शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

‘एक गाव-एक गणपती’चा पुनर्वसित गावांनी राखला मान

By admin | Updated: September 30, 2015 00:09 IST

आदर्श उपक्रम : चांदवडी, भिवडी, वेलंग गावांची कौतुकास्पद कामगिरी

पाचवड : स्वत:च्या गावाला आदर्शग्रामङ्खम्हणवून घेणाऱ्या मोठ्या बाजारपेठेच्या गावांपासून ते अगदी लहान वाडीवस्त्यांमधील लोकांनी ‘एक गाव-एक गणपती’ योजनेकडे यावर्षीच्या गणेशोत्सवात पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. सर्वत्र अशी परिस्थिती असताना भुर्इंज, पाचवड व परिसरातील मोठ्या गावांच्या शेजारीच असणाऱ्या चांदवडी, भिवडी तसेच वेलंग यांसारख्या पुनर्वसित गावांनी मात्र ‘एक गाव-एक गणपती’ या योजनेचा मान ठेवत आपापल्या गावांमध्ये या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने चांदवडी या पुनर्वसित गावचा आदर्श भिवडी व वेलंग या गावांनी घेतल्याचे दिसून येत आहे. धोम धरणामध्ये जमिनी गेल्यानंतर सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी या गावांचे किसन वीर कारखान्याशेजारील माळावर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन झाल्यापासून चांदवडी व इतर पुनर्वसित गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ योजना राबविली जात आहे. गावांमधील ग्रामस्थ व तरुणांमध्ये असलेल्या एकीचे प्रतीक म्हणजे या योजनेची दरवर्षी यशस्वीरीत्या होत असलेली अंमलबजावणी. शासनानेही चांदवडी गावाच्या या एकीची व कार्याची दखल घेऊन २००३ मध्ये त्यांना ‘एक गाव एक गणपती’ योजनेचा विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. गेल्या दशकामध्ये एकदाही निवडणुकीला सामोरे न जाणाऱ्या चांदवडी गावाला माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००६ मध्ये स्वत: निर्मलग्राम पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही मोठी बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये ग्रामस्थ व तरुणांकडून या योजनेकडे दुर्लक्ष होत असतानाच ४० वर्षांपासून ही पुनर्वसित गावे ‘एक गाव एक गणपती’ योजनेचा पाठपुरावा करून तरूणांना ही योजना यशस्वीरीत्या राबविण्यास प्रवृत्त करीत आहेत.चांदवडी गावच्या महिला सरपंच सारिका शिंंदे यांनी याबद्दल ग्रामस्थ व गावातील तरूणांचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)चांदवडीत डॉल्बी कधी वाजलीच नव्हती... तरूणांना भुरळ पाडणारी डॉल्बी चांदवडीत मात्र गेल्या ४० वर्षांत कधीच वाजली नाही. युवकांना मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे व चांदवडीचा आदर्श पुढे ठेवत भिवडी व वेलंग या गावांनी सुध्दा डॉल्बीला आजपर्यंत जवळ केले नाही. युवकांवर कायमपणे डॉल्बीप्रेमाची मोहोर उमटवली जात होती. त्यामुळे या युवकांनी केलेल्या या सहकार्यामुळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.वृध्दांपासून ते तरूणांपर्यंत असलेल्या एकीमुळे चांदवडी गावामध्ये आजपर्यंत ‘एक गाव-एक गणपती’ ही योजना यशस्वीरीत्या राबविली जात आहे. मला चांदवडी गावाचा याबद्दल अभिमान असून गेल्या दशकामध्ये एकाही निवडणुकीला सामोरे न गेलेल्या गावाची अशीच अखंड वाटचाल ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देते. - सारिका शिंंदे, सरपंच, चांदवडी, ता.वाई