शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पशुसंवर्धन विभाग सतर्क

By admin | Updated: April 18, 2015 00:04 IST

संगमेश्वर तालुका : शेतकरी मोहिमेत सहभागी होणार

मार्लेश्वर : पावसाळ््यात होणाऱ्या पायलागाची शक्यता गृहित धरून जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून संगमेश्वर तालुक्यात पायलाग लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात ४६ हजार पाळीव जनावरांमध्ये या साथीचा फैलाव होऊ नये यासाठी ही जागृती करण्यात येत असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे.संगमेश्वर तालुक्यात गेल्या ाही वर्षात अशा साथीबाबत शेतकरी पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, याबाबत यावर्षी प्रथमच दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणऊन ही काळजी घेतली जात आहे. जनावरांमध्ये आढळणाऱ्या पायलाग रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनातर्फे संगमेश्वर तालुक्यातील सुमारे ४६ हजार पाळीव जनावरांसाठी पायलाग लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला नुकताच प्रारंभ झाला असल्याची माहिती पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय धने यांनी दिली आहे.पाळीव जनावरांना होणारा पायलाग हा रोग पावसाळ्याच्या अगोदर उन्हाळ्यात बहुतांश प्रमाणात होतो.हा रोग डुकरांपासून साधारणपणे गाय, बैल, म्हशीला होतो. या रोगांची लागण झाल्यानंतर जनावरांच्या पायातील व खुरामध्ये लागण होऊन जखम होते व जखमेमध्ये किडी होतात. तसेच तोंडालासुद्धा जखम होते. रोगाची लागण झालेले जनावर काही खात पीत नाही. तसेच जनावराला तापही येतो व हा ताप कमी होत नाही.पावसाळ्यामध्ये कोकणात शेती व्यवसाय केला जातो. पावसाळ्याच्या सुरुवातीला नांगरणीसाठी बैलांची शारीरिक स्थिती मजबूत असणे आवश्यक असते. त्यामुळे शासनाने एप्रिल महिन्यातच पायलाग लसीकरण मोहीम सुरु केली आहे. तालुक्यातील ४६ हजार पाळीव जनावरांना २३ पशुवैद्यकीय संस्थांमधील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे.या मोहिमेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेची ३० एप्रिल रोजी सांगता केली जाणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरणजनावरांना पायलाग होऊन त्यांना नाहक शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागू नये यासाठी शेतकऱ्यांनी काही खबरदारीचे उपाय घेणे गरजेचे आहे. नजीकच्या पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुन त्यावरील उपाय योजणे गरजेचे आहे. शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या लसीकरणासारख्या योजनांचा शेतकरीवर्गाने फायदा घेऊन आपली जनावरे या रोगापासून कशी बचावतील याकडे कटाक्षाने देणे गरजेचे आहे. पशुसंवर्धनतर्फे ही हाती घेण्यात आली आहे.