शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाहनांनी साडेतीन हजार जीव चिरडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:37 IST

कऱ्हाड : अपघातात कुणाचा जीव गेला तर आपण हळहळतो; पण दररोज अनेक निष्पाप जीव वाहनांच्या टायरखाली सर्रास चिरडले जात ...

कऱ्हाड : अपघातात कुणाचा जीव गेला तर आपण हळहळतो; पण दररोज अनेक निष्पाप जीव वाहनांच्या टायरखाली सर्रास चिरडले जात आहेत. त्याची कुणाला दाद नाही आणि सोयरसुतक तर नाहीच नाही. गत काही वर्षांत असेच तब्बल साडेतीन हजार जीव वाहनांनी चिरडल्याची धक्कादायक बाब कऱ्हाडच्या ‘एम. एन. रॉय’ या पर्यावरणीय संस्थेने केलेल्या निरीक्षणातून समोर आली आहे.

अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असणाऱ्या प्राणी, पक्ष्यांना मानवनिर्मित कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. वाहनांच्या धडकेतही दरवर्षी शेकडो प्राणी-पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. गत एकोणीस वर्षांत ३ हजार २२८ प्राणी व पक्ष्यांचा वाहनांखाली बळी गेल्याचा निष्कर्ष एम. एन. रॉय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्थेने निरीक्षणातून काढला आहे. संस्थेच्या पर्यावरण विभागाचे संचालक सुधीर कुंभार यांनी २००२ सालापासून निरीक्षणाचे काम हाती घेतले. अल्केश ओहळ, देवानंद पांढरपट्टे, बबन साबळे, सुनील जंगम, बी. ए. चोरघे यांची त्यासाठी त्यांनी मदत घेतली. कऱ्हाड ते ढेबेवाडी या २५ किलोमीटर रस्त्याची निरीक्षणासाठी निवड करण्यात आली. दररोज न चुकता डॉ. कुंभार यांच्यासह त्यांचे सहकारी या मार्गावरून प्रवास करतात. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पक्षी व प्राण्याची ते नोंद घेतात. त्याचे छायाचित्र घेतात. तसेच ही सर्व माहिती ते संकलित करून वर्षाअखेरीस त्याचे वर्गीकरण करतात. गत एकोणीस वर्षांपासून त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे.

- चौकट

काही वाचवतात; काही मुद्दाम चिरडतात!

निरीक्षणाचा एक भाग म्हणून डॉ. सुधीर कुंभार यांनी काही चालकांशी चर्चा केली. त्यावेळी काहींनी प्राणी, पक्षी रस्त्यावर दिसल्यास त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले. मात्र, ‘प्राणी, पक्ष्यांसाठी स्वत:चा जीव धोक्यात कसा घालणार?’ असेही काहींनी सांगितले. प्राणी किंवा पक्ष्याला मुद्दाम चिरडणारे काही बेदरकार चालकही असल्याचे डॉ. कुंभार यांनी सांगितले.

- चौकट

अन्नासाठी मृत्यूच्या दाढेत

रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या प्राण्याचे मांस खाण्यासाठी येणाऱ्या इतर प्राणी व पक्ष्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे.

- कोट

प्राणी असो अथवा पक्षी, तेही एक जीवच आहेत. हे जीव वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जबाबदारीने वाहन चालविल्यास असे मृत्यू टाळता येतील. त्यासाठी आम्ही चालकांमध्ये जागृती करतो. तसेच जखमी प्राणी अथवा पक्षी सापडल्यास त्याला तातडीने वैद्यकीय उपचार देतो.

- डॉ. सुधीर कुंभार, संचालक,

एम. एन. रॉय संस्था, कऱ्हाड

- चौकट

अपघाती मृत्यूचे प्रमाण

सरपटणारे प्राणी : ४८%

सस्तन प्राणी : ३३%

पक्षी : १९%

- चौकट

दहा वर्षांतील बळी

वर्ष : प्राणी : पक्षी

२०१०-११ : १८९ : ६२

२०११-१२ : १४८ : ५२

२०१२-१३ : १७८ : ६४

२०१३-१४ : १४० : ५१

२०१४-१५ : १२९ : ३३

२०१५-१६ : ११३ : २९

२०१६-१७ : १०० : ६३

२०१७-१८ : १३४ : ५०

२०१८-१९ : १४५ : ५५

२०१९-२० : १८० : १०९

२०२०-२१ : ११४ : ३३

- चौकट

एप्रिल २०२० ते मार्च २०२० अखेर...

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या एका वर्षात ३१ सरडे, ३५ साप, ७ कोंबड्या, २ बुलबुल, १ बगळा, ३ सातभाई, ३ भारद्वाज, २० श्वान, १२ मांजर, १० उंदीर, १ मुंगूस, १ वानर, १ उदमांजर, १ खार असे ६८ सरपटणारे प्राणी, ३३ पक्षी आणि ४६ सस्तन प्राणी २५ किलोमीटरमध्ये वाहनाखाली चिरडल्याचे समोर आले.

फोटो : १३केआरडी०१

कॅप्शन : प्रतीकात्मक