शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

‘एक गाव-एक गणपती’चा पुनर्वसित गावांनी राखला मान

By admin | Updated: September 30, 2015 00:09 IST

आदर्श उपक्रम : चांदवडी, भिवडी, वेलंग गावांची कौतुकास्पद कामगिरी

पाचवड : स्वत:च्या गावाला आदर्शग्रामङ्खम्हणवून घेणाऱ्या मोठ्या बाजारपेठेच्या गावांपासून ते अगदी लहान वाडीवस्त्यांमधील लोकांनी ‘एक गाव-एक गणपती’ योजनेकडे यावर्षीच्या गणेशोत्सवात पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. सर्वत्र अशी परिस्थिती असताना भुर्इंज, पाचवड व परिसरातील मोठ्या गावांच्या शेजारीच असणाऱ्या चांदवडी, भिवडी तसेच वेलंग यांसारख्या पुनर्वसित गावांनी मात्र ‘एक गाव-एक गणपती’ या योजनेचा मान ठेवत आपापल्या गावांमध्ये या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने चांदवडी या पुनर्वसित गावचा आदर्श भिवडी व वेलंग या गावांनी घेतल्याचे दिसून येत आहे. धोम धरणामध्ये जमिनी गेल्यानंतर सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी या गावांचे किसन वीर कारखान्याशेजारील माळावर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन झाल्यापासून चांदवडी व इतर पुनर्वसित गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ योजना राबविली जात आहे. गावांमधील ग्रामस्थ व तरुणांमध्ये असलेल्या एकीचे प्रतीक म्हणजे या योजनेची दरवर्षी यशस्वीरीत्या होत असलेली अंमलबजावणी. शासनानेही चांदवडी गावाच्या या एकीची व कार्याची दखल घेऊन २००३ मध्ये त्यांना ‘एक गाव एक गणपती’ योजनेचा विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. गेल्या दशकामध्ये एकदाही निवडणुकीला सामोरे न जाणाऱ्या चांदवडी गावाला माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००६ मध्ये स्वत: निर्मलग्राम पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही मोठी बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये ग्रामस्थ व तरुणांकडून या योजनेकडे दुर्लक्ष होत असतानाच ४० वर्षांपासून ही पुनर्वसित गावे ‘एक गाव एक गणपती’ योजनेचा पाठपुरावा करून तरूणांना ही योजना यशस्वीरीत्या राबविण्यास प्रवृत्त करीत आहेत.चांदवडी गावच्या महिला सरपंच सारिका शिंंदे यांनी याबद्दल ग्रामस्थ व गावातील तरूणांचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)चांदवडीत डॉल्बी कधी वाजलीच नव्हती... तरूणांना भुरळ पाडणारी डॉल्बी चांदवडीत मात्र गेल्या ४० वर्षांत कधीच वाजली नाही. युवकांना मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे व चांदवडीचा आदर्श पुढे ठेवत भिवडी व वेलंग या गावांनी सुध्दा डॉल्बीला आजपर्यंत जवळ केले नाही. युवकांवर कायमपणे डॉल्बीप्रेमाची मोहोर उमटवली जात होती. त्यामुळे या युवकांनी केलेल्या या सहकार्यामुळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.वृध्दांपासून ते तरूणांपर्यंत असलेल्या एकीमुळे चांदवडी गावामध्ये आजपर्यंत ‘एक गाव-एक गणपती’ ही योजना यशस्वीरीत्या राबविली जात आहे. मला चांदवडी गावाचा याबद्दल अभिमान असून गेल्या दशकामध्ये एकाही निवडणुकीला सामोरे न गेलेल्या गावाची अशीच अखंड वाटचाल ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देते. - सारिका शिंंदे, सरपंच, चांदवडी, ता.वाई