शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

वारुळावर वसले गाव, ‘साप’ त्याचे नाव!

By admin | Updated: March 19, 2015 23:56 IST

राजवैभवाच्या खुणा : जुन्या गावाचे भग्नावशेष अस्तित्वात

शशिकांत क्षीरसागर -रहिमतपूर -समोर साप दिसला की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. त्यामुळे लोक भीतीपोटी सापापासून दूरच राहतात. मात्र, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर सातारा-वडूज-औंध रस्त्यावर चक्क ‘साप’ नावाचे गाव वसले आहे. या नावामागची कहाणीही तेवढीच रंजक आहे. एका गुराख्याने वारुळ खोदल्यावर त्यातून महादेवाची पिंड निघाली व गाव वसविण्याचा दृष्टांत दिला, अशी आख्यायिका आहे.प्राचीन काळात चंद्रागिरी टेकडीजवळ कमंडलू नदीच्या पात्रालगत राजापूर नावाचे गाव होते. व सध्याच्या साप गावाच्या जागेवर घनदाट जंगल होते. येथील गुराखी रोज गाई चारण्यासाठी जंगलात जात असे. गाई चरत असताना एका वारुळातून रोज एक साप बाहेर येऊन गाईचे दूध पित असे. एक दिवस त्या गुराख्याने ते वारुळ खोदून सापाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वारुळातून स्वयंभू महादेवाची पिंड निघाली. याठिकाणी गाव वसवावे, असा दृष्टांत झाला आणि त्याठिकाणी लोकवस्ती झाली. त्या लोकवस्तीला ‘साप’ हे नाव मिळाले. वारुळात गुराख्याला जी पिंड सापडली त्याठिकाणी तेव्हा मंदिरही बांधलेले आहे. तर पूर्वीच्या राजापूर म्हणजे चंद्रगिरीलगत जुन्या गावचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात.वाड्याच्या मागे सरदारांनी मारुती मंदिर बांधले आहे. आजही लोक मनोभावे पूजा करतात. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्याकाळी सरदारांनी बांधलेली तालीम आहे. गावाने ती पंरपरा आजही टिकवून ठेवली आहे. गावचे सुपुत्र दिलीप पवार हे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक आहेत. शाहू महाराजांनी राजवाड्यास भेट दिली होती. त्यांच्या भेटीनंतर राजवाड्याचे कामकाज त्यांच्या अधिपत्याखाली होऊ लागले. राजवाडा आजही भक्कम स्थितीत आहे.- इंद्रोजीराव कदम, वारसआमच्या गावात सरदारांच्या काळापासून कुस्त्यांची परंपरा आहे. ती परंपरा गावाने आजही जपली आहे. नामांकित मल्ल गावात तयार झाले असून ही परंपरा आम्ही अशी कायम ठेवणार आहे.- प्रा. सतीश कदम, पैलवानवाड्यात चित्रपट, मालिकांची चित्रीकरणराजवाड्याच्या चारही बाजूंनी भक्कम तटबंदी आहे. सहा टेहळणी बुरुज आहेत. दरबार हॉल आहे. संकटकाळी बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्ग आहेत. स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, तांब्याची भांडी, हत्तीच्या आंघोळीचा हौदही पाहायला मिळतो. अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण येथे झालेले आहे.पाच एकरातील राजवाडापेशवेकाळातील सरदार इंद्रोजीराव कदम हे या गावचे सुपुत्र. ते १७ व्या शतकात याठिकाणी पुन्हा वास्तव्यास आले. त्यांनी पाच एकरात ऐतिहासिक राजवाडा बांधला. त्याची रचना एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे आहे.