शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

वाहने सुसाट; दुचाकींना ब्रेक लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST

कऱ्हाड : पाचवड फाटा ते चांदोली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम उत्तम दर्जाचे चालू असून, वाहनांची गती वाढली आहे. ...

कऱ्हाड : पाचवड फाटा ते चांदोली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम उत्तम दर्जाचे चालू असून, वाहनांची गती वाढली आहे. अमर्याद वेगाने रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्याची गरज आहे.

कऱ्हाड-रत्नागिरी या राज्यमार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दोन वर्षांपासून हे काम सुरू असून, रस्ता रुंदीकरणाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. कऱ्हाडहून रत्नागिरी येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख आहे. या रस्त्याला कोठेही टोलनाका नसल्याने अवजड वाहनांसह दुचाकीस्वार, चारचाकी वाहनांची गर्दी वाढली आहे. रत्नागिरी, गणपतीपुळे, कोकण दर्शन पाहण्यासाठी पर्यटक या रस्त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची ये-जा वाढली आहे. रस्त्याचे काम चकाचक झाले असून, वाहनधारक सुसाट धावू लागले आहेत.

पाचवड फाटा येथून येणपेपर्यंत रस्त्यालगत अनेक मोठी गावे आहेत. पाचवड फाटा, धोंडेवाडी, ओंड, उंडाळे, नांदगाव, घोगाव, टाळगाव आदी गावांत मोठी बाजारपेठ आहे. नागरिकांच्या रोजच वापरातील रस्ता असल्याने दुचाकीसह तरुणाई वेगाने वाहन चालवत आहेत. याचा फटका अनेकांना बसत आहे. रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. अनेक जण जखमी होत आहेत तर अनेकांना आपला हातपाय गमवावा लागत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रोजच अपघाताची मालिका या रस्त्यावर पाहावयास मिळत आहे. अपघाताची चर्चा गावोगावी होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी भैरवनाथ नगर परिसरात रुग्णवाहिकाचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडील शेतात जाऊन पलटी झाली होती. तर अनेक ठिकाणी वाहनांची मोडतोड झाल्याची घटना घडल्या आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्याची गरज असून, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. तर दुचाकी वाहने सुसाट वेगाने चालवून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीस्वारांच्या गाडीला ब्रेक लावून त्यांना जास्तीत जास्त दंड आकारून त्यांना चाप लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.

(कोट)

या रस्त्यावर दुचाकीस्वार सुसाट गाडी चालवताना दिसत आहेत. रोजच अपघाताची मालिका सुरू आहे. अशा वाहनांची गती कमी होण्याची गरज आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व अशा सुसाट वाहनांवर कारवाई करण्यात यावी.

-संतोष पाटील, नागरिक, भैरवनाथ नगर.