडे हवेली, भुरभुशी, चौगुलेमळा, गायकवाडवाडी, घारेवाडी, घोणशी, गोवारे, खराडे, कोळे, लटकेवाडी, मरळी, नांदलापूर, ओंड, पाचुंद, पाडळी-केसे, पाल, पेरले, पोतले, सवादे, शेवाळेवाडी (म्हासोली), शिरवडे, शिवडे, टाळगाव, वस्ती साकुर्डी, वाघेरी, वाघेश्वर, वारूंजी, येरवळे, गोटे या ३३ गावांतील सरपंचपदाची निवड होणार आहे.