शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वारुळावर वसले गाव, ‘साप’ त्याचे नाव!

By admin | Updated: March 19, 2015 23:56 IST

राजवैभवाच्या खुणा : जुन्या गावाचे भग्नावशेष अस्तित्वात

शशिकांत क्षीरसागर -रहिमतपूर -समोर साप दिसला की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. त्यामुळे लोक भीतीपोटी सापापासून दूरच राहतात. मात्र, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर सातारा-वडूज-औंध रस्त्यावर चक्क ‘साप’ नावाचे गाव वसले आहे. या नावामागची कहाणीही तेवढीच रंजक आहे. एका गुराख्याने वारुळ खोदल्यावर त्यातून महादेवाची पिंड निघाली व गाव वसविण्याचा दृष्टांत दिला, अशी आख्यायिका आहे.प्राचीन काळात चंद्रागिरी टेकडीजवळ कमंडलू नदीच्या पात्रालगत राजापूर नावाचे गाव होते. व सध्याच्या साप गावाच्या जागेवर घनदाट जंगल होते. येथील गुराखी रोज गाई चारण्यासाठी जंगलात जात असे. गाई चरत असताना एका वारुळातून रोज एक साप बाहेर येऊन गाईचे दूध पित असे. एक दिवस त्या गुराख्याने ते वारुळ खोदून सापाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वारुळातून स्वयंभू महादेवाची पिंड निघाली. याठिकाणी गाव वसवावे, असा दृष्टांत झाला आणि त्याठिकाणी लोकवस्ती झाली. त्या लोकवस्तीला ‘साप’ हे नाव मिळाले. वारुळात गुराख्याला जी पिंड सापडली त्याठिकाणी तेव्हा मंदिरही बांधलेले आहे. तर पूर्वीच्या राजापूर म्हणजे चंद्रगिरीलगत जुन्या गावचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात.वाड्याच्या मागे सरदारांनी मारुती मंदिर बांधले आहे. आजही लोक मनोभावे पूजा करतात. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्याकाळी सरदारांनी बांधलेली तालीम आहे. गावाने ती पंरपरा आजही टिकवून ठेवली आहे. गावचे सुपुत्र दिलीप पवार हे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक आहेत. शाहू महाराजांनी राजवाड्यास भेट दिली होती. त्यांच्या भेटीनंतर राजवाड्याचे कामकाज त्यांच्या अधिपत्याखाली होऊ लागले. राजवाडा आजही भक्कम स्थितीत आहे.- इंद्रोजीराव कदम, वारसआमच्या गावात सरदारांच्या काळापासून कुस्त्यांची परंपरा आहे. ती परंपरा गावाने आजही जपली आहे. नामांकित मल्ल गावात तयार झाले असून ही परंपरा आम्ही अशी कायम ठेवणार आहे.- प्रा. सतीश कदम, पैलवानवाड्यात चित्रपट, मालिकांची चित्रीकरणराजवाड्याच्या चारही बाजूंनी भक्कम तटबंदी आहे. सहा टेहळणी बुरुज आहेत. दरबार हॉल आहे. संकटकाळी बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्ग आहेत. स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, तांब्याची भांडी, हत्तीच्या आंघोळीचा हौदही पाहायला मिळतो. अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण येथे झालेले आहे.पाच एकरातील राजवाडापेशवेकाळातील सरदार इंद्रोजीराव कदम हे या गावचे सुपुत्र. ते १७ व्या शतकात याठिकाणी पुन्हा वास्तव्यास आले. त्यांनी पाच एकरात ऐतिहासिक राजवाडा बांधला. त्याची रचना एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे आहे.