शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

‘वेण्णा’ ब्र्रिटिशकालीन पुलाला झुडपांचा वेढा

By admin | Updated: August 7, 2016 01:03 IST

नवीन पुलाची मागणी : धोकादायक वळणावर गेले अनेकांचे प्राण

गुलाब पठाण-- किडगाव --सातारा शहरापासून वाई-पुणे दिशेला जाण्यासाठी पूर्वीच्या जुन्या हायवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ये, ता. सातारा या गावाच्या हद्दीतील वेण्णा नदीवर ब्रिटिशकालीन पुलाला चक्क वड, पिंपळ या छोट्या झुडपांनी व्यापले असून, या पुलाची स्थिती समाधानकारक नाही. पूर्वी याच मार्गे सर्व वाहने पुणे-मुंबईकडे जात होती. सध्या पुणे, मुंबई, वाई, धावडशी या मार्गावर धावणाऱ्या सर्व प्रकारच्या एसटी बस व अन्य वाहतूक याच पुलावरून सुरू आहे. या वेण्णा नदीवरील पुलाने साधारणपणे २००७ रोजी आपली शंभरी पूर्ण केली. इंग्लंडहून या पुलाच्या शंभरी भरल्याबद्दल पत्र व्यवहार झाला. सध्या या पुलाची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. २००८ मध्ये या विभागाच्या वतीने या पुलाची डागडुजी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून यावर लोखंडी अँगल टाकून व पुलाच्या सात मोहऱ्यांना आतून सिमेंट व गिलावा करण्यात आला आहे. मात्र, उभ्या दगडी खांबांसाठी कोणतीही डागडुजी झाली नाही. या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वड आणि पिंपळाच्या रोपट्यांनी वेढा दिला आहे. यामुळे पुलाचे दगड मोकळे होऊ लागले आहेत.या पुलाचे संरक्षण कठडे दगडी असून लोखंडी आहे. काही ठिकाणी ते तुटले असून, ते मजबूत नाहीत. या पुलावरील वळण धोकादायक असून, साताऱ्याकडून येणाऱ्या वाहनांना वळणाचा अंदाज आला नाही तर सरळ नदीपात्रात वाहने जातात. गतवर्षी या वळणावर संरक्षण कठडे बांधले आहेत. मात्र, आत्तापर्यंत अनेकांना या धोकादायक वळणावर आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे हे धोकादायक वळण काढण्याची मागणी होत आहे. दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे कण्हेर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. यावेळी या पुलाच्यावरील कठड्याला पाणी लागले होते. नदीच्या पाण्यामुळे माती घसरत असून, त्याठिकाणी संरक्षण कठडा बांधण्याची आवश्यकता आहे. वर्ये येथील पुलाच्या धोकादायक वळणामुळे अनेकांना प्राणाशी मुकावे लागले आहे. हे धोकादायक वळण दूर करणे आवश्यक आहे. - राजेंद्र शेडगे, माजी सरपंच, किडगाव