शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

‘वेण्णा’ ब्र्रिटिशकालीन पुलाला झुडपांचा वेढा

By admin | Updated: August 7, 2016 01:03 IST

नवीन पुलाची मागणी : धोकादायक वळणावर गेले अनेकांचे प्राण

गुलाब पठाण-- किडगाव --सातारा शहरापासून वाई-पुणे दिशेला जाण्यासाठी पूर्वीच्या जुन्या हायवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ये, ता. सातारा या गावाच्या हद्दीतील वेण्णा नदीवर ब्रिटिशकालीन पुलाला चक्क वड, पिंपळ या छोट्या झुडपांनी व्यापले असून, या पुलाची स्थिती समाधानकारक नाही. पूर्वी याच मार्गे सर्व वाहने पुणे-मुंबईकडे जात होती. सध्या पुणे, मुंबई, वाई, धावडशी या मार्गावर धावणाऱ्या सर्व प्रकारच्या एसटी बस व अन्य वाहतूक याच पुलावरून सुरू आहे. या वेण्णा नदीवरील पुलाने साधारणपणे २००७ रोजी आपली शंभरी पूर्ण केली. इंग्लंडहून या पुलाच्या शंभरी भरल्याबद्दल पत्र व्यवहार झाला. सध्या या पुलाची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. २००८ मध्ये या विभागाच्या वतीने या पुलाची डागडुजी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून यावर लोखंडी अँगल टाकून व पुलाच्या सात मोहऱ्यांना आतून सिमेंट व गिलावा करण्यात आला आहे. मात्र, उभ्या दगडी खांबांसाठी कोणतीही डागडुजी झाली नाही. या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वड आणि पिंपळाच्या रोपट्यांनी वेढा दिला आहे. यामुळे पुलाचे दगड मोकळे होऊ लागले आहेत.या पुलाचे संरक्षण कठडे दगडी असून लोखंडी आहे. काही ठिकाणी ते तुटले असून, ते मजबूत नाहीत. या पुलावरील वळण धोकादायक असून, साताऱ्याकडून येणाऱ्या वाहनांना वळणाचा अंदाज आला नाही तर सरळ नदीपात्रात वाहने जातात. गतवर्षी या वळणावर संरक्षण कठडे बांधले आहेत. मात्र, आत्तापर्यंत अनेकांना या धोकादायक वळणावर आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे हे धोकादायक वळण काढण्याची मागणी होत आहे. दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे कण्हेर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. यावेळी या पुलाच्यावरील कठड्याला पाणी लागले होते. नदीच्या पाण्यामुळे माती घसरत असून, त्याठिकाणी संरक्षण कठडा बांधण्याची आवश्यकता आहे. वर्ये येथील पुलाच्या धोकादायक वळणामुळे अनेकांना प्राणाशी मुकावे लागले आहे. हे धोकादायक वळण दूर करणे आवश्यक आहे. - राजेंद्र शेडगे, माजी सरपंच, किडगाव