शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वाहने सुसाट; दुचाकींना ब्रेक लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST

कऱ्हाड : पाचवड फाटा ते चांदोली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम उत्तम दर्जाचे चालू असून, वाहनांची गती वाढली आहे. ...

कऱ्हाड : पाचवड फाटा ते चांदोली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम उत्तम दर्जाचे चालू असून, वाहनांची गती वाढली आहे. अमर्याद वेगाने रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्याची गरज आहे.

कऱ्हाड-रत्नागिरी या राज्यमार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दोन वर्षांपासून हे काम सुरू असून, रस्ता रुंदीकरणाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. कऱ्हाडहून रत्नागिरी येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख आहे. या रस्त्याला कोठेही टोलनाका नसल्याने अवजड वाहनांसह दुचाकीस्वार, चारचाकी वाहनांची गर्दी वाढली आहे. रत्नागिरी, गणपतीपुळे, कोकण दर्शन पाहण्यासाठी पर्यटक या रस्त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची ये-जा वाढली आहे. रस्त्याचे काम चकाचक झाले असून, वाहनधारक सुसाट धावू लागले आहेत.

पाचवड फाटा येथून येणपेपर्यंत रस्त्यालगत अनेक मोठी गावे आहेत. पाचवड फाटा, धोंडेवाडी, ओंड, उंडाळे, नांदगाव, घोगाव, टाळगाव आदी गावांत मोठी बाजारपेठ आहे. नागरिकांच्या रोजच वापरातील रस्ता असल्याने दुचाकीसह तरुणाई वेगाने वाहन चालवत आहेत. याचा फटका अनेकांना बसत आहे. रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. अनेक जण जखमी होत आहेत तर अनेकांना आपला हातपाय गमवावा लागत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रोजच अपघाताची मालिका या रस्त्यावर पाहावयास मिळत आहे. अपघाताची चर्चा गावोगावी होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी भैरवनाथ नगर परिसरात रुग्णवाहिकाचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडील शेतात जाऊन पलटी झाली होती. तर अनेक ठिकाणी वाहनांची मोडतोड झाल्याची घटना घडल्या आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्याची गरज असून, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. तर दुचाकी वाहने सुसाट वेगाने चालवून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीस्वारांच्या गाडीला ब्रेक लावून त्यांना जास्तीत जास्त दंड आकारून त्यांना चाप लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.

(कोट)

या रस्त्यावर दुचाकीस्वार सुसाट गाडी चालवताना दिसत आहेत. रोजच अपघाताची मालिका सुरू आहे. अशा वाहनांची गती कमी होण्याची गरज आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व अशा सुसाट वाहनांवर कारवाई करण्यात यावी.

-संतोष पाटील, नागरिक, भैरवनाथ नगर.