शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘एक गाव-एक गणपती’चा पुनर्वसित गावांनी राखला मान

By admin | Updated: September 30, 2015 00:09 IST

आदर्श उपक्रम : चांदवडी, भिवडी, वेलंग गावांची कौतुकास्पद कामगिरी

पाचवड : स्वत:च्या गावाला आदर्शग्रामङ्खम्हणवून घेणाऱ्या मोठ्या बाजारपेठेच्या गावांपासून ते अगदी लहान वाडीवस्त्यांमधील लोकांनी ‘एक गाव-एक गणपती’ योजनेकडे यावर्षीच्या गणेशोत्सवात पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. सर्वत्र अशी परिस्थिती असताना भुर्इंज, पाचवड व परिसरातील मोठ्या गावांच्या शेजारीच असणाऱ्या चांदवडी, भिवडी तसेच वेलंग यांसारख्या पुनर्वसित गावांनी मात्र ‘एक गाव-एक गणपती’ या योजनेचा मान ठेवत आपापल्या गावांमध्ये या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने चांदवडी या पुनर्वसित गावचा आदर्श भिवडी व वेलंग या गावांनी घेतल्याचे दिसून येत आहे. धोम धरणामध्ये जमिनी गेल्यानंतर सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी या गावांचे किसन वीर कारखान्याशेजारील माळावर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन झाल्यापासून चांदवडी व इतर पुनर्वसित गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ योजना राबविली जात आहे. गावांमधील ग्रामस्थ व तरुणांमध्ये असलेल्या एकीचे प्रतीक म्हणजे या योजनेची दरवर्षी यशस्वीरीत्या होत असलेली अंमलबजावणी. शासनानेही चांदवडी गावाच्या या एकीची व कार्याची दखल घेऊन २००३ मध्ये त्यांना ‘एक गाव एक गणपती’ योजनेचा विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. गेल्या दशकामध्ये एकदाही निवडणुकीला सामोरे न जाणाऱ्या चांदवडी गावाला माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००६ मध्ये स्वत: निर्मलग्राम पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही मोठी बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये ग्रामस्थ व तरुणांकडून या योजनेकडे दुर्लक्ष होत असतानाच ४० वर्षांपासून ही पुनर्वसित गावे ‘एक गाव एक गणपती’ योजनेचा पाठपुरावा करून तरूणांना ही योजना यशस्वीरीत्या राबविण्यास प्रवृत्त करीत आहेत.चांदवडी गावच्या महिला सरपंच सारिका शिंंदे यांनी याबद्दल ग्रामस्थ व गावातील तरूणांचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)चांदवडीत डॉल्बी कधी वाजलीच नव्हती... तरूणांना भुरळ पाडणारी डॉल्बी चांदवडीत मात्र गेल्या ४० वर्षांत कधीच वाजली नाही. युवकांना मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे व चांदवडीचा आदर्श पुढे ठेवत भिवडी व वेलंग या गावांनी सुध्दा डॉल्बीला आजपर्यंत जवळ केले नाही. युवकांवर कायमपणे डॉल्बीप्रेमाची मोहोर उमटवली जात होती. त्यामुळे या युवकांनी केलेल्या या सहकार्यामुळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.वृध्दांपासून ते तरूणांपर्यंत असलेल्या एकीमुळे चांदवडी गावामध्ये आजपर्यंत ‘एक गाव-एक गणपती’ ही योजना यशस्वीरीत्या राबविली जात आहे. मला चांदवडी गावाचा याबद्दल अभिमान असून गेल्या दशकामध्ये एकाही निवडणुकीला सामोरे न गेलेल्या गावाची अशीच अखंड वाटचाल ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देते. - सारिका शिंंदे, सरपंच, चांदवडी, ता.वाई