शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

ओगलेवाडीत पादचारी मार्गाला विक्रेत्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST

ओगलेवाडी : पादचारी मार्ग हे सामान्यपणे पायी चालणार्‍या लोकांसाठी असतात. वाहनांच्या गर्दीतून पादचार्‍यांना सुरक्षित चालता यावे आणि विनाअपघात प्रवास ...

ओगलेवाडी : पादचारी मार्ग हे सामान्यपणे पायी चालणार्‍या लोकांसाठी असतात. वाहनांच्या गर्दीतून पादचार्‍यांना सुरक्षित चालता यावे आणि विनाअपघात प्रवास करता यावा या हेतूने ते निर्माण केलेले असतात, मात्र ओगलेवाडीत याचा वापर इतर कारणांसाठी केला जातो आहे. फेरीवाले आणि फळविक्रेते यावर दुकाने थाटून व्यवसाय करीत आहेत.

चौपदरीकरणांतर्गत कराडला जोडणारे सर्व रस्ते प्रशस्त झाले. त्यांच्या बाजूने पादचारी मार्ग ही तयार केले गेले. बाजारपेठेच्या ठिकाणी याचा वापर करून नागरिक सुरक्षित प्रवास करीत होते. यामुळे अपघातही कमी झाले होते. हे काही दिवस व्यवस्थित सुरू होते .मात्र मागील काही दिवसांपासून या मार्गावर फळविक्रेते आणि इतर व्यावसायिकांनी कब्जा केला आहे. त्यावर अतिक्रमण करून ते आपला व्यवसाय करीत आहेत. पादचारी मात्र जीव धोक्यात घालून रस्त्यावरून प्रवास करीत आहेत.

ओगलेवाडी ही कराडलगतची मोठी बाजारपेठ आहे. तसेच येथील मंडईही खूप मोठी आहे. शेतकरी स्वत: येथे आपला माल विक्री करीत असतात. त्यामुळे येथे स्वस्त आणि ताजा भाजीपाला मिळतो. तो खरेदी करण्यासाठी येथे दुपारी ४ नंतर मोठी गर्दी होते. तेव्हा हे पादचारी मार्ग खूप महत्त्वाचे आहेत, मात्र सध्या यावर व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्याने याचा वापर करता येत नाही. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन हे मार्ग रिकामे करावेत, अशी नागरिक अपेक्षा करीत आहेत.

चौकट

अपघात होण्याची शक्यता वाढली

येथील मुख्य चौकात खूप वर्दळ असते. औद्योगिक वसाहतीची वाहनेही याच चौकातून ये-जा करीत असतात. यामुळे येथे पादचाऱ्यांना नेहमी अपघाताचा धोका असतो. पादचारी मार्ग खुला झाल्यास हा धोका कमी होऊन अपघातही होणार नाही.

फोटो :