शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

वारुळावर वसले गाव, ‘साप’ त्याचे नाव!

By admin | Updated: March 19, 2015 23:56 IST

राजवैभवाच्या खुणा : जुन्या गावाचे भग्नावशेष अस्तित्वात

शशिकांत क्षीरसागर -रहिमतपूर -समोर साप दिसला की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. त्यामुळे लोक भीतीपोटी सापापासून दूरच राहतात. मात्र, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर सातारा-वडूज-औंध रस्त्यावर चक्क ‘साप’ नावाचे गाव वसले आहे. या नावामागची कहाणीही तेवढीच रंजक आहे. एका गुराख्याने वारुळ खोदल्यावर त्यातून महादेवाची पिंड निघाली व गाव वसविण्याचा दृष्टांत दिला, अशी आख्यायिका आहे.प्राचीन काळात चंद्रागिरी टेकडीजवळ कमंडलू नदीच्या पात्रालगत राजापूर नावाचे गाव होते. व सध्याच्या साप गावाच्या जागेवर घनदाट जंगल होते. येथील गुराखी रोज गाई चारण्यासाठी जंगलात जात असे. गाई चरत असताना एका वारुळातून रोज एक साप बाहेर येऊन गाईचे दूध पित असे. एक दिवस त्या गुराख्याने ते वारुळ खोदून सापाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वारुळातून स्वयंभू महादेवाची पिंड निघाली. याठिकाणी गाव वसवावे, असा दृष्टांत झाला आणि त्याठिकाणी लोकवस्ती झाली. त्या लोकवस्तीला ‘साप’ हे नाव मिळाले. वारुळात गुराख्याला जी पिंड सापडली त्याठिकाणी तेव्हा मंदिरही बांधलेले आहे. तर पूर्वीच्या राजापूर म्हणजे चंद्रगिरीलगत जुन्या गावचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात.वाड्याच्या मागे सरदारांनी मारुती मंदिर बांधले आहे. आजही लोक मनोभावे पूजा करतात. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्याकाळी सरदारांनी बांधलेली तालीम आहे. गावाने ती पंरपरा आजही टिकवून ठेवली आहे. गावचे सुपुत्र दिलीप पवार हे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक आहेत. शाहू महाराजांनी राजवाड्यास भेट दिली होती. त्यांच्या भेटीनंतर राजवाड्याचे कामकाज त्यांच्या अधिपत्याखाली होऊ लागले. राजवाडा आजही भक्कम स्थितीत आहे.- इंद्रोजीराव कदम, वारसआमच्या गावात सरदारांच्या काळापासून कुस्त्यांची परंपरा आहे. ती परंपरा गावाने आजही जपली आहे. नामांकित मल्ल गावात तयार झाले असून ही परंपरा आम्ही अशी कायम ठेवणार आहे.- प्रा. सतीश कदम, पैलवानवाड्यात चित्रपट, मालिकांची चित्रीकरणराजवाड्याच्या चारही बाजूंनी भक्कम तटबंदी आहे. सहा टेहळणी बुरुज आहेत. दरबार हॉल आहे. संकटकाळी बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्ग आहेत. स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, तांब्याची भांडी, हत्तीच्या आंघोळीचा हौदही पाहायला मिळतो. अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण येथे झालेले आहे.पाच एकरातील राजवाडापेशवेकाळातील सरदार इंद्रोजीराव कदम हे या गावचे सुपुत्र. ते १७ व्या शतकात याठिकाणी पुन्हा वास्तव्यास आले. त्यांनी पाच एकरात ऐतिहासिक राजवाडा बांधला. त्याची रचना एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे आहे.