शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
7
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
8
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
9
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
10
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
11
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
12
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
13
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
14
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
15
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
16
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
17
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
18
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
19
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
20
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!

पशुसंवर्धन विभाग सतर्क

By admin | Updated: April 18, 2015 00:04 IST

संगमेश्वर तालुका : शेतकरी मोहिमेत सहभागी होणार

मार्लेश्वर : पावसाळ््यात होणाऱ्या पायलागाची शक्यता गृहित धरून जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून संगमेश्वर तालुक्यात पायलाग लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात ४६ हजार पाळीव जनावरांमध्ये या साथीचा फैलाव होऊ नये यासाठी ही जागृती करण्यात येत असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे.संगमेश्वर तालुक्यात गेल्या ाही वर्षात अशा साथीबाबत शेतकरी पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, याबाबत यावर्षी प्रथमच दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणऊन ही काळजी घेतली जात आहे. जनावरांमध्ये आढळणाऱ्या पायलाग रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनातर्फे संगमेश्वर तालुक्यातील सुमारे ४६ हजार पाळीव जनावरांसाठी पायलाग लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला नुकताच प्रारंभ झाला असल्याची माहिती पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय धने यांनी दिली आहे.पाळीव जनावरांना होणारा पायलाग हा रोग पावसाळ्याच्या अगोदर उन्हाळ्यात बहुतांश प्रमाणात होतो.हा रोग डुकरांपासून साधारणपणे गाय, बैल, म्हशीला होतो. या रोगांची लागण झाल्यानंतर जनावरांच्या पायातील व खुरामध्ये लागण होऊन जखम होते व जखमेमध्ये किडी होतात. तसेच तोंडालासुद्धा जखम होते. रोगाची लागण झालेले जनावर काही खात पीत नाही. तसेच जनावराला तापही येतो व हा ताप कमी होत नाही.पावसाळ्यामध्ये कोकणात शेती व्यवसाय केला जातो. पावसाळ्याच्या सुरुवातीला नांगरणीसाठी बैलांची शारीरिक स्थिती मजबूत असणे आवश्यक असते. त्यामुळे शासनाने एप्रिल महिन्यातच पायलाग लसीकरण मोहीम सुरु केली आहे. तालुक्यातील ४६ हजार पाळीव जनावरांना २३ पशुवैद्यकीय संस्थांमधील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे.या मोहिमेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेची ३० एप्रिल रोजी सांगता केली जाणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरणजनावरांना पायलाग होऊन त्यांना नाहक शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागू नये यासाठी शेतकऱ्यांनी काही खबरदारीचे उपाय घेणे गरजेचे आहे. नजीकच्या पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुन त्यावरील उपाय योजणे गरजेचे आहे. शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या लसीकरणासारख्या योजनांचा शेतकरीवर्गाने फायदा घेऊन आपली जनावरे या रोगापासून कशी बचावतील याकडे कटाक्षाने देणे गरजेचे आहे. पशुसंवर्धनतर्फे ही हाती घेण्यात आली आहे.