शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

वाहनांनी साडेतीन हजार जीव चिरडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:37 IST

कऱ्हाड : अपघातात कुणाचा जीव गेला तर आपण हळहळतो; पण दररोज अनेक निष्पाप जीव वाहनांच्या टायरखाली सर्रास चिरडले जात ...

कऱ्हाड : अपघातात कुणाचा जीव गेला तर आपण हळहळतो; पण दररोज अनेक निष्पाप जीव वाहनांच्या टायरखाली सर्रास चिरडले जात आहेत. त्याची कुणाला दाद नाही आणि सोयरसुतक तर नाहीच नाही. गत काही वर्षांत असेच तब्बल साडेतीन हजार जीव वाहनांनी चिरडल्याची धक्कादायक बाब कऱ्हाडच्या ‘एम. एन. रॉय’ या पर्यावरणीय संस्थेने केलेल्या निरीक्षणातून समोर आली आहे.

अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असणाऱ्या प्राणी, पक्ष्यांना मानवनिर्मित कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. वाहनांच्या धडकेतही दरवर्षी शेकडो प्राणी-पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. गत एकोणीस वर्षांत ३ हजार २२८ प्राणी व पक्ष्यांचा वाहनांखाली बळी गेल्याचा निष्कर्ष एम. एन. रॉय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्थेने निरीक्षणातून काढला आहे. संस्थेच्या पर्यावरण विभागाचे संचालक सुधीर कुंभार यांनी २००२ सालापासून निरीक्षणाचे काम हाती घेतले. अल्केश ओहळ, देवानंद पांढरपट्टे, बबन साबळे, सुनील जंगम, बी. ए. चोरघे यांची त्यासाठी त्यांनी मदत घेतली. कऱ्हाड ते ढेबेवाडी या २५ किलोमीटर रस्त्याची निरीक्षणासाठी निवड करण्यात आली. दररोज न चुकता डॉ. कुंभार यांच्यासह त्यांचे सहकारी या मार्गावरून प्रवास करतात. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पक्षी व प्राण्याची ते नोंद घेतात. त्याचे छायाचित्र घेतात. तसेच ही सर्व माहिती ते संकलित करून वर्षाअखेरीस त्याचे वर्गीकरण करतात. गत एकोणीस वर्षांपासून त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे.

- चौकट

काही वाचवतात; काही मुद्दाम चिरडतात!

निरीक्षणाचा एक भाग म्हणून डॉ. सुधीर कुंभार यांनी काही चालकांशी चर्चा केली. त्यावेळी काहींनी प्राणी, पक्षी रस्त्यावर दिसल्यास त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले. मात्र, ‘प्राणी, पक्ष्यांसाठी स्वत:चा जीव धोक्यात कसा घालणार?’ असेही काहींनी सांगितले. प्राणी किंवा पक्ष्याला मुद्दाम चिरडणारे काही बेदरकार चालकही असल्याचे डॉ. कुंभार यांनी सांगितले.

- चौकट

अन्नासाठी मृत्यूच्या दाढेत

रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या प्राण्याचे मांस खाण्यासाठी येणाऱ्या इतर प्राणी व पक्ष्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे.

- कोट

प्राणी असो अथवा पक्षी, तेही एक जीवच आहेत. हे जीव वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जबाबदारीने वाहन चालविल्यास असे मृत्यू टाळता येतील. त्यासाठी आम्ही चालकांमध्ये जागृती करतो. तसेच जखमी प्राणी अथवा पक्षी सापडल्यास त्याला तातडीने वैद्यकीय उपचार देतो.

- डॉ. सुधीर कुंभार, संचालक,

एम. एन. रॉय संस्था, कऱ्हाड

- चौकट

अपघाती मृत्यूचे प्रमाण

सरपटणारे प्राणी : ४८%

सस्तन प्राणी : ३३%

पक्षी : १९%

- चौकट

दहा वर्षांतील बळी

वर्ष : प्राणी : पक्षी

२०१०-११ : १८९ : ६२

२०११-१२ : १४८ : ५२

२०१२-१३ : १७८ : ६४

२०१३-१४ : १४० : ५१

२०१४-१५ : १२९ : ३३

२०१५-१६ : ११३ : २९

२०१६-१७ : १०० : ६३

२०१७-१८ : १३४ : ५०

२०१८-१९ : १४५ : ५५

२०१९-२० : १८० : १०९

२०२०-२१ : ११४ : ३३

- चौकट

एप्रिल २०२० ते मार्च २०२० अखेर...

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या एका वर्षात ३१ सरडे, ३५ साप, ७ कोंबड्या, २ बुलबुल, १ बगळा, ३ सातभाई, ३ भारद्वाज, २० श्वान, १२ मांजर, १० उंदीर, १ मुंगूस, १ वानर, १ उदमांजर, १ खार असे ६८ सरपटणारे प्राणी, ३३ पक्षी आणि ४६ सस्तन प्राणी २५ किलोमीटरमध्ये वाहनाखाली चिरडल्याचे समोर आले.

फोटो : १३केआरडी०१

कॅप्शन : प्रतीकात्मक